शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

किसान रेलने भंडाराची मिरची पोहचली कोलकात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. परंतु अलिकडे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाला पसंती दिली आहे. मोठ्या प्रमाणात गुणवत्तापुर्ण भाजीपाला उत्पादन केले जात आहे. भंडारा येथील बीटीबी सब्जी मंडी असोसिएशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीपासून ते विक्रीपर्यंत आणि आता निर्यात करण्यापर्यंत मार्गदर्शन केले जात आहे. यापूर्वी भंडारा येथील भेंडी आणि इतर भाजीपाला आखाती देशात निर्यात झाला होता.

ठळक मुद्देबीटीबी सब्जीमंडीचा पुढाकार

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या किसान रेलच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील मिरची आता थेट कोलकात्यात पोहचली. येथील बीटीबी सब्जीमंडीच्या पुढाकाराने बुधवारी २६०० किलो मिरची या रेल्वेने वरठी येथून रवाना झाली. भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. परंतु अलिकडे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाला पसंती दिली आहे. मोठ्या प्रमाणात गुणवत्तापुर्ण भाजीपाला उत्पादन केले जात आहे. भंडारा येथील बीटीबी सब्जी मंडी असोसिएशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीपासून ते विक्रीपर्यंत आणि आता निर्यात करण्यापर्यंत मार्गदर्शन केले जात आहे. यापूर्वी भंडारा येथील भेंडी आणि इतर भाजीपाला आखाती देशात निर्यात झाला होता. आता देशाच्या कानाकोपऱ्यात येथील भाजीपाला पोहचविला जात आहे. परंतु भंडारा शहरातून भाजीपाला पाठविण्यासाठी मोठी अडचण होती ती वाहतुकीची. रस्ता मार्गे भाजीपाला लांब अंतरावर पाठविला तर वाहतुकीचा खर्च मोठा येत होता आणि त्यातून शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित पैसा येत नव्हता. आता रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या किसान रेल्वेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विकासाचे मोठे दालन निर्माण करुन दिले आहे.बुधवारी भंडारा रोड अर्थात वरठी रेल्वे स्थानकावरुन गेलेल्या किसान रेलमध्ये २६०० किलो मिरची कोलकात्याकडे रवाना करण्यात आली आहे. भंडारा रेल्वे स्थानकावर बीटीबीचे अध्यक्ष बंडु बारापात्रे यांनी हिरवी झेंडी दाखवत निर्यातीचे नवे पर्व जिल्ह्यात सुरु केले. विकासाची वाट शोधत असणाऱ्या शेतकऱ्यांना रेल्वेने नवा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

भारतीय रेल्वेने शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना स्वतंत्र प्लॅटफाॅर्म उपलब्ध करुन द्यावा. वातानुकुलीत डब्यांची व्यवस्था करण्यात यावी. वेळेचे नियोजन स्वतंत्र आणि हमाल व्यवस्थाही स्वतंत्र असावी. विश्वासपात्र वातावरणाची निर्मिती करावी.- बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी किसान रेल्वे ही सेवा भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच शेतकरी हितार्थ राबविण्यात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. अत्यावश्यक सेवा प्रवास भाड्याच्या निम्मे दरात उपलब्ध करुन दिली आहे. शेतकऱ्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करु. - नितीन पाटील, वाणिज्य निरीक्षक, वरठी रेल्वे स्टेशन

 

टॅग्स :railwayरेल्वे