शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

किसान रेलने भंडाराची मिरची पोहचली कोलकात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. परंतु अलिकडे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाला पसंती दिली आहे. मोठ्या प्रमाणात गुणवत्तापुर्ण भाजीपाला उत्पादन केले जात आहे. भंडारा येथील बीटीबी सब्जी मंडी असोसिएशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीपासून ते विक्रीपर्यंत आणि आता निर्यात करण्यापर्यंत मार्गदर्शन केले जात आहे. यापूर्वी भंडारा येथील भेंडी आणि इतर भाजीपाला आखाती देशात निर्यात झाला होता.

ठळक मुद्देबीटीबी सब्जीमंडीचा पुढाकार

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या किसान रेलच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील मिरची आता थेट कोलकात्यात पोहचली. येथील बीटीबी सब्जीमंडीच्या पुढाकाराने बुधवारी २६०० किलो मिरची या रेल्वेने वरठी येथून रवाना झाली. भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. परंतु अलिकडे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाला पसंती दिली आहे. मोठ्या प्रमाणात गुणवत्तापुर्ण भाजीपाला उत्पादन केले जात आहे. भंडारा येथील बीटीबी सब्जी मंडी असोसिएशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीपासून ते विक्रीपर्यंत आणि आता निर्यात करण्यापर्यंत मार्गदर्शन केले जात आहे. यापूर्वी भंडारा येथील भेंडी आणि इतर भाजीपाला आखाती देशात निर्यात झाला होता. आता देशाच्या कानाकोपऱ्यात येथील भाजीपाला पोहचविला जात आहे. परंतु भंडारा शहरातून भाजीपाला पाठविण्यासाठी मोठी अडचण होती ती वाहतुकीची. रस्ता मार्गे भाजीपाला लांब अंतरावर पाठविला तर वाहतुकीचा खर्च मोठा येत होता आणि त्यातून शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित पैसा येत नव्हता. आता रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या किसान रेल्वेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विकासाचे मोठे दालन निर्माण करुन दिले आहे.बुधवारी भंडारा रोड अर्थात वरठी रेल्वे स्थानकावरुन गेलेल्या किसान रेलमध्ये २६०० किलो मिरची कोलकात्याकडे रवाना करण्यात आली आहे. भंडारा रेल्वे स्थानकावर बीटीबीचे अध्यक्ष बंडु बारापात्रे यांनी हिरवी झेंडी दाखवत निर्यातीचे नवे पर्व जिल्ह्यात सुरु केले. विकासाची वाट शोधत असणाऱ्या शेतकऱ्यांना रेल्वेने नवा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

भारतीय रेल्वेने शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना स्वतंत्र प्लॅटफाॅर्म उपलब्ध करुन द्यावा. वातानुकुलीत डब्यांची व्यवस्था करण्यात यावी. वेळेचे नियोजन स्वतंत्र आणि हमाल व्यवस्थाही स्वतंत्र असावी. विश्वासपात्र वातावरणाची निर्मिती करावी.- बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी किसान रेल्वे ही सेवा भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच शेतकरी हितार्थ राबविण्यात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. अत्यावश्यक सेवा प्रवास भाड्याच्या निम्मे दरात उपलब्ध करुन दिली आहे. शेतकऱ्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करु. - नितीन पाटील, वाणिज्य निरीक्षक, वरठी रेल्वे स्टेशन

 

टॅग्स :railwayरेल्वे