शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
2
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
3
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
4
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?
5
“अमेरिकेच्या आदेशांचे पालन करतोय, तोपर्यंत भारत महान मित्र, पण...”; चीनने स्पष्टच सांगितले
6
पीडितेच्या साडीने माजी खासदाराला पाठवले तुरुंगात, प्रज्वल रेवण्णा प्रकरणात कसा सापडला महत्त्वाचा पुरावा?
7
या देशामध्ये मुस्लिमांना सार्वजनिक ठिकाणी सण साजरे करण्यास करण्यात आली मनाई  
8
Share Market Updates 7 August: ट्रम्प टॅरिफ बॉम्बमुळे शेअर बाजार कोसळला, Sensex ८०००० अंकांच्या खाली
9
"मी खेळू शकेन असं वाटत नाही, पण CSK साठी..."; धोनीच्या विधानाने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या
10
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
11
Aashna Chaudhary : जिद्दीला सॅल्यूट! अपयशाने खचली नाही, IPS होण्याचं स्वप्न केलं पूर्ण, आता मिळाली मोठी जबाबदारी
12
बेवफा सोनिया...! प्रियकराच्या मदतीनं पतीला संपवलं; १ वर्ष कुणालाही नाही कळलं, पण एका चुकीनं...
13
कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
14
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
15
Raksha Bandhan 2025 Wishes: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा; प्रेमळ Messages, Status आणि भावपूर्ण Greetings पाठवा आपल्या बहीण-भावाला
16
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
17
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
18
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
19
विराट कोहलीचं आवडतं गाणं गाजतंय, यूट्यूबवर मिळालेत १० कोटी Views, तुम्ही ऐकलंय का?
20
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू

किसान रेलने भंडाराची मिरची पोहचली कोलकात्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 05:00 IST

भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. परंतु अलिकडे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाला पसंती दिली आहे. मोठ्या प्रमाणात गुणवत्तापुर्ण भाजीपाला उत्पादन केले जात आहे. भंडारा येथील बीटीबी सब्जी मंडी असोसिएशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीपासून ते विक्रीपर्यंत आणि आता निर्यात करण्यापर्यंत मार्गदर्शन केले जात आहे. यापूर्वी भंडारा येथील भेंडी आणि इतर भाजीपाला आखाती देशात निर्यात झाला होता.

ठळक मुद्देबीटीबी सब्जीमंडीचा पुढाकार

  लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या किसान रेलच्या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातील मिरची आता थेट कोलकात्यात पोहचली. येथील बीटीबी सब्जीमंडीच्या पुढाकाराने बुधवारी २६०० किलो मिरची या रेल्वेने वरठी येथून रवाना झाली. भंडारा जिल्हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. परंतु अलिकडे शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकाला पसंती दिली आहे. मोठ्या प्रमाणात गुणवत्तापुर्ण भाजीपाला उत्पादन केले जात आहे. भंडारा येथील बीटीबी सब्जी मंडी असोसिएशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भाजीपाला लागवडीपासून ते विक्रीपर्यंत आणि आता निर्यात करण्यापर्यंत मार्गदर्शन केले जात आहे. यापूर्वी भंडारा येथील भेंडी आणि इतर भाजीपाला आखाती देशात निर्यात झाला होता. आता देशाच्या कानाकोपऱ्यात येथील भाजीपाला पोहचविला जात आहे. परंतु भंडारा शहरातून भाजीपाला पाठविण्यासाठी मोठी अडचण होती ती वाहतुकीची. रस्ता मार्गे भाजीपाला लांब अंतरावर पाठविला तर वाहतुकीचा खर्च मोठा येत होता आणि त्यातून शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित पैसा येत नव्हता. आता रेल्वे मंत्रालयाने सुरु केलेल्या किसान रेल्वेने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विकासाचे मोठे दालन निर्माण करुन दिले आहे.बुधवारी भंडारा रोड अर्थात वरठी रेल्वे स्थानकावरुन गेलेल्या किसान रेलमध्ये २६०० किलो मिरची कोलकात्याकडे रवाना करण्यात आली आहे. भंडारा रेल्वे स्थानकावर बीटीबीचे अध्यक्ष बंडु बारापात्रे यांनी हिरवी झेंडी दाखवत निर्यातीचे नवे पर्व जिल्ह्यात सुरु केले. विकासाची वाट शोधत असणाऱ्या शेतकऱ्यांना रेल्वेने नवा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.

भारतीय रेल्वेने शेतकरी हिताचा निर्णय घेतला आहे. आता शेतकऱ्यांना स्वतंत्र प्लॅटफाॅर्म उपलब्ध करुन द्यावा. वातानुकुलीत डब्यांची व्यवस्था करण्यात यावी. वेळेचे नियोजन स्वतंत्र आणि हमाल व्यवस्थाही स्वतंत्र असावी. विश्वासपात्र वातावरणाची निर्मिती करावी.- बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी किसान रेल्वे ही सेवा भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच शेतकरी हितार्थ राबविण्यात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. अत्यावश्यक सेवा प्रवास भाड्याच्या निम्मे दरात उपलब्ध करुन दिली आहे. शेतकऱ्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करु. - नितीन पाटील, वाणिज्य निरीक्षक, वरठी रेल्वे स्टेशन

 

टॅग्स :railwayरेल्वे