शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

पवनी, तुमसरात दुष्काळाचे सावट

By admin | Updated: September 11, 2015 00:58 IST

श्रावण महिना संपत असला तरी वरूण राजाची मुक्त हस्ताने हजेरी लागलेली नाही. परिणामी धान्याचे कोठार समजल्या जाणाऱ्या ...

हजारों एकर शेतजमिनीला पडल्या भेगा, पावसाअभावी उत्पादन घटण्याची शक्यतातुमसर/ पवनी : श्रावण महिना संपत असला तरी वरूण राजाची मुक्त हस्ताने हजेरी लागलेली नाही. परिणामी धान्याचे कोठार समजल्या जाणाऱ्या तुमसर तथा चौरास भागातील पवनी तालुक्यात दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे.शेतीत सिंचनाचे कोणतेही माध्यम आता उपलब्ध नसल्याने हजारो एकर शेतजमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना धान उत्पादन होणार असल्याची आशा धुसर झाली आहे.तुमसर तालुक्यात चिचोली हे गाव जंगलव्याप्त आहे. या गावात दोन मोठे रानतलाव आहेत. पावसाळा सुरू होताच जंगलवाटे या तलावात पाणी जमा होवून ते तुडूंब भरतात. या दोन तलावाच्या पाण्याने शेकडो हेक्टरातील पिक ओलीताखाली येवून शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. मात्र तीन महिन्यांचा कालावधी संपून जात असतानाही पावसाने हजेरी लावली नाही. चिचोली मोकोटोला या गावातील शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करणारे रानतलाव कोरडेच आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी शेतजमिन पडीकच ठेवली. काही मुबलक शेतकऱ्यांकडे सिंचनाचे साधन, सुरूवातीला पावसाची हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. शेतविहीरद्वारे मोटारपंप लावून प्रसंगी ट्रॅक्टर चालवून शेतमजुरांना अधिकचे पैसे मोजून रोवणी उरकवली. पाऊस आज येणार उद्या येणार, या आशेने शेतविहीरीतील पाणी सिंचनकरून जगविले. मात्र पावसाने काही कृपादृष्टी दाखविलीच नाही. उलट शेतविहरी कोरड्या पडल्याने व तळ गाठल्याने शेतपिकांना जगविणे कठिण झाले आहे.पाऊस येणार, शेतीला पाणी मिळणार व उत्पन्न मिळणार, या आशेने शेतकऱ्यांनी सोसायट्या, पतसंस्था, सावकारांकडून, बँकांकडून कर्ज घेतले. शेतीच्या मशागतीकरिता, रोवणीकरिता तसेच रासायनिक खताकरिता अतोनात पैसे खर्च केले. मात्र पावसाने दगा दिल्याने तलाव विहीर कोरडे पडले आहेत. सिंचनाअभावी शेतकऱ्यांनी लावलेली पिके पिवळसर पडून करपली असताना शेत जमिनीत आता भेगा पडल्याचे विदारक चित्र आहे. चिचोली येथील सुरेश काळसर्पे, बाबु हेडावू, अजय चंद्रीकापुरे, विलास रहांगडाले, भगवान मोहनकर, ईश्वर काळसर्पे, वामन गाढवे, रामचंद्र मोरे, फकिरा उके आदी शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न होणार, या आशेने होत नव्हते ते सर्व पणाला लावून आतापर्यंत शेती कशी बशी जगविली. त्यातही अतोनात पैसा खर्च घालावा लागला आहे. पवनी : तालुक्यात भातपीक व सोयाबीन पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून पाऊस अनियमित असल्याने भातपिकाची रोवणी व सोयाबीन पिकाची पेरणी प्रभावित झालेली होती. शेकडो हेक्टर शेती अजूनही पडीत आहे त्याची आकडेवारी गोळा करण्यात आलेली नाही. ज्या शेतीमध्ये रोवणी व पेरणी केलेली आहे, त्या शेतीला पावसाची नितांत गरज आहे. परंतु पाऊस पडत नाही त्यामुळे शेततळी, तलाव, बोड्या, विहिरी, नहर अशा ज्या स्त्रोतात पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणचे पाणी इंजिनद्वारे देवून शेतातील पिक वाचविण्याचा शेतकरी आटोकाट प्रयत्न करीत आहे.तालुक्यात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेततळी, तलाव किंवा बोड्यांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध नाही. तरीही उपलब्ध पाणीसाठा वापरून शेतकरी पुढे पाऊस येईल, या आशेवर पिक जगविण्यासाठी पाणी देत आहे. भातपिकासाठी आतापासून पिक कापणीला येईस्तोवर चार ते पाच वेळा पाणी देण्याची गरज आहे. परंतु तलाव बोड्यांमध्ये तितका पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. पाऊस न पडल्यास दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेतकरी पावसाअभावी जसा त्रस्त आहे तसाच भात व सोयाबीन पिकावर आलेल्या वेगवेगळ्या किडींच्या प्रादुर्भावामुळे देखील त्रस्त आहे. गरजेनुसार रासायनिक खताची मात्रा देवून पिकाला संजीवनी देण्याचा प्रयत्न करीत असताना पिक वाचविण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. दुबारपेरणीमुळे खचलेला व कर्जबाजारी झालेला शेतकरी अन्नधान्याच्या उत्पादनासाठी तडफडत असताना शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ चा प्रसार पाहून राज्य किंवा केंद्र सरकार ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे काय? असा सवाल करू लागला आहे. (शहर/तालुका प्रतिनिधी)