शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
4
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
5
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
6
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
7
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
8
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
9
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
10
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
11
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
12
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
13
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
14
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
15
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
16
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
17
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
18
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
19
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
20
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार

पवनी, तुमसरात दुष्काळाचे सावट

By admin | Updated: September 11, 2015 00:58 IST

श्रावण महिना संपत असला तरी वरूण राजाची मुक्त हस्ताने हजेरी लागलेली नाही. परिणामी धान्याचे कोठार समजल्या जाणाऱ्या ...

हजारों एकर शेतजमिनीला पडल्या भेगा, पावसाअभावी उत्पादन घटण्याची शक्यतातुमसर/ पवनी : श्रावण महिना संपत असला तरी वरूण राजाची मुक्त हस्ताने हजेरी लागलेली नाही. परिणामी धान्याचे कोठार समजल्या जाणाऱ्या तुमसर तथा चौरास भागातील पवनी तालुक्यात दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली आहे.शेतीत सिंचनाचे कोणतेही माध्यम आता उपलब्ध नसल्याने हजारो एकर शेतजमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना धान उत्पादन होणार असल्याची आशा धुसर झाली आहे.तुमसर तालुक्यात चिचोली हे गाव जंगलव्याप्त आहे. या गावात दोन मोठे रानतलाव आहेत. पावसाळा सुरू होताच जंगलवाटे या तलावात पाणी जमा होवून ते तुडूंब भरतात. या दोन तलावाच्या पाण्याने शेकडो हेक्टरातील पिक ओलीताखाली येवून शेतकरी धानाचे उत्पादन घेतात. मात्र तीन महिन्यांचा कालावधी संपून जात असतानाही पावसाने हजेरी लावली नाही. चिचोली मोकोटोला या गावातील शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करणारे रानतलाव कोरडेच आहेत. बहुतांश शेतकऱ्यांनी शेतजमिन पडीकच ठेवली. काही मुबलक शेतकऱ्यांकडे सिंचनाचे साधन, सुरूवातीला पावसाची हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. शेतविहीरद्वारे मोटारपंप लावून प्रसंगी ट्रॅक्टर चालवून शेतमजुरांना अधिकचे पैसे मोजून रोवणी उरकवली. पाऊस आज येणार उद्या येणार, या आशेने शेतविहीरीतील पाणी सिंचनकरून जगविले. मात्र पावसाने काही कृपादृष्टी दाखविलीच नाही. उलट शेतविहरी कोरड्या पडल्याने व तळ गाठल्याने शेतपिकांना जगविणे कठिण झाले आहे.पाऊस येणार, शेतीला पाणी मिळणार व उत्पन्न मिळणार, या आशेने शेतकऱ्यांनी सोसायट्या, पतसंस्था, सावकारांकडून, बँकांकडून कर्ज घेतले. शेतीच्या मशागतीकरिता, रोवणीकरिता तसेच रासायनिक खताकरिता अतोनात पैसे खर्च केले. मात्र पावसाने दगा दिल्याने तलाव विहीर कोरडे पडले आहेत. सिंचनाअभावी शेतकऱ्यांनी लावलेली पिके पिवळसर पडून करपली असताना शेत जमिनीत आता भेगा पडल्याचे विदारक चित्र आहे. चिचोली येथील सुरेश काळसर्पे, बाबु हेडावू, अजय चंद्रीकापुरे, विलास रहांगडाले, भगवान मोहनकर, ईश्वर काळसर्पे, वामन गाढवे, रामचंद्र मोरे, फकिरा उके आदी शेतकऱ्यांनी चांगले उत्पन्न होणार, या आशेने होत नव्हते ते सर्व पणाला लावून आतापर्यंत शेती कशी बशी जगविली. त्यातही अतोनात पैसा खर्च घालावा लागला आहे. पवनी : तालुक्यात भातपीक व सोयाबीन पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून पाऊस अनियमित असल्याने भातपिकाची रोवणी व सोयाबीन पिकाची पेरणी प्रभावित झालेली होती. शेकडो हेक्टर शेती अजूनही पडीत आहे त्याची आकडेवारी गोळा करण्यात आलेली नाही. ज्या शेतीमध्ये रोवणी व पेरणी केलेली आहे, त्या शेतीला पावसाची नितांत गरज आहे. परंतु पाऊस पडत नाही त्यामुळे शेततळी, तलाव, बोड्या, विहिरी, नहर अशा ज्या स्त्रोतात पाणी उपलब्ध आहे त्या ठिकाणचे पाणी इंजिनद्वारे देवून शेतातील पिक वाचविण्याचा शेतकरी आटोकाट प्रयत्न करीत आहे.तालुक्यात सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेततळी, तलाव किंवा बोड्यांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध नाही. तरीही उपलब्ध पाणीसाठा वापरून शेतकरी पुढे पाऊस येईल, या आशेवर पिक जगविण्यासाठी पाणी देत आहे. भातपिकासाठी आतापासून पिक कापणीला येईस्तोवर चार ते पाच वेळा पाणी देण्याची गरज आहे. परंतु तलाव बोड्यांमध्ये तितका पाणीसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. पाऊस न पडल्यास दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेतकरी पावसाअभावी जसा त्रस्त आहे तसाच भात व सोयाबीन पिकावर आलेल्या वेगवेगळ्या किडींच्या प्रादुर्भावामुळे देखील त्रस्त आहे. गरजेनुसार रासायनिक खताची मात्रा देवून पिकाला संजीवनी देण्याचा प्रयत्न करीत असताना पिक वाचविण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करावी लागत आहे. दुबारपेरणीमुळे खचलेला व कर्जबाजारी झालेला शेतकरी अन्नधान्याच्या उत्पादनासाठी तडफडत असताना शासनाच्या ‘स्मार्ट सिटी’ चा प्रसार पाहून राज्य किंवा केंद्र सरकार ‘स्मार्ट व्हिलेज’ करण्यासाठी प्रयत्न करणार आहे काय? असा सवाल करू लागला आहे. (शहर/तालुका प्रतिनिधी)