शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमान योजना रखडण्याच्या मार्गावर

By admin | Updated: September 1, 2015 00:29 IST

अनुसूचित जातीमधील भूमिहीन शेतमजूर व नवबौद्धांच्यासबलीकरणासाठी राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेली स्वाभिमान योजना नियोजनाअभावी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भूमिहिनांचे स्वप्न भंगणार : लाभार्थी योजनेच्या माहितीपासून वंचितपहेला : अनुसूचित जातीमधील भूमिहीन शेतमजूर व नवबौद्धांच्यासबलीकरणासाठी राज्य शासनामार्फत सुरू करण्यात आलेली स्वाभिमान योजना नियोजनाअभावी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय सांस्कृतिक कार्य क्रीडा व विशेष सहाय्य विभागान्वये स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जातीतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर, परित्यक्ता, विधवा, स्त्रियांच्या कुटुंबीयांना शासनाच्या योजनेप्रमाणे उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करून योजनेत बसणाऱ्या कुटुंबाला शासनाकडून चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर ओलिताखालील जमीन करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार होती. त्यात ५० टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज व ५० टक्के रक्कम अनुदानाची या आधारावर ही जमीन उपलब्ध करून देण्यात येणार होती. मात्र ही जमीन विकण्यासाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांकडून शासकीय दराप्रमाणे विकत घेण्यात येणार आहे. कर्जाचा भाग वित्तीय संस्था अथवा राष्ट्रीय अनुसूचित जाती व विकास महामंडळ नवी दिल्ली किंवा राष्ट्रीयकृत आणि सहकार बँक या संस्थेकडून उपलब्ध करून देण्यात येणार, एनएफडीसी कर्जावर राज्य शासनाची हमी राहील, असे या योजनेचे धोरण आहे. अनेक भूमिहीन नागरिकांनी जिल्ह्यात रीतसर अर्ज सुद्धा केले. परंतु बोटावर मोजण्याइतक्याच भूमिहिनांना या योजनेचा फायदा मिळाला. शासकीय दरामध्ये शेतकरी जमीन विकण्यासाठी तयार नसल्याने भूमिहिनांच्या पदरी निराशाच झाली आहे. पडीक जमीन कसण्यास उपलब्ध करून दिल्यास ती जमीन सर्वदृष्ट्या शेती करण्यास परवडणारी असेल काय, जमीन उपलब्ध झाल्यास ती जमीन कसण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. परिणामी शासनाचे हुकूमशाही धोरण व अधिकाऱ्याकडून भूमिहिनांची होणारी अवहेलना यापुढे स्वाभिमान योजना यशस्वी करण्याचे मोठे आवाहन शासनापुढे आहे. ही योजना सुरू होऊन आता बरीच वर्षे झाली. परंतु आतापर्यंत मोजक्याच भूमिहिनांना शतजमिनी मिळाल्या आहेत. शासनाच्या धोरणानुसार दलितांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या योजनेची माहिती बऱ्याच दलित लाभार्थ्यांना नाही. त्यामुळे या योजनेवर अनेक प्रश्नचिन्ह लागले आहेत. (वार्ताहर)