शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

शहरातील मंगल कार्यालयांचे पार्किंग रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 22:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लग्नसराईचा हंगाम सद्यस्थितीत जोमात सुरु आहे. वैवाहिक समारंभ पार पडणाऱ्या मंगल कार्यालयात वऱ्हाड्यांची हाऊसफुल्ल गर्दी दिसत आहे. तर दुसरीकडे कार्यालय व सभागृहाबाहेरच्या रस्त्यावर मोटारसायकल व अन्य वाहने अस्त्यव्यस्तपणे ठेवली जात आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.शहरात सद्यस्थितीत २० ते २५ मंगल कार्यालय व सभागृह आहेत. ...

ठळक मुद्देरहदारीला अडथळा : अपघाताची शक्यता, पोलीस व नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लग्नसराईचा हंगाम सद्यस्थितीत जोमात सुरु आहे. वैवाहिक समारंभ पार पडणाऱ्या मंगल कार्यालयात वऱ्हाड्यांची हाऊसफुल्ल गर्दी दिसत आहे. तर दुसरीकडे कार्यालय व सभागृहाबाहेरच्या रस्त्यावर मोटारसायकल व अन्य वाहने अस्त्यव्यस्तपणे ठेवली जात आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.शहरात सद्यस्थितीत २० ते २५ मंगल कार्यालय व सभागृह आहेत. बऱ्याच सभागृहांना व मंगल कार्यालयात पार्कींगची सोय नाही. या ठिकाणी वर्षभर विविध कार्यक्रम होतात. लग्नसराईच्या हंगामात तर प्रत्येक दिवस या कार्यालयात गर्दी असते. समारंभासाठी येणारे आमंत्रित पाहुणे, वऱ्हाडी, लक्झरी गाड्या, चारचाकी व दुचाकीने येतात. विशेष म्हणजे ही सर्व वाहने ठेवण्यासाठी मंगल कार्यालयात स्वतंत्र पार्कींगची सोय असणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात तसे दिसत नाही. मंगल कार्यालय किंवा सभागृह सुरु करताना मालकाला नगरपालिकेची परवानगी घेणे गरजेचे आहे. पार्कींगची सोय, उरलेल्या अन्नाची विल्हेवाट, शेजारच्या नागरिकांना त्रास होण्याची हमी आदी अटी पूर्ण केल्यावरच पालिकेतर्फे नाहरकत प्रमाणपत्र दिले जाते. परंतु प्रत्यक्षात या अटीचे पालन होताना दिसत नाही. शहरातील मोक्याच्या ठिकाणी असणाºया अनेक प्रसिद्ध व वर्दळ असणाऱ्या मंगल कार्यालये व सांस्कृतिक सभागृहासमोर वाहनतळ नाही. त्यामुळे कुठलाही समारंभ व कार्यक्रम असल्यास त्या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांच्या गाड्या, दुचाकी व अन्य वाहने कार्यालयासमोर व रस्त्याच्या कडेला ठेवल्या जातात. विशेष म्हणजे या मार्गाने शहरातील मुख्य वाहतूक सुरु असते. मोठ्या बसेस, कार व इतर छोटी मोठी वाहन रस्त्यावर उभी असतात. त्यामुळे या मार्गाला रस्ता म्हणावे की, पार्कींग प्लेस असा प्रश्न पडतो. सभागृहाचे मालक या व्यवसायातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. त्यामुळे पार्कींग ही अत्यावश्यक सेवा पुरविणे ही सुद्धा त्यांची जबाबदारी आहे. परंतु नगरपालिकांना किंवा पोलीस प्रशासन या विरोधात कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही. त्यांना नोटीस पाठविले जात नाही. त्यामुळे दररोज लाखोंची आवक असणारे कार्यालयाचे मालक वा संचालक या गोष्टींकडे बेजबाबदारपणे पाहत आहेत.अरुंद रस्ते, त्यातच रस्त्याच्या बाजूला अस्त्यवस्तपणे ठेवलेल्या वाहनांमुळे या रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित होत आहे. अनेक वेळा सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. किरकोळ अपघाताच्या घटना रोजच्या रोज घडत आहेत. यातच वादावादीचे प्रमाणही वाढत आहेत. मंगल कार्यालय व सभागृहाच्या मालकांच्या बेजबाबदारपणाचा फटका सामान्य नागरिकांनी का सोसावा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलीस व नगरपालिका प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे.