शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

धानपीक करपले

By admin | Updated: March 22, 2017 00:33 IST

उन्हाळी धानपिकाला वेळेवर पाणी मिळत नसल्याने जगाच्या पोशिंद्यावर पुन्हा दुष्काळाचे सावट आले आहे.

पोशिंदा संकटात : पाण्याअभावी परिस्थिती बिकटविलास बन्सोड उसर्राउन्हाळी धानपिकाला वेळेवर पाणी मिळत नसल्याने जगाच्या पोशिंद्यावर पुन्हा दुष्काळाचे सावट आले आहे.परिसरातील उसर्रा, सालई (खुर्द), टांगा, काटेबाम्हणी, सिहरी, ताडगाव, धोप टाकला आदी गावात बहुतेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पीक घेतली. यात हलक्या जातीचे धान लावण्यात आले असून मागील उन्हाळी धानपिकाच्या तुलनेत यंदा जास्त प्रमाणात उन्हाळी धान पीक लावले असल्याची माहिती आहे. यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतावर बोरवेल आहेत तर काही शेतकऱ्यांना बावनथडी धरणाचे पाणी मिळेल अशा आशेने धानपिक लागवड करण्यात आली.सुरुवातीला विद्युत विभागाची कृषीपंप चालु होते. पण कालांतराने विद्युत महामंडळाकडून विजेचे भारनियमन लावण्यात आले. यासाठी शेतकऱ्यांना फक्त सहा तासांचा विद्युत पुरवठा होता. त्यामुळे बहुतेक शेतकऱ्यांचे पऱ्हे पाण्याअभावी सडते तर काहींना पुन्हा दुबार पेरणी करावी लागली. काही दिवसानंतर विद्युत विभागाकडून बारा तास विद्युत शेतकऱ्यांना सुरु करण्यात आली. पण सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने बहुतेक शेतकऱ्यांचे बोरवेलच्या पाण्याची पातळी खालावली आहे. बहुतेक बोरवेल निकामी झाल्याने शेतीला पुरेसा पाणी मिळत नसल्याने शेतातील धानपिके नष्ट होणाच्या मार्गावर असून बळीराजा चिंतातूर झाला आहे. जीवनदायीनी बावनथडी धरण, शेतकऱ्यांचे वरदान ठरणारा असा महत्वाकांक्षी प्रकल्प काही शेतकऱ्यांनी बावनथडीचे पाणी मिळेल अशा आशेने धानपिके कापली. धरणात अजूनही पाणी शिल्लक आहे. बावनथडी धरणाचे पाणी शेतकऱ्यांना मिळाल्यास शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो. नाहीतर जगाचा पोशिंदा असलेला हा अन्नदाता पुन्हा दुष्काळाचा गदड छायेत जाण्याची शक्यता आहे. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.