शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

पालांदूर परिसर पावसासाठी आतुरलेलाच

By admin | Updated: July 20, 2015 00:29 IST

चक्क दोन आठवडे रजेवर असलेला वरुणराजा काल शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हजेरी लावली.

१७.६ मिमी पावसाची हजेरी : पावसाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिलपालांदूर : चक्क दोन आठवडे रजेवर असलेला वरुणराजा काल शनिवारी सायंकाळी ६ च्या सुमारास हजेरी लावली. अवकाशात ढग दाटून आले, गडगडाट सुरु झाला. जोरदार वर्षावाची आस लागली असतानाच आशा निराशेत बदलली. केवळ १७.६ मिमी पावसाची नोंद झाली. काल आठवडी बाजार असतांना पावसाची हजेरी पाहून शेतकऱ्यांसह मजुरांनी काही अंशी समाधान व्यक्त केले. अर्धा तास गर्दी जमली पण पाऊस थांबल्याने जैसे-थे सघडले.पालांदूर परिसरात कृषी विभागाच्या अंदाजानुसार ११७८४.४५ एकूण हेक्टरपैकी प्रत्यक्षात आवत्या १२७७ हेक्टर, रोवणी १२३०, पऱ्हे ९३७.६४ (नर्सरी), तूर ७४१, हळद १९.८, ऊस १९.९०, केळी ६.२०, भाजीपाला २८.३० इतर ४८.४० हेक्टरवर पिकांची लावगड केली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापासून धुळपेरणीस आंरभ झाला असून पावसाने ओढताण दिल्याने पिक संकटात आले आहे. चुलबंध नदीखोऱ्यात स्वतंत्र सिंचन क्षेत्रात ८० टक्के रोवणी आटोपली तर कोरडवाहू शेतीत केवळ १२ टक्के रोवणी उसनवारीवर झाली आहे. नदी, नाले, अजुनही कोरडेच आहेत. खर्चाची मर्यादा अतोनात वाढल्याने धान शेती पाण्याची सुध्दा परवडणारी राहिली नाही. पऱ्हे करपले असून कालचा पाऊस नर्सरीला जीवनदायिनी ठरला आहे. वेळ कमी असल्याने दुबारपेरणी न करता आहे त्यातच उरकवण्याचा विचार शेतकऱ्यांमध्ये सुरु आहे.ज्या ठिकाणी रोवणी करण्यात आली तिथे भेगा पडल्याने चिखलही कडक झाला आहे. यामुळे धानपिक जसा लावला तश्याच स्थितीत आहे. आता पाऊस आला ही तरी उत्पादनात निम्मा, पुरक अपेक्षीत आहे. मऱ्हेगाव फिडरवर पाणी आहे पण वीज नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मागील तीन वर्षांचा दुष्काळ डोक्यावर असतांना पुढचे नियोजन करने शेतकऱ्याला अवघड झाले आहे. उत्साहपूर्वक शेती कसण्याची मानसिकता उरली नाही. कृषी केंद्रात खते, किटकनाशके पडून आहेत. मागणीच नसल्याने कृषी केंद्रधारकही व्यवसाय कसा राहिल, या विवंचनेत आहेत. उधारीचे प्रमाण वाढून नफयाची टक्केवारी कमी झाली. यामुळे जोडधंदा म्हणून हार्डवेअर, सिमेंट विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या चार दिवसात मोठ्या पावसाची अपेक्षा दिसत नाही. परंतू आठवड्याभरात जर पावसाने जोरदार हजेरी लावली नाही तर रोवणी होणार नाही, असा शेतकऱ्यांचे म्हणने आहे. पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण होईल. जागृत नागरिक आतापासूनच दृष्काळ पाहून खर्च अत्यल्प करित आहे. बाजारपेठेत अजिबात चालना नाही. मंदीचे ग्रहण लागल्याचे विचार पालांदूरचे होलसेल किराणा व्यापारी हाजी इद्रिस लध्धानी, ईकाबाल भुरा, वसंता बारई, शालीक हटवार यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले. (वार्ताहर)