शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

रंगविलेल्या भाज्यांची बाजारात विक्री

By admin | Updated: June 8, 2014 23:43 IST

रंग हे जीवनात आनंद भरतात, परंतु हेच रंग भाज्यांमध्ये वापरले तर ते मनुष्यासाठी हानीकारक ठरू शकतात. भाज्यांना कृत्रिम रंग चढवून त्यांना विक्री करण्यासाठी भंडाराच्या बाजारात आणल्या जात आहे.

भंडारा : रंग हे जीवनात आनंद भरतात, परंतु हेच रंग भाज्यांमध्ये वापरले तर ते मनुष्यासाठी हानीकारक ठरू शकतात. भाज्यांना कृत्रिम रंग चढवून त्यांना विक्री करण्यासाठी भंडाराच्या बाजारात आणल्या जात आहे. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे, परंतु या प्रकाराकडे कुणाचेही लक्ष नसल्याने ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले  आहे.उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याच्या कमतरतेमुळे  भाजीपाला पिकांचा तुटवडा जाणवत आहे. यातूनच भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. असे असले तरी ग्राहक पिकलेले किंवा पिवळय़ा रंगाचा भाजीपाला खरेदी करीत नाही. हे कारण ओळखून भाजी विक्रेत्यांनी काटवल व कारले या दोन भाज्यांना हिरवा रंग चढवून त्या भाज्या विकणे सुरू केले आहे. हवामानाच्या बदलामुळे काटवल व कारल्यांचा रंग पिवळा पडतो. पिवळसर भाज्या ग्राहक खरेदी करीत नाहीत. या भाज्यांकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पोत्यांना लावण्यात येणारा रंग भाजीपाल्यांना लावण्यात येत आहे. भंडार्‍याच्या बाजारात येणारी काटवल छिंदवाडा येथून येत आहेत. तेथील घाऊक विक्रेता या काटवलाबरोबर भाजी विक्रेत्यांना हिरव्या रंगाचे पाकीटही पुरवितात, असे एका भाजी विक्रेत्या महिलेने सांगितले. मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे, परंतु याकडे कुणाचेही लक्ष गेलेले नाही. बाजारातील या अफलातून प्रकाराकडे ग्राहक संघटना, अन्न व औषध प्रशासन विभाग किंवा आरोग्य विभागाचेही लक्ष नाही. बाजारातील गर्दीमुळे त्या भाज्यांना चढविलेला रंग ओळखणे खरेदीदारांना ओळखणे कठीण जाते. ४५ रुपये प्रतिकिलो दराने रंग चढविलेले काटवल व कारले विक्री होत आहेत. मात्र या रंगमि२िँं१्रूँं१त भाजीची चव कडवट लागते.रंग दोन प्रकारचे असतात. एक रंग खाण्यायोग्य तर दुसरा खाण्यासाठी अयोग्य असतो. खाण्यासाठी अयोग्य असा रंग मानवाच्या शरीरात गेल्यास अनेक विकार होण्याची दाट शक्यता असते. त्या रंगाची परिणामकारकता अधिक असून ते जास्त काळ टिकून राहतात, असे वैद्यकीय अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे या प्रकाराला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. ग्राहकांना भाजीपाला हिरवागार दिसावा यासाठी काही भाजी विक्रेत्यांनी आपली शक्कल लढविली आहे. हिरव्यागार दिसणार्‍या भाज्यांकडे प्रत्येक ग्राहकाचे लक्ष जाते. मात्र रंगचढवून बाजारात विक्री होणार्‍या भाज्या आरोग्यासाठी हानीकारक आहेत. (नगर प्रतिनिधी)