शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

रंगविलेल्या भाज्यांची बाजारात विक्री

By admin | Updated: June 8, 2014 23:43 IST

रंग हे जीवनात आनंद भरतात, परंतु हेच रंग भाज्यांमध्ये वापरले तर ते मनुष्यासाठी हानीकारक ठरू शकतात. भाज्यांना कृत्रिम रंग चढवून त्यांना विक्री करण्यासाठी भंडाराच्या बाजारात आणल्या जात आहे.

भंडारा : रंग हे जीवनात आनंद भरतात, परंतु हेच रंग भाज्यांमध्ये वापरले तर ते मनुष्यासाठी हानीकारक ठरू शकतात. भाज्यांना कृत्रिम रंग चढवून त्यांना विक्री करण्यासाठी भंडाराच्या बाजारात आणल्या जात आहे. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार राजरोसपणे सुरू आहे, परंतु या प्रकाराकडे कुणाचेही लक्ष नसल्याने ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले  आहे.उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याच्या कमतरतेमुळे  भाजीपाला पिकांचा तुटवडा जाणवत आहे. यातूनच भाजीपाल्यांचे भाव गगनाला भिडलेले आहेत. असे असले तरी ग्राहक पिकलेले किंवा पिवळय़ा रंगाचा भाजीपाला खरेदी करीत नाही. हे कारण ओळखून भाजी विक्रेत्यांनी काटवल व कारले या दोन भाज्यांना हिरवा रंग चढवून त्या भाज्या विकणे सुरू केले आहे. हवामानाच्या बदलामुळे काटवल व कारल्यांचा रंग पिवळा पडतो. पिवळसर भाज्या ग्राहक खरेदी करीत नाहीत. या भाज्यांकडे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पोत्यांना लावण्यात येणारा रंग भाजीपाल्यांना लावण्यात येत आहे. भंडार्‍याच्या बाजारात येणारी काटवल छिंदवाडा येथून येत आहेत. तेथील घाऊक विक्रेता या काटवलाबरोबर भाजी विक्रेत्यांना हिरव्या रंगाचे पाकीटही पुरवितात, असे एका भाजी विक्रेत्या महिलेने सांगितले. मागील काही दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे, परंतु याकडे कुणाचेही लक्ष गेलेले नाही. बाजारातील या अफलातून प्रकाराकडे ग्राहक संघटना, अन्न व औषध प्रशासन विभाग किंवा आरोग्य विभागाचेही लक्ष नाही. बाजारातील गर्दीमुळे त्या भाज्यांना चढविलेला रंग ओळखणे खरेदीदारांना ओळखणे कठीण जाते. ४५ रुपये प्रतिकिलो दराने रंग चढविलेले काटवल व कारले विक्री होत आहेत. मात्र या रंगमि२िँं१्रूँं१त भाजीची चव कडवट लागते.रंग दोन प्रकारचे असतात. एक रंग खाण्यायोग्य तर दुसरा खाण्यासाठी अयोग्य असतो. खाण्यासाठी अयोग्य असा रंग मानवाच्या शरीरात गेल्यास अनेक विकार होण्याची दाट शक्यता असते. त्या रंगाची परिणामकारकता अधिक असून ते जास्त काळ टिकून राहतात, असे वैद्यकीय अधिकार्‍याने सांगितले. त्यामुळे या प्रकाराला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. ग्राहकांना भाजीपाला हिरवागार दिसावा यासाठी काही भाजी विक्रेत्यांनी आपली शक्कल लढविली आहे. हिरव्यागार दिसणार्‍या भाज्यांकडे प्रत्येक ग्राहकाचे लक्ष जाते. मात्र रंगचढवून बाजारात विक्री होणार्‍या भाज्या आरोग्यासाठी हानीकारक आहेत. (नगर प्रतिनिधी)