शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
2
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
3
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
4
१ नोव्हेंबरपासून करू शकणार २३९० रुपयांत हवाई प्रवास, या दिग्गज कंपनीनं केली मोठी घोषणा
5
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
6
राष्ट्रीय महामार्गावरील अस्वच्छ शौचालयाचा फोटो पाठवा, Fastag मध्ये ₹१००० रुपये मिळवा; काय आहे हा प्रकार?
7
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!
8
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
9
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
10
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
11
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
12
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
13
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
14
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
15
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
16
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
17
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
18
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
19
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
20
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 

धान उत्पादक शेतकरी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 06:00 IST

भंडारा जिल्ह्यात शासनाच्या वतीने आधारभूत किमतीत धान खरेदीला १ नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात मंजूर ६७ केंद्रांपैकी ६६ केंद्रांवर खरेदी सुरु आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या मार्फत धानाची खरेदी करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८ हजार ७६ शेतकऱ्यांनी २ लाख ९० हजार ६१२ क्विंटल धान विकला आहे.

ठळक मुद्देचुकारे रखडले : आधारभूत धान खरेदी केंद्रावर सुविधांचा अभाव, बारदान्याचा तुटवडा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांनी धान विकण्यासाठी आधारभूत केंद्रावर एकच गर्दी केली असून दररोज शेकडो क्विंटल धानाची विक्री होत आहे. मात्र गत महिनाभरात विकलेल्या धानाचे चुकारे अद्यापही मिळाले नाहीत. दुसरीकडे धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असून खरेदीच्या संथ गतीने दहा ते पंधरा दिवस विक्रीसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.भंडारा जिल्ह्यात शासनाच्या वतीने आधारभूत किमतीत धान खरेदीला १ नोव्हेंबर पासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात मंजूर ६७ केंद्रांपैकी ६६ केंद्रांवर खरेदी सुरु आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या मार्फत धानाची खरेदी करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ८ हजार ७६ शेतकऱ्यांनी २ लाख ९० हजार ६१२ क्विंटल धान विकला आहे. धान विक्रीसाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागते. या ऑनलाईन नोंदणीसाठी शेतकऱ्यांना सुरुवातीला मोठा त्रास सहन करावा लागला. ग्रामीण भागात इंटरनेटची कनेक्टीवीटी राहत नसल्याने शहर गाठून ऑनलाईन नोंदणी करण्यात आली. ठरलेल्या दिवशी खरेदी केंद्रावर धान घेऊन शेतकरी पोहचले. परंतु तेथे धान ठेवायलाच जागा नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांना आपला धान उघड्यावर ठेवावा लागत आहे.धान खरेदी केंद्रावर अतिशय संथ गतीने मोजणी केली जात आहे. बहुतांश धान खरेदी केंद्रावर एकच काटा असल्याने मोजणीची अडचण निर्माण होते. तसेच अपुऱ्या बारदान्यामुळेही खरेदी प्रभावित झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक धान खरेदी पालांदूर केंद्रावर झाली असून तेथे १३ हजार ६८० क्विंटल धान खरेदी करण्यात आला. परंतु आता तेथे बारदान्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात तेथील खरेदी थांबविण्याची वेळ सेवा सोसायटीवर येणार आहे. अशीच स्थिती जिल्ह्यातील इतरही आधारभूत धान खरेदी केंद्राची आहे.धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत. शेतकºयांना मुक्काम करावा लागला तर उघड्यावरच मुक्काम करण्याची वेळ येते. रात्री थंडीत कुडकुडत आपल्या धानाचे रक्षण करावे लागते. गतवर्षीच्या गोदामाचे भाडे थकीत असल्याने नवीन गोदाम मिळविणेही कठीण झाले आहे. त्यामुळे खरेदी केलेला धानसाठा करण्याचा प्रश्न फेडरेशनपुढे आहे. या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने धान उत्पादक शेतकरी वाºयावर आहेत.विधानसभा अध्यक्षांकडून शेतकऱ्यांना अपेक्षाशेतकरी नेते आणि धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांची प्रचंड जाण असलेले साकोलीचे आमदार नाना पटोले यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शासनाच्या माध्यमातून धान उत्पादकांच्या समस्या ते निश्चितच सोडवतील अशी अपेक्षा आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने केली आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता अडचणीत सापडलेल्या भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकºयांना त्यांच्याकडून मोठी अपेक्षा आहे.हुंड्या पाठविल्या पण पैैसेच नाहीतभंडारा जिल्ह्यात २३ नोव्हेंबर पर्यंत खरेदी केलेल्या धानाच्या हुंड्या मुंबई येथील कार्यालयात आल्या आहेत. परंतु अद्यापपर्यंत पैसेच आले नाहीत. पैशाला विलंब होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांनी आपल्या घरातील पूर्ण धान आधारभूत किमतीत विकले. परंतु आता पैशासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. अडचणीतील शेतकऱ्यांना पैशाची निकड आहे.अधिकारी नसल्याने चुकाऱ्यास विलंबसंपूर्ण धान खरेदीचे नियंत्रण असलेले भंडारा येथील जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय सध्या कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाली दिसत आहे. येथील जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांची ८ नोव्हेंबरला बदली करण्यात आली. त्यानंतर नवीन जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांची नियुक्तीही झाली. परंतु ते वैद्यकीय रजेवर गेले आहेत. त्यामुळे २३ नोव्हेंबरनंतर खरेदी केलेल्या धानाच्या हुंड्या पाठविणे अत्यंत अडचणीचे जात आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचे पैसे मिळण्यास विलंब होत असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड