शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार हेक्टरवरील धानपीक करपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 21:43 IST

शेतकरी म्हंणजे नानाविध समस्यांचे बिऱ्हाड वाहून नेणारे साधन ठरले आहे. जिल्हा प्रशासनाने आश्वासन देऊनही पाणी दिले नाही. त्यामुळे वरठी परिसरातील ४ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतपिक जवळपास करपले आहे. धानपिकाला शेवटचे पाणी वेळेवर दिले नाही आणि आत्ता पाणी दिले तरी पीक येणार नाही अशी परिस्थती निर्माण झाली आहे.

तथागत मेश्राम ।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : शेतकरी म्हंणजे नानाविध समस्यांचे बिऱ्हाड वाहून नेणारे साधन ठरले आहे. जिल्हा प्रशासनाने आश्वासन देऊनही पाणी दिले नाही. त्यामुळे वरठी परिसरातील ४ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतपिक जवळपास करपले आहे. धानपिकाला शेवटचे पाणी वेळेवर दिले नाही आणि आत्ता पाणी दिले तरी पीक येणार नाही अशी परिस्थती निर्माण झाली आहे.पाणी मिळण्याची शक्यता धूसर झाली असून १०० टक्के दुष्काळजन्य परिस्तिथी निर्माण झाली आहे. वरठी भागातील ४ हेक्टर शेतजमीन ही रामटेक व नागपूर येथील पेंच प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. हे क्षेत्र प्रकल्पाच्या टेल म्हंणजे शेवटच्या टोकावर आहे.वरठीसह एकलारी, नेरी, पाचगाव, बोथली, पांजरा, मोहगाव, बीड, सोनुली, सिरसी, जमनी- दाभा आदी परिसरातील शेतकरी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. रविवारी लोकमत प्रतिनिधीने या भागाचा आढावा घेतला असता या भागातील ७० टक्के पीक गेल्यागत जमा आहे. काही भागातील शेतात धान उभे असले तरी त्याला पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन होणार असल्याचे दिसते. अनेक शेतात पाणी न मिळाल्याने भेगा पडल्या आहेत.१ आॅक्टोबरला वरठी येथे आंदोलन झाले. यात शेतकऱ्यांना तत्काळ पाणी देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. पण ८ दिवस लोटूनही थेंबभर पाणी मिळाले नाही. पाणी मिळण्याच्या आशेवर शेतकरी होता, पण पाणी मिळाले नाही. शेतकरी विवंचनेत सापडला आहे. दरम्यान पाचगाव व एकलारी येथील शेतकºयांशी चर्चा केली असता त्यांनी आपली व्यथा मांडली. प्रत्येक जण शेतातील पीक दाखवण्यासाठी धडपडत होता. टिकाराम मारवाडे, प्रेमलाल बालपांडे, ताराचंद शहरे, नरेश वंजारी, ग्याशीलाल पटले व संजू गणवीर यांच्या शेतातील पीक पूर्णत: गेल्याचे सांगितले. नेरी येथील राजू हजारे, सेवक मलेवार, प्रल्हाद कारेमोरे, रमेश उमरकर, डोकेपर पांडुरंग किरपाने, वासुदेव हिवसे, लक्ष्मण मारवडे व चंद्रभान रामटेके आणि मोहगाव येथील शेतकऱ्यांनी सारखीच गऱ्हाणी मांडली.जिल्हा प्रशासनाची पोकळ घोषणाशेतकऱ्याचे आंदोलन लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना प्रकल्पाचे पाणी मिळणार असल्याचे जाहीर केले. या घोषणेला जवळपास आठवडा लोटला, पण अद्याप शेतीला पाणी मिळाले नाही. शेतकरी हवालदिल असताना जिल्हा प्रशासनाने पोकळ आश्वासन देऊन दिशाभूल झाल्याने शेतकरी संतापलेले आहेत. प्रकल्प अधिकाºयाचे असहयोग असताना जबाबदार अधिकारी खोटी घोषणा देत असतील तर शेतकऱ्यांनी न्याय कुणाला न्याय मागायचे. प्रकल्प अधिकारी यांनी तात्काळ पाणी सोडण्याचे तहसीलदार मोहाडी यांना लेखी आश्वासन दिले. आठ दिवस होऊनही शेतकऱ्यांना थेंबभरही पाणी मिळाले नाही. वरठी भागात असलेल्या मोहगाव, डोकेपार, बोथली पांजरा, एकलारी व पाचगाव भागात असलेल्या नहर कोरडेच आहेत. जिल्हाधिकारी यांची भेट घालवून देण्याचे शेतकऱ्यांना आश्वासन देत तहसीलदार स्वत: बाहेर गेले.च्प्रकल्पाचे पाणी शेतात नहराच्या माध्यमातून येते. नहराच्या देखभाल दुरुस्तीत गैरप्रकार झाल्याचे दिसते. दुरुस्तीवर खर्च दाखवण्यात येते. मात्र प्रत्यक्षात कुठलेही काम झाले नाही. नहाराची देखभाल दुरुस्ती न झाल्याने गवत उगवले आहे.पाण्याचा निचरा योग्य होणार नाही. यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च दाखवण्यात येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. परिसरातील काही शेतकऱ्यांच्या शेतात असलेले पाणी २०० रुपये तासाप्रमाणे विकत घेऊन पीक वाचवण्यासाठी धडपड सुरु आहे. शेतपिक गेल्याने आर्थिक व मानसिक नुकसान शेतकऱ्यांच्या वाट्याला आले त्याबरोबर आंदोलनात गुन्हे दाखल झाल्याने हेलपाटे घालावे लागणार ती समस्या वेगळी. त्यांच्यामागे कारवाईसाठी ससेमिरा सुरु होणार हे मात्र निश्चित आहे.