शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

शेकडो एकरातील धानपीक धोक्यात

By admin | Updated: August 24, 2015 00:48 IST

कवलेवाडा येथे तलावाच्या गेट दुरुस्तीसाठी निधी असताना सुद्धा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी वेळेवर काम केले नसल्याने तलावात पाण्याचा ठणठणाट आहे.

आमगाव (दिघोरी) : कवलेवाडा येथे तलावाच्या गेट दुरुस्तीसाठी निधी असताना सुद्धा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी वेळेवर काम केले नसल्याने तलावात पाण्याचा ठणठणाट आहे. त्यामुळे १०० एकर शेती पाण्यापासून धोक्यात आली आहे.येथील तलावाच्या खोलीकरणाचे मातीकाम व गेट दुरुस्तीचे काम रोहयोमधून दोन वर्षापूर्वी मंजूर करण्यात आले. या वर्षी मार्चमध्ये मातीकाम करण्यात आले. हे काम जवळपास २२ लाखांचे असून १२ ते १३ लाख रुपये मातीकामावर खर्च करण्यात आले. उर्वरीत रक्कम तलावाची गेट दुरुस्तीसाठी वापरण्यात येणार होती. मात्र या कामाला मे ते जून मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली. जून मध्येच पावसाळ्याला सुरुवात होणार म्हणून ग्रामपंचायत कवलेवाडा यांनी काम सुरु केले नाही. मात्र यावर्षी पावसाळ्याला उशिरा सुरुवात झाला. परिसरामध्ये पावसाचे प्रमाण कमी आहे. या तलावाच्या गेटचे काम न केल्यामुळे तलावातील पाणी साठवून राहत नाही. या तलावामुळे कवलेवाडा येथील १०० एकर धान शेतीला पाण्याची सोय होत असते. येथील ग्रामपंचायत विकास कामासाठी नेहमी दिरंगाई करीत असल्याचा आरोप गावकरी करीत आहेत. निधी मंजूर नसता तर एकवेळ समजू शकले असते. मात्र निधी खात्यामध्ये पडून आहे. त्या निधीचा उपयोग गावकऱ्यांसाठी होत नाही. शासन सिंचनाला प्राधान्यक्रम देण्याची भाषा करीत आहे. मात्र अधिकारी मनमर्जीप्रमाणे कामे करीत आहेत. तलावाची गेट बंद करण्यात आली नसल्याने पाणी साठवण होत नाही. जर एका पाण्याअभावी येथील धानपिके गेली तर त्याची नुकसान भरपाई ग्रामपंचायत अधिकाऱ्यांकडून वसूल करावी, अशी मागणी कवलेवाडासीयांनी केली आहेत. (वार्ताहर)