शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

बोनसविना धान उत्पादक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 05:00 IST

दरवर्षी कुठल्या ना कुठल्या कारणाने धानाचे उत्पादन घटत आहे. खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. मजुरी, रासायनिक खत, बीजाई, शेतीउपयोगी अवजारे, इंधन आणि कीटकनाशक औषधांचे दर गगनाला भिडले आहेत. खरेदी केंद्रावर धानाचे दर क्विंटलमागे अनेक वर्षांपासून जवळपास जैसे थे आहेत. शेतकऱ्यांना तात्पुरते खूश करण्यासाठी फसवी अत्यल्प वाढ केली जाते. मात्र त्या तुलनेत मजुरी व खताचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : यावर्षी शासनाने पावसाळी धानाची खरेदी केली. परंतु बोनस अजिबात नाकारल्याने शेतकरी हवालदिल बनला आहे. तसेच कृषी कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्याच्या शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाबाबतीत शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवार यांनी याबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होईल, याची शाश्वतीही शेतकऱ्यांना उरली नाही. दरवर्षी कुठल्या ना कुठल्या कारणाने धानाचे उत्पादन घटत आहे. खर्च मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. मजुरी, रासायनिक खत, बीजाई, शेतीउपयोगी अवजारे, इंधन आणि कीटकनाशक औषधांचे दर गगनाला भिडले आहेत. खरेदी केंद्रावर धानाचे दर क्विंटलमागे अनेक वर्षांपासून जवळपास जैसे थे आहेत. शेतकऱ्यांना तात्पुरते खूश करण्यासाठी फसवी अत्यल्प वाढ केली जाते. मात्र त्या तुलनेत मजुरी व खताचे भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गत अनेक वर्षात धानपिकाला मिळणाऱ्या बोनसमुळे शेतकरी काही प्रमाणात का होईना, पण आनंदी होता. यंदा बोनस बंद करण्याचा शासनाने करंटेपणा केल्याने आधीच संकटात असलेला शेतकरी आणखी गोत्यात आला आहे. उशिरा का होईना, पण शासन बोनस जाहीर करेल अशी आशा होती. परंतु आता पुरता अपेक्षाभंग झाला आहे. बोनसऐवजी शासनाने धानाचे दर तरी उत्पादन खर्चाच्या तुलनेत वाढवावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.पावसाळी धान खरेदीचे चुकारे अद्यापही पूर्णपणे झालेले नाहीत. अशा अत्यंत बिकट अवस्थेत थकीत वीज बिलाचा भरणा न झाल्याने वीज वितरण कंपनीने ऐन उन्हाळी धान पिकाच्या हंगामात तुघलकी पद्धतीने कृषी पंपाची वीज कापणे सुरू केले होते. अगोदरच अनेक समस्यांमुळे ग्रस्त असलेला धान उत्पादक शेतकरी कृषी पंपांची वीज खंडित केल्याने हवालदिल बनला होता.  

शेतकऱ्यांच्या हिताचे भान ठेवून किमान एक हजार रुपये प्रति क्विंटल बोनस मिळावा अथवा आधारभूत खरेदी केंद्रावर धानाचे भाव कमीत कमी तीन हजार रुपये क्विंटल या दराने असावेत.- गंगाधर मोटघरे, शेतकरी, आसगाव.बोनस बंद झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. शासनाने त्वरित एक हजार प्रतिक्विंटल बोनस द्यावा व नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन राशीचा लाभ द्यावा.- गणेश नागपुरे, युवा शेतकरी, उमरी.

 

टॅग्स :Farmerशेतकरी