शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

प्रतिकूल हवामानाने धानपीक रोगग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST

शेतकऱ्यांना रबी आणि उन्हाळी पिकापासून आशा आहे. परंतु प्रतीकुल हवामानामुळे धान पीक संकटात सापडले असून भूजल पातळीही खालावली आहे. उन्हाळी धानाची ९० टक्के रोवणी पूर्ण झाली. मात्र हवामान पोषक नसल्याने कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी अधिकारी शेताच्या बांधावर पोहचत असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे.

शेतकरी चिंतेत : कृषी अधिकारी शेतशिवारात, फवारणीच्या सूचनालोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : खरीप हंगामात अवकाळी पावसाने धुमाकूळ घालून शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळविला. आता शेतकऱ्यांना रबी आणि उन्हाळी पिकापासून आशा आहे. परंतु प्रतीकुल हवामानामुळे धान पीक संकटात सापडले असून भूजल पातळीही खालावली आहे. उन्हाळी धानाची ९० टक्के रोवणी पूर्ण झाली. मात्र हवामान पोषक नसल्याने कीडींचा प्रादूर्भाव वाढला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी अधिकारी शेताच्या बांधावर पोहचत असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहे.दिवाळीपासून सतत पाऊस, ढगाळ वातावरण आहे. हे वातावरण कीडीला पोषक आहे. सद्यस्थितीत पालांदूर परिसरात उन्हाळी धानावर खोडकीड, करपाचा प्रादूर्भाव वाढला आहे. २०-२५ दिवसाच्या रोवणीला दोनवेळा फवारणी करूनही सुधारणा दिसत नाही. चुलबंध खोऱ्यात धानाची ५२३ हेक्टरवर लागवड झाली असून लाखनी तालुक्यात १७५२ हेक्टर रोवणी झाली आहे. एकट्या पालांदूरात हे क्षेत्र ४७ हेक्टर आहे. भाजीपाल्याचेही मोठे पीक या परिसरात घेतले जाते. धानासोबतच वातावरणातील बदलाचा परिणाम भाजीपाल्यावर होत आहे. बाजारात धानाला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकºयांची भीस्त उन्हाळी धानावर आहे. परंतु प्रतिकुल हवामान शेतकºयांना चिंतेत टाकत आहे.शेतकºयांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी अधिकारी शेताच्या बांधावर पोहचले आहे. कृषी मंडळ अधिकारी गणपती पांडेगावकर म्हणाले, धानाचे पीक वेळीच निंदन व खुरपन करू घ्यावे, अपेक्षित खताच्या मात्रा द्याव्या, कृषी सल्ल्यानुसारच खत टाकावे, कृषी निविष्ठांचे पक्के बिल द्यावे, असे आवाहन केले आहे. कीड नियंत्रणासाठी शेतकºयांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच फवारणी करावी, असे त्यांनी सांगितले.तापमानात अनपेक्षित बदलदिवस व रात्रीच्या तापमानात अनपेक्षित बदल जाणवत आहे. धानाला उष्ण हवामानाची गरज आहे. मात्र दुपारी उन्ह आणि रात्री कडाक्याची थंडी जाणवत आहे. खोडकीडीचेही आक्रमण झाले आहे. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी शेतकरी पुढे सरसावले आहे.शेतकºयांनी रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळून दशपर्णी अर्क, निंबोळी अर्काची फवारणी करावी. धानात खूप पाणी साठवून ठेवू नये, अधिक माहितीसाठी कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.-पद्माकर गिदमारे,तालुका कृषी अधिकारी लाखनी.

टॅग्स :agricultureशेती