शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

साहेब, बदाबदा पावसानं आता धान सडू लागले हो.. शेतकऱ्यांचा टाहो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2022 17:39 IST

पालांदूर परिसरातील बांध्यांना तलावाचे स्वरूप

ज्ञानेश्वर मुंदे

भंडारा : पंधरा दिवस झाले साहेब, पावसानं दम घेतला नाही. जास्तीच्या पाण्यानं धान सडू लागले आहे. काय करावं अन् काय नाही हे सुचेनासं झालं आहे. दुबार पेरणी व रोवणीला पैसा कुठून आणावा, याचंच आता टेन्शन आलं. ही व्यथा आहे लाखनी तालुक्यातील चूलबंद खोऱ्यांतील पालांदूर परिसरातील शेतकऱ्यांची!

गत दोन आठवड्यांपासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस कोसळत आहे. धानाच्या बांध्यांना तलावाचे स्वरूप आले असून, रोवणी झालेले धान पिवळे पडून सड्डू लागले आहे. लाखनी तालुक्यातील पालांदूर परिसर भाजीपाला पिकासाठी प्रसिद्ध आहे. या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात धानाची लागवड करतात; मात्र आता सारखा पाऊस कोसळत आहे. पालांदूर मंडळात सरासरी १२१ टक्के पाऊस झाला. पंधरा एकराची कास्तकारी करणारे ढिवरखेडाचे प्रशांत खागर सांगत होते, पाच एकरात धान रोवणी पूर्ण झाली; मात्र पावसाने रोवणी शक्य होत नाही.

रावणी झालेले पाच एकरातील धान सडण्याच्या मार्गावर आहे. नर्सरीतील पऱ्हे पावसाने उद्ध्वस्त होत आहेत. आता पाऊस थांबला की सर्वप्रथम पऱ्ह्यांची तजवीज करावी लागणा आहे. नाही तर शेती पडीक ठेवण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगत होते घोडेझरी शिवारात शेत असलेले गजानन हटवार. आनंदराव हटवार म्हणाले, रोवणी झालेल्या धानाला खताची मात्राही देता आली नाही. तणनाशक फवारून उपयोग नाही. बांध्यांत गवत वाढत आहे. पाऊस असाच राहिला तर संपूर्ण धान सडून जाईल. मऱ्हेगाव शिवारात शेत असलेले शेतकरी भगवान शेंडे, दामोधर फुंडे म्हणाले, आम्ही पीक विमा काढला आहे. त्याचा लाभ तरी शासनाने तत्काळ द्यावा.

रोवणी झालेल्या बांध्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. शेतकरी बांध्या फोडून पाण्याचा निचरा करीत असल्याचे दृश्य दिसून आले. गजानन भुसारी म्हणाले, बांध्या फोडून पाण्याचा निचरा केला तरी वरून पाऊस कोसळतच आहे. काही उपयोग होत नाही. आतापर्यंत अतिवृष्टीने ८ ते १० हजार रुपये पाण्यात गेले. पुढेही पीक हाती येण्याची शाश्वती नाही.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीbhandara-acभंडारा