शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

कालबाह्य वाहनातून प्रवासी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST

एका वाहनामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट ते तिप्पट प्रवाशांना बसविण्यात येते. वाहनामध्ये कोंबून प्रवाशांना बसविल्यानंतर त्यानंतर वाहनाच्या व्दारावरही प्रवाशांना बसविण्यात येते. गेल्या कित्येक वर्षांपासून जीप, मिनीडोअर, आॅटोरिक्षा, काळी-पिवळी, क्रूझर यासह इतर वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील चित्र : पोलिसांसह परिवहन विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सर्रास प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर धावत असून, याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यातच अवैध प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने कालबाह्य आणि भंगार असल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. या प्रकाराकडे पोलीस आणि परिवहन विभाग मात्र डोळेझाक करीत आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर सुसाट वेगाने धावताना दिसतात.एका वाहनामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट ते तिप्पट प्रवाशांना बसविण्यात येते. वाहनामध्ये कोंबून प्रवाशांना बसविल्यानंतर त्यानंतर वाहनाच्या व्दारावरही प्रवाशांना बसविण्यात येते. गेल्या कित्येक वर्षांपासून जीप, मिनीडोअर, आॅटोरिक्षा, काळी-पिवळी, क्रूझर यासह इतर वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. प्रवासी मिळविण्याच्या नादात ही वाहने भरधाव पळविली जातात. यातील अनेक वाहने तर १० ते १५ वर्षे जुनी आहे.काही वाहने खिळखिळी झाली आहे; मात्र कशाचीही तमा न बाळगता चालक बिनधास्तपणे वाहन पळवित आहेत. अनेक वाहनांच्या आतील सर्व रचनाच बदलण्यात आली असून, अधिकाधिक प्रवासी नेता यावेत म्हणून प्रवाशांना धड बसताही येत नाही अशी आसने तयार करण्यात आली आहेत. नऊ आसन क्षमतेच्या वाहनात १५ ते २० प्रवासी कोंबले जातात, तर वाहनाच्या मागे आणि व्दारावर पाच ते सात प्रवासी दिसून येतात. चालकाच्या शेजारीही चार प्रवासी बसविले जातात. त्यामुळे चालकाला गेअर बदलविणेही अशक्य होते.या प्रकारामुळे एखादवेळी भीषण अपघात घडून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे. हा सर्व प्रकार पोलीस आणि परिवहन विभागाला माहीत आहे; मात्र ते वाहनचालकांवर कारवाई करताना दिसत नाही.अनेक वाहनांवर तर विनापरवाना चालक वाहन चालविताना दिसतात. एक-दोन महिने कंडक्टर असलेला तरुण एका रात्रीतून चालक होतो आणि मोठ्या ऐटीत वाहन चालवितो. अशा तरुणांची सध्या मोठी गर्दी झाली आहे. भरधाव वेगाने वाहन चालविताना रस्ता कसा आहे याचीही तमा बाळगली जात नाही.रस्त्यातील खड्डयातून वाहन सारखे उसळत असते. एकीकडे जिल्ह्यातील बहुतांश मार्गावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांतून प्रवास करताना अनेकांना त्रास होत आहे. अशा स्थितीत कालबाह्य वाहनांतून प्रवास करताना जीव मुठीत ठेवावा लागतो.