शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

कालबाह्य वाहनातून प्रवासी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 06:00 IST

एका वाहनामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट ते तिप्पट प्रवाशांना बसविण्यात येते. वाहनामध्ये कोंबून प्रवाशांना बसविल्यानंतर त्यानंतर वाहनाच्या व्दारावरही प्रवाशांना बसविण्यात येते. गेल्या कित्येक वर्षांपासून जीप, मिनीडोअर, आॅटोरिक्षा, काळी-पिवळी, क्रूझर यासह इतर वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील चित्र : पोलिसांसह परिवहन विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सर्रास प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी वाहने रस्त्यावर धावत असून, याकडे वाहतूक विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यातच अवैध प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने कालबाह्य आणि भंगार असल्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. या प्रकाराकडे पोलीस आणि परिवहन विभाग मात्र डोळेझाक करीत आहे.जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. अवैध प्रवासी वाहतूक करणारी अनेक वाहने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर सुसाट वेगाने धावताना दिसतात.एका वाहनामध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट ते तिप्पट प्रवाशांना बसविण्यात येते. वाहनामध्ये कोंबून प्रवाशांना बसविल्यानंतर त्यानंतर वाहनाच्या व्दारावरही प्रवाशांना बसविण्यात येते. गेल्या कित्येक वर्षांपासून जीप, मिनीडोअर, आॅटोरिक्षा, काळी-पिवळी, क्रूझर यासह इतर वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. प्रवासी मिळविण्याच्या नादात ही वाहने भरधाव पळविली जातात. यातील अनेक वाहने तर १० ते १५ वर्षे जुनी आहे.काही वाहने खिळखिळी झाली आहे; मात्र कशाचीही तमा न बाळगता चालक बिनधास्तपणे वाहन पळवित आहेत. अनेक वाहनांच्या आतील सर्व रचनाच बदलण्यात आली असून, अधिकाधिक प्रवासी नेता यावेत म्हणून प्रवाशांना धड बसताही येत नाही अशी आसने तयार करण्यात आली आहेत. नऊ आसन क्षमतेच्या वाहनात १५ ते २० प्रवासी कोंबले जातात, तर वाहनाच्या मागे आणि व्दारावर पाच ते सात प्रवासी दिसून येतात. चालकाच्या शेजारीही चार प्रवासी बसविले जातात. त्यामुळे चालकाला गेअर बदलविणेही अशक्य होते.या प्रकारामुळे एखादवेळी भीषण अपघात घडून मोठी जीवित हानी होण्याची शक्यता आहे. हा सर्व प्रकार पोलीस आणि परिवहन विभागाला माहीत आहे; मात्र ते वाहनचालकांवर कारवाई करताना दिसत नाही.अनेक वाहनांवर तर विनापरवाना चालक वाहन चालविताना दिसतात. एक-दोन महिने कंडक्टर असलेला तरुण एका रात्रीतून चालक होतो आणि मोठ्या ऐटीत वाहन चालवितो. अशा तरुणांची सध्या मोठी गर्दी झाली आहे. भरधाव वेगाने वाहन चालविताना रस्ता कसा आहे याचीही तमा बाळगली जात नाही.रस्त्यातील खड्डयातून वाहन सारखे उसळत असते. एकीकडे जिल्ह्यातील बहुतांश मार्गावर जीवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांतून प्रवास करताना अनेकांना त्रास होत आहे. अशा स्थितीत कालबाह्य वाहनांतून प्रवास करताना जीव मुठीत ठेवावा लागतो.