शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मुदतबाह्य पोषण आहाराचा पुरवठा

By admin | Updated: January 11, 2016 00:26 IST

अड्याळ येथील एका बचत गटातर्फे येथील अंगणवाड्यांना पोषण आहाराचे बंद पॉकीट वाटप करण्यात आले.

अड्याळ येथील प्रकार : अधिकारी तुपाशी लेकरू उपाशीविशाल रणदिवे अड्याळअड्याळ येथील एका बचत गटातर्फे येथील अंगणवाड्यांना पोषण आहाराचे बंद पॉकीट वाटप करण्यात आले. मात्र सदर आहार मुदतबाह्य असल्याचे दिसुन आल्याने खळबळ उडाली आहे. उपयोगाची अंतिम कालावधी उत्पादन केल्याच्या तारखेपासून तीन महिनेपर्यंत स्पष्ट लिहिले असल्याचा मुद्दा जागरूक पालकांनी उचलला आहे. विशेष बाब म्हणजे पॅकींग सुद्धा हाताने करण्यात आली आहे. एकात्मिक बालविकास योजना त्यात ० ते ६ महिने, ६ ते ३ वर्षे व ३ वर्षे ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना तसेच गर्भवती व स्तनदा मातांना सुद्धा पुरक पोषण आहार, बचत गट द्वारा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत दिला जातो. त्याचे उद्दिष्ट्य एकच असते. ते म्हणजे मुलांचा पोषण आहार विषयक व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे. कुपोषण व शाळेतील गळती कमी करणे असे एक ना उद्दिष्ट्ये आहेत. ही चांगली बाब आहे. धान्य पुरवठा करणारे बचत गट यांचा आहार खरच पोषक असतो का? जर असेल तर मागील तीन वर्षात जेव्हा जेव्हा अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मागणीनुसार त्यात ‘टीएचआर’ आहार बंद करून नवीन चांगला पौष्टीक आहार देण्याची मागणीे अंगणवाडीतर्फे नेहमी करण्यात येते.माहितीनुसार हा पुरक पोषण आहार पुरवठा केला जातो. याचा दर्जा चेहरे पाहून, कागदोपत्री केल्या जात असल्या कारणामुळेच आंगणवाडी सेविका व मदतनिस नेहमी टीएचआर आहार बंद करावी मागणी केली आत असणार का? अशी चर्चा सर्वत्र होत आहे. हा पुरक पोषण आहार का वाटप करण्यात आला म्हणून येथील अंगणवाडी सेविका व मदतनिसाला मोठे आधिकारी टार्गेट करीत असले तरी जेव्हा या आहाराची प्रयोगशाळेत चाचणी झाली. जेव्हा या धान्यांची पॅकींग करण्यात आली आणि या आहाराचा या अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात आला तेव्हा अधिकाऱ्यांनी याची शहानिशा का केली नाही? असा सवाल ग्रामस्थांनी, ग्रामपंचयातीने केल्याची माहिती आहे. ज्या बचतगटाचे लेबल पॉकीटवर आहे ते २०१४ पासून परवानगी मिळालेली आहे. मग २०१३ चा शिक्का कसा? आजपावेतो पॅकींग मशीनची असायची, याच वेळी हाताने सिलाई का करण्यात आली, हेही एक न उलगडणारे कोडे आहे.ही माहिती जेव्हा पर्यवेक्षकांकडे यांच्यापर्यंत गेली, तेव्हा सर्व १० अंणगवाड्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा ‘प्रिंट मिस्टेक’ असल्याचे सांगण्यात आले. दिलेले पोषण आहार घरोघरी जाऊन भितीपोटी परत मागण्याचे काम सुरु आहे. बंद पॉकीटात असणाऱ्या आहारामुळे एखाद्या बालकाला किंवा मातेच्या आरोग्याला धोका उत्पन्न झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. पवनी तालुक्यात हा आहार वाटप होत असल्याचे बचत गट अध्यक्षांनी सांगितले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. याकडे विशेषत: दोषींवर जिल्हाधिकारी कोणती कारवाई करतात त्याकडे अड्याळवासीयांचे लक्ष लागून आहे.