शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

जिल्ह्यात सुक्ष्म सिंचनासाठी १४०४ अर्जांपैकी तब्बल ८९५ अर्ज झाले रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात धानासोबत मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. मुबलक पाणी असले तरी पाण्याचा योग्य वापर व्हावा आणि त्यातुन अधिक उत्पन्न व्हावे यासाठी सुक्ष्म सिंचनाकडे शेतकरी वळल्याचे दिसत आहे. मात्र अनुदानासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे उंबरठे झिजवावे लागते. अनेकदा लहान सहान कारणांसाठी अर्जही रद्द होतात. जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात १४०३ शेतकऱ्यांनी सुक्ष्म सिंचन योजनेतुन अर्ज केले.

ठळक मुद्दे४२४ शेतकऱ्यांना अनुदान : नोंदणी सुरु, निधीची शाश्वती नाही

    लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कमी पाण्यात अधिक उत्पन्न काढण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने सुक्ष्म सिंचन योजना राबविली जाते. ठिबक व तुषार सिंचनासाठी प्रोत्साहन अनुदानही दिले जाते. या योजनेत भंडारा जिल्ह्यात १४०३ शेतकऱ्यांनी अर्ज केले असुन त्यापैकी विविध कारणांनी तब्बल ८९५ शेतकऱ्यांचे अर्ज रद्द झालेत. जिल्ह्यातील केवळ ४२४ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे.  भंडारा जिल्ह्यात धानासोबत मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. मुबलक पाणी असले तरी पाण्याचा योग्य वापर व्हावा आणि त्यातुन अधिक उत्पन्न व्हावे यासाठी सुक्ष्म सिंचनाकडे शेतकरी वळल्याचे दिसत आहे. मात्र अनुदानासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे उंबरठे झिजवावे लागते. अनेकदा लहान सहान कारणांसाठी अर्जही रद्द होतात. जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात १४०३ शेतकऱ्यांनी सुक्ष्म सिंचन योजनेतुन अर्ज केले. त्यापैकी ८९५ अर्ज रद्द झाले. ६०५ लाभार्थी अनुदानासाठी पात्र ठरले. परंतु जिल्ह्यातील ४२४ शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला. १८१ अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत. काही शेतकऱ्यांनी संच खरेदी केले नसल्याची माहिती आहे. महत्वाचे म्हणजे दरवर्षी मार्च महिन्यात अनुदान मिळते. परंतु यावर्षी अद्यापही निधीची शाश्वती नाही.

४५% मिळते अनुदान

ठिबक आणि तुषार सिंचनासाठी शासनाकडून अल्प - अत्यल्प भुधारकांना ५५ टक्के तर पाच एकरापेक्षा अधिक शेती असणाऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिले जाते. ठिबक साठी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च होऊन ३२ हजार अनुदान जमा होते तर तुषार सिंचनासाठी २० हजार खर्च आणि ८ हजार अनुदान मिळते. 

अनुदान मिळण्यात आहेत अडचणीकेंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने अनुदान दिले जाते. दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस अनुदान जमा होते. मात्र यावर्षी निधीची अद्यापही शाश्वती नाही. अनेक शेतकरी अर्ज करतात. परंतु संच खरेदीसाठी पैसे नसल्याने खरेदी होत नाही. परिणामी अनुदानाचा लाभ मिळत नाही.

तुषार सिंचन योजनेंतर्गत अर्ज केला होता. अर्ज मंजुरही झाला. पहिल्या टप्यात १२ हजार ५०० रुपये अनुदान मिळाले. मात्र दुसऱ्या टप्प्याचे ६ हजार रुपयांचे अनुदान अद्यापही मिळाले नाही. योजना चांगले नाही मात्र निधी मिळत नसल्याने अडचण जाते.- येनूबाई भोयर, शेतकरी कोलारी

धान उत्पादक पट्यात भाजीपाला वाढीसाठी प्रयत्न होत आहे. कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेण्यासाठी सुक्ष्म सिंचन योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. कृषी विभागाचे कर्मचारी प्रोड्युसर कंपन्या व शेतकरी गटामार्फत प्रसिद्धी करीत आहेत. - हिंदूराव चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प