शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सुक्ष्म सिंचनासाठी १४०४ अर्जांपैकी तब्बल ८९५ अर्ज झाले रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात धानासोबत मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. मुबलक पाणी असले तरी पाण्याचा योग्य वापर व्हावा आणि त्यातुन अधिक उत्पन्न व्हावे यासाठी सुक्ष्म सिंचनाकडे शेतकरी वळल्याचे दिसत आहे. मात्र अनुदानासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे उंबरठे झिजवावे लागते. अनेकदा लहान सहान कारणांसाठी अर्जही रद्द होतात. जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात १४०३ शेतकऱ्यांनी सुक्ष्म सिंचन योजनेतुन अर्ज केले.

ठळक मुद्दे४२४ शेतकऱ्यांना अनुदान : नोंदणी सुरु, निधीची शाश्वती नाही

    लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कमी पाण्यात अधिक उत्पन्न काढण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने सुक्ष्म सिंचन योजना राबविली जाते. ठिबक व तुषार सिंचनासाठी प्रोत्साहन अनुदानही दिले जाते. या योजनेत भंडारा जिल्ह्यात १४०३ शेतकऱ्यांनी अर्ज केले असुन त्यापैकी विविध कारणांनी तब्बल ८९५ शेतकऱ्यांचे अर्ज रद्द झालेत. जिल्ह्यातील केवळ ४२४ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहे.  भंडारा जिल्ह्यात धानासोबत मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. मुबलक पाणी असले तरी पाण्याचा योग्य वापर व्हावा आणि त्यातुन अधिक उत्पन्न व्हावे यासाठी सुक्ष्म सिंचनाकडे शेतकरी वळल्याचे दिसत आहे. मात्र अनुदानासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे उंबरठे झिजवावे लागते. अनेकदा लहान सहान कारणांसाठी अर्जही रद्द होतात. जिल्ह्यात २०१९-२० या वर्षात १४०३ शेतकऱ्यांनी सुक्ष्म सिंचन योजनेतुन अर्ज केले. त्यापैकी ८९५ अर्ज रद्द झाले. ६०५ लाभार्थी अनुदानासाठी पात्र ठरले. परंतु जिल्ह्यातील ४२४ शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळाला. १८१ अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत. काही शेतकऱ्यांनी संच खरेदी केले नसल्याची माहिती आहे. महत्वाचे म्हणजे दरवर्षी मार्च महिन्यात अनुदान मिळते. परंतु यावर्षी अद्यापही निधीची शाश्वती नाही.

४५% मिळते अनुदान

ठिबक आणि तुषार सिंचनासाठी शासनाकडून अल्प - अत्यल्प भुधारकांना ५५ टक्के तर पाच एकरापेक्षा अधिक शेती असणाऱ्यांना ४५ टक्के अनुदान दिले जाते. ठिबक साठी एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च होऊन ३२ हजार अनुदान जमा होते तर तुषार सिंचनासाठी २० हजार खर्च आणि ८ हजार अनुदान मिळते. 

अनुदान मिळण्यात आहेत अडचणीकेंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने अनुदान दिले जाते. दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरीस अनुदान जमा होते. मात्र यावर्षी निधीची अद्यापही शाश्वती नाही. अनेक शेतकरी अर्ज करतात. परंतु संच खरेदीसाठी पैसे नसल्याने खरेदी होत नाही. परिणामी अनुदानाचा लाभ मिळत नाही.

तुषार सिंचन योजनेंतर्गत अर्ज केला होता. अर्ज मंजुरही झाला. पहिल्या टप्यात १२ हजार ५०० रुपये अनुदान मिळाले. मात्र दुसऱ्या टप्प्याचे ६ हजार रुपयांचे अनुदान अद्यापही मिळाले नाही. योजना चांगले नाही मात्र निधी मिळत नसल्याने अडचण जाते.- येनूबाई भोयर, शेतकरी कोलारी

धान उत्पादक पट्यात भाजीपाला वाढीसाठी प्रयत्न होत आहे. कमी पाण्यात अधिक उत्पन्न घेण्यासाठी सुक्ष्म सिंचन योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. कृषी विभागाचे कर्मचारी प्रोड्युसर कंपन्या व शेतकरी गटामार्फत प्रसिद्धी करीत आहेत. - हिंदूराव चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प