शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

उस्मानाबादच्या भामट्याने भंडाऱ्यातील बेरोजगारांना कोट्यवधींनी गंडविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 12:21 IST

महिला व बालविकास विभागात उपसचिव असल्याची बतावणी करून उस्मानाबादच्या भामट्याने येथील दोनशेवर बेरोजगार तरुणांना नोकरीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला.

ठळक मुद्देनोकरीचे आमिष दिलेजिल्हा कचेरीत थाटले होते कार्यालय

इंद्रपाल कटकवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महिला व बालविकास विभागात उपसचिव असल्याची बतावणी करून उस्मानाबादच्या भामट्याने येथील दोनशेवर बेरोजगार तरुणांना नोकरीच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. येथील जिल्हाकचेरी परिसरात कार्यालय थाटणारा हा भामटा महिनाभरापूर्वी पसार झाला आहे. भंडारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून उल्लेखनीय म्हणजे मंत्रालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयाचे नावही या प्रकरणात गोवले जात आहे.विजय राजेंद्र रणसिंग (२८) रा. उस्मानाबाद असे या भामट्याचे नाव आहे. काही महिन्यापूर्वी तो भंडारा येथे दाखल झाला. महिला व बालविकास विभागाचा उपसचिव असल्याचे तो सांगायचा. लवकरच त्याने चक्क जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या एका इमारतीत परवानगी घेवून आपले कार्यालय सुरु केले होते. कार्यालयात तो राजमुद्रा असलेल्या स्वत:च्या वाहनाने यायचा. बेरोजगार तरुण-तरुणींना कार्यालयात बोलावून त्यांची कागदपत्रे मागायचा. त्याचा रुबाब आणि शासकीय परिसरात असलेले कार्यालय पाहून कुणाचाही त्याच्यावर सहज विश्वास बसायचा. एकदा विश्वास संपादन केला की, तो समोरच्याला नोकरीचे आमिष द्यायचा.ठराविक रक्कम घेऊन नागपूरच्या हैद्राबाद हाऊस व अन्य एका ठिकाणी उमेदवारांना बोलावून त्यांची मुलाखत घ्यायचा. विविध खात्यांचे नियुक्तीपत्र तो बेरोजगार उमेदवारांना देत होता. मात्र नियुक्तीच्या ठिकाणी गेल्यानंतर फसवणुकीचा प्रकार लक्षात यायचा. त्यानंतर मंत्र्यांशी माझे जवळचे संबंध आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसह नागपूर विभागातील वरिष्ठ अधिकारी माझ्याशी नेहमी संपर्कात असल्याचे सांगत तो बेरोजगारांना दम भरायचा. मात्र बेरोजगार तरुणांचा तगादा वाढल्याने त्याने महिनाभरापूर्वी आपले बस्तान गुंडाळले. भंडाऱ्यासह अन्य जिल्ह्यातील सुमारे २०० पेक्षा जास्त बेरोजगारांची फसवणूक झाल्याची बाब आता समोर येत आहे. त्याने प्रत्येकाकडून तीन ते दहा लाखांपर्यंत पैसे घेतल्याचे बेरोजगार तरुण सांगत आहेत.याप्रकरणी भंडारा पोलिसात प्रथम ६ जुलै रोजी तक्रार करण्यात आली. त्यानंतर सुमारे आठवडाभर कोणतीच कारवाई झाली नाही. १३ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याला सुरुवातीलाच जेरबंद करण्याची संधी मात्र पोलिसांनी गमावली. आता विविध पथके त्याच्या मागावर आहेत. दुसरीकडे बेराजगारही त्याचा शोध घेत आहेत. मात्र कुठेही थांगपत्ता लागत नाही.

बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी कार्यालयाचे नावही येत आहे. त्यामुळे संपूर्ण चौकशी केली जाईल. यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाईल.- शांतनू गोयल, जिल्हाधिकारी, भंडारा

बेरोजगारांना गंडा घालणाऱ्या विजय रणसिंग या भामट्याच्या शोधात पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. प्रकरणाचा तपास भंडारा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे. या प्रकरणात कुठलीही हयगय केली जाणार नाही.-विनिता साहू जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा

टॅग्स :Crimeगुन्हा