शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

विरोधी पक्षनेत्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:37 IST

भंडारा : जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारांच्या वर्षावासह आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. असे असताना शासन-प्रशासन याविषयी गंभीर ...

भंडारा : जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारांच्या वर्षावासह आलेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. असे असताना शासन-प्रशासन याविषयी गंभीर नाही. आघाडी शासन राजकारण करण्यात मश्गूल आहे. शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास गप्प बसणार नाही, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर केले.

यावेळी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे, खासदार सुनील मेंढे, आमदार परिणय फुके, सामाजिक कार्यकर्ते बालू मस्के, आल्हाद भांडारकर, भुमेश ढेंगे, किशोर वाघाये, अश्विन सार्वे, संदीप भांडारकर आदी उपस्थित होते. देवेेंद्र फडणवीस यांनी खुटसावरी येथील धनंजय वाहाणे, दादाभाई वाहाणे यांच्या शेतात जाऊन नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली. यावेळी उमराव मस्के, शेषराव शेंडे, बाबूराव मस्के, सत्यवान पेशने, रवींद्र वासनिक, अरुण मांढरे, राजेश सार्वे, धनसिंग रामटेके यांच्याशी समस्यांविषयी चर्चा केली. यावेळी जवळपास ५० शेतकरी उपस्थित होते.

बॉक्स

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन

यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी समस्यांचे निवेदन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सोपविले. निवेदनात खुटसावरी व पिंपळगाव येथे स्मशान शेड व सभामंडप जनसुविधेंतर्गत मंजूर करण्यात यावे, अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात यावे, खुटसावरी गावाला जागेचा अभाव असल्याने अनेक शासकीय योजना परतीच्या मार्गावर आहेत. त्यामुळे खुटसावरीच्या इंदिरानगरलगत असलेल्या रिठी गाव चिखली हमेशा येथील राखीव जागा खुटसावरीला हस्तांतरण करण्यात यावी, राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी १ साठी इमारत बांधकाम करण्यात यावे, यासह मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, आदी मागण्यांचा समावेश होता. यावेळी सरपंच मनीषा वासनिक, उपसरपंच संदीप खंडाते, सदस्य ज्योती नंदेश्वर, प्रियंका सार्वे, वृषाली शहारे, संगीता बोरकर, राकेश शेंडे, विनोद पोटवार, रुस्तम टेंभुर्णे आदी उपस्थित होते.