शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
2
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
4
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
5
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
6
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
7
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
8
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
9
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
10
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
11
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
12
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
13
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
14
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
15
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
16
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
17
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
18
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
19
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
20
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

दोन वर्षात केवळ घोषणाच

By admin | Updated: June 6, 2016 00:25 IST

केंद्र आणि राज्यात आलेल्या भाजप सरकारने दोन वर्षात स्किल इंडियापासून मेक ईन इंडियापर्यंत केवळ घोषणांवर घोषणाच केल्या आहेत.

प्रफुल पटेल यांचा सरकारवर हल्लाबोल : भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने केला जंगी सत्कार भंडारा : केंद्र आणि राज्यात आलेल्या भाजप सरकारने दोन वर्षात स्किल इंडियापासून मेक ईन इंडियापर्यंत केवळ घोषणांवर घोषणाच केल्या आहेत. विकास मात्र शुन्य आहे. भंडारा जिल्हा जिथे आहे तिथेच आहे. विकासात एकही पाऊल पुढे पडलेले नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला.राज्यसभेवर अविरोध निवड झाल्यानंतर सत्कार समारंभासाठी ते रविवारला भंडाऱ्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, दोन वर्षात ‘स्किल डेवलपमेंट’च्या नावावर काहीही झाले नाही. आमच्याकडे आयटीआयचे मुले नाहीत का? असा सवाल करून एकाही मुलाला रोेजगार मिळाला नाही. क्रिमीलेअर, ओबीसी शिष्यवृत्ती मिळाली नाही.स्वच्छ भारतापेक्षा  स्वच्छ भाजप कराराज्यात भाजपचे सरकार येताच पहिल्या चार महिन्यात चिक्की घोटाळा, त्यानंतरच्या चार महिन्यात शाळेत लावण्यात येणारे अग्निशामन यंत्र घोटाळा, तुर डाळ घोटाळा समोर येत आहे. मंत्र्यांवर आरोप होऊ लागले आहेत. आता दीड वर्षात एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे ‘स्वच्छ भारतापेक्षा स्वच्छ भाजप’ हे अभियान राबविण्याची गरज आहे.आॅक्टोबर महिन्यात धान परिषद मागील दोन वर्षात शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. धानाला १,४७० रूपये भाव दिला जात आहे. केवळ ६० रूपये वाढविण्यात आले आहे. आमचे सरकार होते तेव्हा धानाला ४ हजार रूपये देण्याची मागणी करणारे आता दिसत नाहीत. आता चार वर्षांनी आम्ही ४ हजार रूपयेच द्या, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांना आम्ही वाचा फोडणार आहोत. त्यासाठी आॅक्टोबर महिन्यात धान परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने केला जाहीर सत्कारयावेळी खासदार प्रफुल पटेल यांचा राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेस, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भंडारा अर्बन बँक, भंडारा नगर परिषद, तुमसर नगर परिषद, दुध उत्पादक संघ, जिल्हा मजूर संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे , माजी प्रदेश उपाध्यक्ष मधुकर सांबारे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, भंडाराचे नगराध्यक्ष बाबुराव बागडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे, जिल्हा परिषद सभापती नरेश डहारे, सभापती शुंभागी रहांगडाले, सामाजिक न्याय विभागाचे डॉ.सच्चिदानंद फुलेकर, माजी प्रदेश सचिव अविनाश ब्राम्हणकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, पवनी पालिकेचे उपाध्यक्ष विजय ठक्कर, उद्योग संघाचे अध्यक्ष धनपाल चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे व विविध आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)गोसेखुर्द कसा होणार?गोसेखुर्द हा देशातील एकमेव असा प्रकल्प आहे ज्यात केंद्राच्या एआयबीपी योजनेतंर्गत ९० टक्के निधी देण्यात आला. राज्याचा वाटा केवळ १० टक्के आहे. या प्रकल्पाला केंद्र व राज्य सरकारने मागील दोन वर्षात एकही निधी दिला नाही. त्यामुळे अशा स्थितीत हा प्रकल्प पूर्ण कसा होणार? असा प्रश्ही त्यांनी केला. या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर आम्ही नवीन योजना राबवू, असे सांगितले होते. परंतु अद्यापपर्यंत कोणतीही नवीन योजना आल्याचे दिसून आले नसल्याचे त्यांनी सांगितले.भूमिपूजन झाले, निविदा नाहीजानेवारी महिन्यात गाजावाजा करून जिल्ह्यात हजारो कोटी रूपयांच्या रस्ते, पूल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. परंतु आतापर्यंत या कामांच्या निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. विकासाच्या नावावर चर्चा करणारे विकासाच्या मुद्यावर अयशस्वी ठरत असल्याचे त्यांनी म्हटले.