शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
4
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
5
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
6
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
7
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
8
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
9
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
10
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
11
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
12
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
13
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
14
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
15
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
16
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
17
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
18
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
19
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
20
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...

दोन वर्षात केवळ घोषणाच

By admin | Updated: June 6, 2016 00:25 IST

केंद्र आणि राज्यात आलेल्या भाजप सरकारने दोन वर्षात स्किल इंडियापासून मेक ईन इंडियापर्यंत केवळ घोषणांवर घोषणाच केल्या आहेत.

प्रफुल पटेल यांचा सरकारवर हल्लाबोल : भंडाऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसने केला जंगी सत्कार भंडारा : केंद्र आणि राज्यात आलेल्या भाजप सरकारने दोन वर्षात स्किल इंडियापासून मेक ईन इंडियापर्यंत केवळ घोषणांवर घोषणाच केल्या आहेत. विकास मात्र शुन्य आहे. भंडारा जिल्हा जिथे आहे तिथेच आहे. विकासात एकही पाऊल पुढे पडलेले नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला.राज्यसभेवर अविरोध निवड झाल्यानंतर सत्कार समारंभासाठी ते रविवारला भंडाऱ्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, दोन वर्षात ‘स्किल डेवलपमेंट’च्या नावावर काहीही झाले नाही. आमच्याकडे आयटीआयचे मुले नाहीत का? असा सवाल करून एकाही मुलाला रोेजगार मिळाला नाही. क्रिमीलेअर, ओबीसी शिष्यवृत्ती मिळाली नाही.स्वच्छ भारतापेक्षा  स्वच्छ भाजप कराराज्यात भाजपचे सरकार येताच पहिल्या चार महिन्यात चिक्की घोटाळा, त्यानंतरच्या चार महिन्यात शाळेत लावण्यात येणारे अग्निशामन यंत्र घोटाळा, तुर डाळ घोटाळा समोर येत आहे. मंत्र्यांवर आरोप होऊ लागले आहेत. आता दीड वर्षात एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे ‘स्वच्छ भारतापेक्षा स्वच्छ भाजप’ हे अभियान राबविण्याची गरज आहे.आॅक्टोबर महिन्यात धान परिषद मागील दोन वर्षात शेतकऱ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. धानाला १,४७० रूपये भाव दिला जात आहे. केवळ ६० रूपये वाढविण्यात आले आहे. आमचे सरकार होते तेव्हा धानाला ४ हजार रूपये देण्याची मागणी करणारे आता दिसत नाहीत. आता चार वर्षांनी आम्ही ४ हजार रूपयेच द्या, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांना आम्ही वाचा फोडणार आहोत. त्यासाठी आॅक्टोबर महिन्यात धान परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने केला जाहीर सत्कारयावेळी खासदार प्रफुल पटेल यांचा राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेस, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, भंडारा अर्बन बँक, भंडारा नगर परिषद, तुमसर नगर परिषद, दुध उत्पादक संघ, जिल्हा मजूर संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला आमदार राजेंद्र जैन, माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार, माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे , माजी प्रदेश उपाध्यक्ष मधुकर सांबारे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, भंडाराचे नगराध्यक्ष बाबुराव बागडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे, जिल्हा परिषद सभापती नरेश डहारे, सभापती शुंभागी रहांगडाले, सामाजिक न्याय विभागाचे डॉ.सच्चिदानंद फुलेकर, माजी प्रदेश सचिव अविनाश ब्राम्हणकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, पवनी पालिकेचे उपाध्यक्ष विजय ठक्कर, उद्योग संघाचे अध्यक्ष धनपाल चौधरी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे व विविध आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)गोसेखुर्द कसा होणार?गोसेखुर्द हा देशातील एकमेव असा प्रकल्प आहे ज्यात केंद्राच्या एआयबीपी योजनेतंर्गत ९० टक्के निधी देण्यात आला. राज्याचा वाटा केवळ १० टक्के आहे. या प्रकल्पाला केंद्र व राज्य सरकारने मागील दोन वर्षात एकही निधी दिला नाही. त्यामुळे अशा स्थितीत हा प्रकल्प पूर्ण कसा होणार? असा प्रश्ही त्यांनी केला. या प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्यानंतर आम्ही नवीन योजना राबवू, असे सांगितले होते. परंतु अद्यापपर्यंत कोणतीही नवीन योजना आल्याचे दिसून आले नसल्याचे त्यांनी सांगितले.भूमिपूजन झाले, निविदा नाहीजानेवारी महिन्यात गाजावाजा करून जिल्ह्यात हजारो कोटी रूपयांच्या रस्ते, पूल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. परंतु आतापर्यंत या कामांच्या निविदा काढण्यात आलेल्या नाहीत. विकासाच्या नावावर चर्चा करणारे विकासाच्या मुद्यावर अयशस्वी ठरत असल्याचे त्यांनी म्हटले.