शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

चांदपूर जलाशयात केवळ २८ फुट पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 22:21 IST

बावनथडी नदीपात्रात अल्प जलसाठा असल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात केवळ दोन पंपगृहाने जलाशयात पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. नदीचे पात्र बारमाही वाहणारे नसल्याने पावसाअभावी पंपगृह बंद करण्याची वेळ येणार आहे.

ठळक मुद्देगरजेनुसार सोडणार जलाशयाचे पाणी : सोंड्याटोला प्रकल्पात दोन पंपगृह सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बावनथडी नदीपात्रात अल्प जलसाठा असल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात केवळ दोन पंपगृहाने जलाशयात पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. नदीचे पात्र बारमाही वाहणारे नसल्याने पावसाअभावी पंपगृह बंद करण्याची वेळ येणार आहे. यामुळे जलाशयातील जलसाठा लक्षात घेता गरजेनुसार पाणी सोडण्यात येणार आहे.सिहोरा परिसरात बावनथडी नदीवर साकारण्यात आलेल्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाने कटू सत्य अनुभवले आहे. वीज, पंपगृहाची देखभाल आणि दुरुस्ती, निधी आणि अन्य समस्या घेऊन या प्रकल्पाने वाटचाल सुरु ठेवली आहे. परंतु गत वर्षापासून या प्रकल्प स्थळात समस्या निर्माण झालेल्या नाहीत. तब्बल वर्षभर प्रकल्पस्थळात वीज पुरवठा सुरु ठेवला आहे. वीज पुरवठा खंडीत होवू दिला नाही. यावर्षी ३४ हजार शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत प्रकल्प स्थळात पाण्याचा उपसा करण्यासाठी त्यांनी रोखठोक प्रयत्न सुरु केले. प्रकल्पस्थळात निविदा विनाच शुक्रवारीपासून सहा पंपगृहाने पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला आहे. बावनथडी नदीचे पात्र तीन महिनेच वाहणारे असल्याने चांदपूर जलाशय तातडीने ओव्हरफ्लो झाले पाहिजे, अशी भूमिका आमदार वाघमारे यांनी घेतल्याने जलाशयात १५ दिवसात आठ फुट पाण्याचा उपसा करण्यात आलेला आहे. जलाशयात २८ फुट पाण्याची साठवणूक करण्यात आली आहे. सध्या स्थित नदीचे पात्रात अल्प जलसाठा उपलब्ध असल्याने प्रकल्पस्थळात दोन पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प पाटबंधारे विभागाचे नियंत्रणात आहे. या विभागाला हस्तांतरीत झाले आहे. परंतु पाटबंधारे विभागात मनुष्यबळाचा अभाव असल्याने पाणी वाटप करताना माथापच्ची करण्याची वेळ येत आहे.दरम्यान सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात तीन पंपगृह आहेत. दोन पंपगृह गेल्या वर्षापासून नागपुरात दुरुस्ती करिता ठेवण्यात आली असून आजपावेतो नादुरुस्त पंपगृह परतली नाही. यामुळे जलद गतीने पाण्याचा उपसा प्रभावित ठरत आहे. या कार्यात कंत्राटदारांचा बेजबाबबदारपणा कारणीभूत ठरत आहे. दरम्यान मध्यंतरी चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यासाठी सभा घेण्यात आली होती.या सभेला सभापती धनेंद्र तुरकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेश पटले, मोहगावचे सरपंच उमेश कटरे, पाटबंधारे विभागाचे हटवार, मिरत आणि डिंकवार उपस्थित होते. या बैठकीत चांदपूर जलाशयाचे पाण्याचा दुरुपयोग होणार नाही. पाणी वाटप पूर्ण झाले असताना शेतकऱ्यांनी माहिती देण्याचे सांगण्यात आले. यामुळे जलाशयात उर्वरीत असणारे पाणी शेतकºयांचे उपयोगात येणार आहे. यावेळी शेतकरी उपस्थित होते.स्थिरीकरण योजना तारणारबावनथडी नदी पात्रात पाणी राहत नसल्याने परिसरात रबीचे हंगामात पाणी अभावी धानाचे उत्पादन घेता येत नाही. परिसरात शेतकऱ्यांना कायमस्वरुपी तारण्यासाठी लोकप्रतिनिंधी बपेरा-चांदपूर स्थिरीकरण योजना वैनगंगा नदीवर साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या निर्णयाचे परिसरात स्वागत करण्यात आले आाहे. ही योजनांचे कामे जलद गतीने झाले पाहिजे अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Chandpur Lakeचांदपूर जलाशय