शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

चांदपूर जलाशयात केवळ २८ फुट पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 22:21 IST

बावनथडी नदीपात्रात अल्प जलसाठा असल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात केवळ दोन पंपगृहाने जलाशयात पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. नदीचे पात्र बारमाही वाहणारे नसल्याने पावसाअभावी पंपगृह बंद करण्याची वेळ येणार आहे.

ठळक मुद्देगरजेनुसार सोडणार जलाशयाचे पाणी : सोंड्याटोला प्रकल्पात दोन पंपगृह सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बावनथडी नदीपात्रात अल्प जलसाठा असल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात केवळ दोन पंपगृहाने जलाशयात पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. नदीचे पात्र बारमाही वाहणारे नसल्याने पावसाअभावी पंपगृह बंद करण्याची वेळ येणार आहे. यामुळे जलाशयातील जलसाठा लक्षात घेता गरजेनुसार पाणी सोडण्यात येणार आहे.सिहोरा परिसरात बावनथडी नदीवर साकारण्यात आलेल्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाने कटू सत्य अनुभवले आहे. वीज, पंपगृहाची देखभाल आणि दुरुस्ती, निधी आणि अन्य समस्या घेऊन या प्रकल्पाने वाटचाल सुरु ठेवली आहे. परंतु गत वर्षापासून या प्रकल्प स्थळात समस्या निर्माण झालेल्या नाहीत. तब्बल वर्षभर प्रकल्पस्थळात वीज पुरवठा सुरु ठेवला आहे. वीज पुरवठा खंडीत होवू दिला नाही. यावर्षी ३४ हजार शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत प्रकल्प स्थळात पाण्याचा उपसा करण्यासाठी त्यांनी रोखठोक प्रयत्न सुरु केले. प्रकल्पस्थळात निविदा विनाच शुक्रवारीपासून सहा पंपगृहाने पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला आहे. बावनथडी नदीचे पात्र तीन महिनेच वाहणारे असल्याने चांदपूर जलाशय तातडीने ओव्हरफ्लो झाले पाहिजे, अशी भूमिका आमदार वाघमारे यांनी घेतल्याने जलाशयात १५ दिवसात आठ फुट पाण्याचा उपसा करण्यात आलेला आहे. जलाशयात २८ फुट पाण्याची साठवणूक करण्यात आली आहे. सध्या स्थित नदीचे पात्रात अल्प जलसाठा उपलब्ध असल्याने प्रकल्पस्थळात दोन पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प पाटबंधारे विभागाचे नियंत्रणात आहे. या विभागाला हस्तांतरीत झाले आहे. परंतु पाटबंधारे विभागात मनुष्यबळाचा अभाव असल्याने पाणी वाटप करताना माथापच्ची करण्याची वेळ येत आहे.दरम्यान सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात तीन पंपगृह आहेत. दोन पंपगृह गेल्या वर्षापासून नागपुरात दुरुस्ती करिता ठेवण्यात आली असून आजपावेतो नादुरुस्त पंपगृह परतली नाही. यामुळे जलद गतीने पाण्याचा उपसा प्रभावित ठरत आहे. या कार्यात कंत्राटदारांचा बेजबाबबदारपणा कारणीभूत ठरत आहे. दरम्यान मध्यंतरी चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यासाठी सभा घेण्यात आली होती.या सभेला सभापती धनेंद्र तुरकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेश पटले, मोहगावचे सरपंच उमेश कटरे, पाटबंधारे विभागाचे हटवार, मिरत आणि डिंकवार उपस्थित होते. या बैठकीत चांदपूर जलाशयाचे पाण्याचा दुरुपयोग होणार नाही. पाणी वाटप पूर्ण झाले असताना शेतकऱ्यांनी माहिती देण्याचे सांगण्यात आले. यामुळे जलाशयात उर्वरीत असणारे पाणी शेतकºयांचे उपयोगात येणार आहे. यावेळी शेतकरी उपस्थित होते.स्थिरीकरण योजना तारणारबावनथडी नदी पात्रात पाणी राहत नसल्याने परिसरात रबीचे हंगामात पाणी अभावी धानाचे उत्पादन घेता येत नाही. परिसरात शेतकऱ्यांना कायमस्वरुपी तारण्यासाठी लोकप्रतिनिंधी बपेरा-चांदपूर स्थिरीकरण योजना वैनगंगा नदीवर साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या निर्णयाचे परिसरात स्वागत करण्यात आले आाहे. ही योजनांचे कामे जलद गतीने झाले पाहिजे अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Chandpur Lakeचांदपूर जलाशय