शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चांदपूर जलाशयात केवळ २८ फुट पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 22:21 IST

बावनथडी नदीपात्रात अल्प जलसाठा असल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात केवळ दोन पंपगृहाने जलाशयात पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. नदीचे पात्र बारमाही वाहणारे नसल्याने पावसाअभावी पंपगृह बंद करण्याची वेळ येणार आहे.

ठळक मुद्देगरजेनुसार सोडणार जलाशयाचे पाणी : सोंड्याटोला प्रकल्पात दोन पंपगृह सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बावनथडी नदीपात्रात अल्प जलसाठा असल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात केवळ दोन पंपगृहाने जलाशयात पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. नदीचे पात्र बारमाही वाहणारे नसल्याने पावसाअभावी पंपगृह बंद करण्याची वेळ येणार आहे. यामुळे जलाशयातील जलसाठा लक्षात घेता गरजेनुसार पाणी सोडण्यात येणार आहे.सिहोरा परिसरात बावनथडी नदीवर साकारण्यात आलेल्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाने कटू सत्य अनुभवले आहे. वीज, पंपगृहाची देखभाल आणि दुरुस्ती, निधी आणि अन्य समस्या घेऊन या प्रकल्पाने वाटचाल सुरु ठेवली आहे. परंतु गत वर्षापासून या प्रकल्प स्थळात समस्या निर्माण झालेल्या नाहीत. तब्बल वर्षभर प्रकल्पस्थळात वीज पुरवठा सुरु ठेवला आहे. वीज पुरवठा खंडीत होवू दिला नाही. यावर्षी ३४ हजार शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत प्रकल्प स्थळात पाण्याचा उपसा करण्यासाठी त्यांनी रोखठोक प्रयत्न सुरु केले. प्रकल्पस्थळात निविदा विनाच शुक्रवारीपासून सहा पंपगृहाने पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला आहे. बावनथडी नदीचे पात्र तीन महिनेच वाहणारे असल्याने चांदपूर जलाशय तातडीने ओव्हरफ्लो झाले पाहिजे, अशी भूमिका आमदार वाघमारे यांनी घेतल्याने जलाशयात १५ दिवसात आठ फुट पाण्याचा उपसा करण्यात आलेला आहे. जलाशयात २८ फुट पाण्याची साठवणूक करण्यात आली आहे. सध्या स्थित नदीचे पात्रात अल्प जलसाठा उपलब्ध असल्याने प्रकल्पस्थळात दोन पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प पाटबंधारे विभागाचे नियंत्रणात आहे. या विभागाला हस्तांतरीत झाले आहे. परंतु पाटबंधारे विभागात मनुष्यबळाचा अभाव असल्याने पाणी वाटप करताना माथापच्ची करण्याची वेळ येत आहे.दरम्यान सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात तीन पंपगृह आहेत. दोन पंपगृह गेल्या वर्षापासून नागपुरात दुरुस्ती करिता ठेवण्यात आली असून आजपावेतो नादुरुस्त पंपगृह परतली नाही. यामुळे जलद गतीने पाण्याचा उपसा प्रभावित ठरत आहे. या कार्यात कंत्राटदारांचा बेजबाबबदारपणा कारणीभूत ठरत आहे. दरम्यान मध्यंतरी चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यासाठी सभा घेण्यात आली होती.या सभेला सभापती धनेंद्र तुरकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेश पटले, मोहगावचे सरपंच उमेश कटरे, पाटबंधारे विभागाचे हटवार, मिरत आणि डिंकवार उपस्थित होते. या बैठकीत चांदपूर जलाशयाचे पाण्याचा दुरुपयोग होणार नाही. पाणी वाटप पूर्ण झाले असताना शेतकऱ्यांनी माहिती देण्याचे सांगण्यात आले. यामुळे जलाशयात उर्वरीत असणारे पाणी शेतकºयांचे उपयोगात येणार आहे. यावेळी शेतकरी उपस्थित होते.स्थिरीकरण योजना तारणारबावनथडी नदी पात्रात पाणी राहत नसल्याने परिसरात रबीचे हंगामात पाणी अभावी धानाचे उत्पादन घेता येत नाही. परिसरात शेतकऱ्यांना कायमस्वरुपी तारण्यासाठी लोकप्रतिनिंधी बपेरा-चांदपूर स्थिरीकरण योजना वैनगंगा नदीवर साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या निर्णयाचे परिसरात स्वागत करण्यात आले आाहे. ही योजनांचे कामे जलद गतीने झाले पाहिजे अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Chandpur Lakeचांदपूर जलाशय