शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

एक लाख हेक्टरमधील धानपीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:01 IST

भंडारा जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात धानपिकासाठी एक लाख ६१ हजार ४९४ हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले. यापैकी गत आठवड्यापर्यंत एक लाख ५२ हजार १७१ क्षेत्रात प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने साथ दिली. त्यामुळे धान लागवडीला प्रारंभ करण्यात आला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले.

ठळक मुद्देकीडींचा प्रादुर्भाव : शेतकरी संकटात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणतात, प्रादुर्भाव केवळ भंडारा तालुक्यातच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत १५ दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास एक लक्ष हेक्टर क्षेत्रात गादमाशी, खोडकिडा तसेच पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून उपाययोजनेसाठी केविलवाणा प्रयत्न करीत आहे.भंडारा जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात धानपिकासाठी एक लाख ६१ हजार ४९४ हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले. यापैकी गत आठवड्यापर्यंत एक लाख ५२ हजार १७१ क्षेत्रात प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने साथ दिली. त्यामुळे धान लागवडीला प्रारंभ करण्यात आला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. २० दिवसानंतर पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यानंतर जिल्ह्यात धडाक्याने रोवणीला प्रारंभ झाला. धान पिकाला पोषक असे वातावरण असल्यामुळे धान डौलाने उभे होते. परंतु ऑगस्ट महिन्याच्या पंधरवाड्यानंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. कधी ढगाळ वातावरणात तर कधी दमदार पावसाची हजेरी यामुळे डौलाने उभे असलेले धानपीक धोक्यात आले. वातावरण बदलाने किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक ठिकाणी तर धानपिक नष्ट झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी, मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यामध्ये गादमाशी, खोडकिडा व पाने गुंडाळणाºया अळीचा प्रादूर्भाव असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र यावर उपाययोजना करण्यास जिल्हा कृषी विभाग उदासिन दिसून येत आहेत. केवळ कागदावरच उपाययोजना न ठेवता प्रत्यक्षात शेतकºयांना याचा फायदा व्हावा, यासाठी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे.अनुदानावर कीटकनाशक औषधींचे वितरण कराभंडारा जिल्ह्याला गत चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी मोठ्या आशेने शेतकºयांनी धान पिकाची लागवड केली. मात्र निसर्गाच्या वक्रदृष्टीने यावर्षीही शेतकरी संकटात सापडला आहे. धानपिकावर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादूर्भाव आहे. किटकनाशके महागडी असल्याने शेतकऱ्यांना ती परवडणारी नाही. शासनाने गरजू शेतकऱ्यांना अनुदानावर किटकनाशक औषधींचे वितरण केल्यास शेतकऱ्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळू शकतो, यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.जिल्ह्यातील भंडारा तालुक्यातील ३०० हेक्टर क्षेत्र वगळता कोणत्याही तालुक्यात किडींचा प्रादुर्भाव नाही. सध्या स्थितीत १४८ लिटर किटकनाशक औषधी कृषी विभागाकडे उपलब्ध आहे. पुन्हा औषधीची मागणी शासनाकडे करण्यात आली असून लवकरच प्राप्त होणार आहे. किडींवर उपाययोजना करण्यासाठी कृषी अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी करुन मार्गदर्शन करीत आहेत.- हिंदूराव चव्हाण,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा

टॅग्स :agricultureशेती