शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पर्यावरण समितीच्या सभेत वाचला मूलभूत समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:54 IST

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पर्यावरण व्यवस्थापन समितीची सभा गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता ए.आर. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये पुनर्वसन कामाची प्रगती, धरणामधील नागनदी व पिवळ्या नदीचे प्रदूषण, घोडाझरी मध्ये सिंचनासाठी पाणी सोडणे गोसीखुर्द धरणाचे सौंदर्यीकरण वाढविणे, .....

ठळक मुद्देवाही वसाहतीत सभा : नागनदीचे प्रदूषण, पुनर्वसनावर चिंतन

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पर्यावरण व्यवस्थापन समितीची सभा गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता ए.आर. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये पुनर्वसन कामाची प्रगती, धरणामधील नागनदी व पिवळ्या नदीचे प्रदूषण, घोडाझरी मध्ये सिंचनासाठी पाणी सोडणे गोसीखुर्द धरणाचे सौंदर्यीकरण वाढविणे, धरणामध्ये वाढत असलेल्या इकॉर्नियाचे निर्मूलन करणे, पुनर्वसनस्थळी सर्व नागरी सुविधा पुरविणे आदी विषयावर चर्चा होवून उपाययोजना करण्याचे संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले.नागपूर शहरातील नागनदी व पिवळी नदीच्या सांड पाण्यामुळे, गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे भंडारा, पवनी या शहरांना व नदीकाठच्या गावांना प्रदूषित पाणी प्यावे लागत आहे. आरोग्याच्या दृष्टीने, मासेमारांच्या दृष्टीने, भविष्यात या प्रदूषित पाण्याचा गंभीर परिणाम होवून शेतीवरही परिणाम होणार आहे.या ज्वलंत मुद्यांवर सर्वच प्रतिनिधींनी आवाज उचलून नागपूर महानगर प्रतिनिधीला जाब विचारताच त्यांनी प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा जुलै महिन्यापासून दर्जा सुधारला असल्याचे सांगितले. पण समाधान झाले नाही. त्यामुळे नागपूर मनपाच्या भांडेवाडी जलशुद्ध प्रकल्पाला भेट देवून सत्यस्थिती जाणून घेण्याचे ठरविण्यात आले.यावर्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविणार असल्यामुळे बुडीत क्षेत्रातील गावांचे स्थलांतर करण्याचे ठरविण्यात आले आहे. धरणाच्या लाभ क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना धरणाचे सिंचनाचे पाणी देण्यावर भर दिला जाणार आहे. पुनर्वसनस्थळी सर्व नागरी सुविधा पुरवून गावठाणे जि.प. हस्तांतरीत केले आहे. दर्जेदार पुनर्वसनाची काही कामे एनबीसी ला देण्यात आलेली आहे.या कामांची पाहणी करून जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीने कामे प्रस्तावित करण्याचे ठरविण्यात आले आहे. गोसीखुर्द धरणाचे सौंदर्यीकरण करून याकरिता एक आराखडा तयार करण्याचे ठरविण्यात आले. धरणामध्ये वाढत असलेल्या इकॉर्निया वनस्पती निर्मूलन करण्याकरिता गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली कायमस्वरुपी उपाययोजना केली जाणार आहे. अनेक राहिलेल्या गावांचे पुनर्वसन केले जाणार आहे.वाही वसाहत येथे झालेल्या या सभेत समितीचे अशासकीय सदस्य विलास भोंगाडे, विठोबा समरीत, गोविंद भेंडारकर, अधीक्षक अभियंता जे.एम. शेख, कार्यकारी अभियंता आर.एच. शर्मा, अभियंता रायपुरे, भंडारा व नागपूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी, नागपूर मनपाचे अधिकारी, वनविभाग, आरोग्यविभागाचे वरिष्ठ अधिकारी, शाखा अभियंता पी.डी. चवरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पenvironmentवातावरण