शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पर्यावरण समितीच्या सभेत वाचला मूलभूत समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:54 IST

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पर्यावरण व्यवस्थापन समितीची सभा गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता ए.आर. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये पुनर्वसन कामाची प्रगती, धरणामधील नागनदी व पिवळ्या नदीचे प्रदूषण, घोडाझरी मध्ये सिंचनासाठी पाणी सोडणे गोसीखुर्द धरणाचे सौंदर्यीकरण वाढविणे, .....

ठळक मुद्देवाही वसाहतीत सभा : नागनदीचे प्रदूषण, पुनर्वसनावर चिंतन

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पर्यावरण व्यवस्थापन समितीची सभा गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता ए.आर. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये पुनर्वसन कामाची प्रगती, धरणामधील नागनदी व पिवळ्या नदीचे प्रदूषण, घोडाझरी मध्ये सिंचनासाठी पाणी सोडणे गोसीखुर्द धरणाचे सौंदर्यीकरण वाढविणे, धरणामध्ये वाढत असलेल्या इकॉर्नियाचे निर्मूलन करणे, पुनर्वसनस्थळी सर्व नागरी सुविधा पुरविणे आदी विषयावर चर्चा होवून उपाययोजना करण्याचे संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले.नागपूर शहरातील नागनदी व पिवळी नदीच्या सांड पाण्यामुळे, गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे भंडारा, पवनी या शहरांना व नदीकाठच्या गावांना प्रदूषित पाणी प्यावे लागत आहे. आरोग्याच्या दृष्टीने, मासेमारांच्या दृष्टीने, भविष्यात या प्रदूषित पाण्याचा गंभीर परिणाम होवून शेतीवरही परिणाम होणार आहे.या ज्वलंत मुद्यांवर सर्वच प्रतिनिधींनी आवाज उचलून नागपूर महानगर प्रतिनिधीला जाब विचारताच त्यांनी प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा जुलै महिन्यापासून दर्जा सुधारला असल्याचे सांगितले. पण समाधान झाले नाही. त्यामुळे नागपूर मनपाच्या भांडेवाडी जलशुद्ध प्रकल्पाला भेट देवून सत्यस्थिती जाणून घेण्याचे ठरविण्यात आले.यावर्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविणार असल्यामुळे बुडीत क्षेत्रातील गावांचे स्थलांतर करण्याचे ठरविण्यात आले आहे. धरणाच्या लाभ क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना धरणाचे सिंचनाचे पाणी देण्यावर भर दिला जाणार आहे. पुनर्वसनस्थळी सर्व नागरी सुविधा पुरवून गावठाणे जि.प. हस्तांतरीत केले आहे. दर्जेदार पुनर्वसनाची काही कामे एनबीसी ला देण्यात आलेली आहे.या कामांची पाहणी करून जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीने कामे प्रस्तावित करण्याचे ठरविण्यात आले आहे. गोसीखुर्द धरणाचे सौंदर्यीकरण करून याकरिता एक आराखडा तयार करण्याचे ठरविण्यात आले. धरणामध्ये वाढत असलेल्या इकॉर्निया वनस्पती निर्मूलन करण्याकरिता गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली कायमस्वरुपी उपाययोजना केली जाणार आहे. अनेक राहिलेल्या गावांचे पुनर्वसन केले जाणार आहे.वाही वसाहत येथे झालेल्या या सभेत समितीचे अशासकीय सदस्य विलास भोंगाडे, विठोबा समरीत, गोविंद भेंडारकर, अधीक्षक अभियंता जे.एम. शेख, कार्यकारी अभियंता आर.एच. शर्मा, अभियंता रायपुरे, भंडारा व नागपूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी, नागपूर मनपाचे अधिकारी, वनविभाग, आरोग्यविभागाचे वरिष्ठ अधिकारी, शाखा अभियंता पी.डी. चवरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पenvironmentवातावरण