शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण समितीच्या सभेत वाचला मूलभूत समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:54 IST

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पर्यावरण व्यवस्थापन समितीची सभा गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता ए.आर. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये पुनर्वसन कामाची प्रगती, धरणामधील नागनदी व पिवळ्या नदीचे प्रदूषण, घोडाझरी मध्ये सिंचनासाठी पाणी सोडणे गोसीखुर्द धरणाचे सौंदर्यीकरण वाढविणे, .....

ठळक मुद्देवाही वसाहतीत सभा : नागनदीचे प्रदूषण, पुनर्वसनावर चिंतन

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पर्यावरण व्यवस्थापन समितीची सभा गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता ए.आर. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये पुनर्वसन कामाची प्रगती, धरणामधील नागनदी व पिवळ्या नदीचे प्रदूषण, घोडाझरी मध्ये सिंचनासाठी पाणी सोडणे गोसीखुर्द धरणाचे सौंदर्यीकरण वाढविणे, धरणामध्ये वाढत असलेल्या इकॉर्नियाचे निर्मूलन करणे, पुनर्वसनस्थळी सर्व नागरी सुविधा पुरविणे आदी विषयावर चर्चा होवून उपाययोजना करण्याचे संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले.नागपूर शहरातील नागनदी व पिवळी नदीच्या सांड पाण्यामुळे, गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे भंडारा, पवनी या शहरांना व नदीकाठच्या गावांना प्रदूषित पाणी प्यावे लागत आहे. आरोग्याच्या दृष्टीने, मासेमारांच्या दृष्टीने, भविष्यात या प्रदूषित पाण्याचा गंभीर परिणाम होवून शेतीवरही परिणाम होणार आहे.या ज्वलंत मुद्यांवर सर्वच प्रतिनिधींनी आवाज उचलून नागपूर महानगर प्रतिनिधीला जाब विचारताच त्यांनी प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा जुलै महिन्यापासून दर्जा सुधारला असल्याचे सांगितले. पण समाधान झाले नाही. त्यामुळे नागपूर मनपाच्या भांडेवाडी जलशुद्ध प्रकल्पाला भेट देवून सत्यस्थिती जाणून घेण्याचे ठरविण्यात आले.यावर्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविणार असल्यामुळे बुडीत क्षेत्रातील गावांचे स्थलांतर करण्याचे ठरविण्यात आले आहे. धरणाच्या लाभ क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना धरणाचे सिंचनाचे पाणी देण्यावर भर दिला जाणार आहे. पुनर्वसनस्थळी सर्व नागरी सुविधा पुरवून गावठाणे जि.प. हस्तांतरीत केले आहे. दर्जेदार पुनर्वसनाची काही कामे एनबीसी ला देण्यात आलेली आहे.या कामांची पाहणी करून जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीने कामे प्रस्तावित करण्याचे ठरविण्यात आले आहे. गोसीखुर्द धरणाचे सौंदर्यीकरण करून याकरिता एक आराखडा तयार करण्याचे ठरविण्यात आले. धरणामध्ये वाढत असलेल्या इकॉर्निया वनस्पती निर्मूलन करण्याकरिता गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली कायमस्वरुपी उपाययोजना केली जाणार आहे. अनेक राहिलेल्या गावांचे पुनर्वसन केले जाणार आहे.वाही वसाहत येथे झालेल्या या सभेत समितीचे अशासकीय सदस्य विलास भोंगाडे, विठोबा समरीत, गोविंद भेंडारकर, अधीक्षक अभियंता जे.एम. शेख, कार्यकारी अभियंता आर.एच. शर्मा, अभियंता रायपुरे, भंडारा व नागपूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी, नागपूर मनपाचे अधिकारी, वनविभाग, आरोग्यविभागाचे वरिष्ठ अधिकारी, शाखा अभियंता पी.डी. चवरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पenvironmentवातावरण