शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पंचनामे न करताच परत गेले अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक यांना सांगून पंचनामे करण्यासाठी शेतात आले नसल्याचे प्रकार चौरास भागात घडल्याचे शेतकरी सांगत आहे. दुसरीकडे शेतकºयांना, पंचनामे केले नाही तरी सरसकट नुकसान भरपाई मिळणार, असे कर्मचारी सांगत आहे. राज्य शासनाने पिकांचा नुकसानीचा फोटो जरी दाखवला तरी आर्थिक नुकसान भरपाई मिळेल, असे सांगितले होते. पण याच्या उलट प्र्रकार चौरास भागात होत आहेत.

ठळक मुद्देव्यथा चौरास भागातील : शेतकऱ्यांचा आरोप, तर मदत कशी मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : परतीच्या पावसाने पावणेपाच एकरातील धान पीक मातीमोल झाले. या धानपिकांचा पंचनामा करण्यासाठी तलाठ्याकडे विणवनी करण्यात आली. पण सध्या पंचनामे करणे बंद झाले आहे, असे म्हणून शेतकºयाुा परतवून लावले. दोन लाख २५ हजाराचे धान गेल्याने कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न लिलाबाई येवले (७३) यांना पडला आहे.विशेष म्हणजे पंचनामे न करताच अधिकारी व कर्मचारी परत गेले, असा आरोप चौरास भागातील शेतकऱ्यांनी केला आहे.तलाठी, ग्रामसेवक, कृषीसहायक यांना सांगून पंचनामे करण्यासाठी शेतात आले नसल्याचे प्रकार चौरास भागात घडल्याचे शेतकरी सांगत आहे. दुसरीकडे शेतकºयांना, पंचनामे केले नाही तरी सरसकट नुकसान भरपाई मिळणार, असे कर्मचारी सांगत आहे. राज्य शासनाने पिकांचा नुकसानीचा फोटो जरी दाखवला तरी आर्थिक नुकसान भरपाई मिळेल, असे सांगितले होते. पण याच्या उलट प्र्रकार चौरास भागात होत आहेत. अनेक शेतकºयांचे धानाचे पीक परतीच्या पावसाने पुर्णत: गेले. पण कर्मचारी बांधावर जाऊन पंचनामे करीत नाही, असे दिसत आहे.सेंद्री बु. येथील शेतजमीन पालोरा चौ. तलाठी साझ्यात येते. येथील तलाठी वासनिक यांना लिलाबाई येवले (७३) यांच्यातर्फे मुलगा सुनील येवले यांनी पीक नुकसानीचा फोटो दाखविला. सर्व पीक परतीच्या पावसाने जमिनदोस्त झाले. कापणीला आलेले पीक लोटल्याने कीडीने पुर्णपणे फस्त केले. शंभर टक्के अनुदान झाले. त्यामुळे हवालदिल झाल्याचे त्यांनी सांगितले. सेवासहकारी संस्थेचे पीक कर्ज ६७ हजार रासायनिक खताची उधारी २५ हजार व शेतीसाठी घेतलेले पतसंस्थेचे ५० हजार इतर कर्ज एक लाख ५० हजार रूपये कसे भरावे असा प्रश्न पडला आहे.कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त शेतीवर आहे. सेवा सहकारी संस्थेतून कर्ज घेताना पीक विमा कपात केली म्हणून पीक विमा कंपनीच्या कर्मचाºयास फोन केला त तो देखिल शेतावर येण्यास तयार नाही. ‘सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई मिळेल’, असे गोड बोलून आम्हची बोळवण करीत आहे. शेतातील नुकसान भरपाईचा पंचनामा केला नाही तर पीक विमा मिळेल, शासन आर्थिक मदत कशाच्या आधारे देईल, अशी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकºयांची झालेली आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी चौरास भागातील शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती