शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

अधिकारी पोहोचले बांधावर

By admin | Updated: October 27, 2015 00:40 IST

गोबरवाही परिसरातील राजापूर येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धानपिकाची बांधावर जाऊन पाहणी केली.

धानपिकांची पाहणी : राजापूर दुष्काळग्रस्त करण्याची मागणी तुमसर : गोबरवाही परिसरातील राजापूर येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धानपिकाची बांधावर जाऊन पाहणी केली. पाऊस असमाधानकारक झाल्याने परिसर दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.सिंचनाची सोय नाही, पाऊस असमाधानकारक पडला. धान पिकाने माना खाली घातल्या. धानपीक पिवळे, काळे पडले, पिकावर संक्रमण अळींनी हल्ला केला. शेतातील पीक गेले, शेतकरी हवालदिल व सिंचाग्रस्त पडला. राजापूरच्या सरपंच रिनू मासूलकर, उपसरपंच वसंत बिटलाये यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून राजापूर गाव दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली होती.निवेदनाची दखल घेवून महसूल विभागाने राजापूर येथे पथक पाठवून बांधावर जाऊन धानाची पाहणी केली. चौकशी पथकाने शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. धानपीक नष्ट होण्याची कारणे जाणून घेतली. शासनाला धानपिकाची सविस्तर माहिती देण्यात येईल, असे पथकाने सांगितले. यावेळी सरपंच रिनू मासूलकर, उपसरपंच वसंत बिटलाये, पोलीस पाटील दिवाकर डोंगरे, सलाम, भक्तराज राऊत, करमकर, सतेज नेवारे, सुदाम झोडे, जगन्नाथ परबते, ग्रामसेवक, तलाठी कदमसह राजापूर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)