शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

सागर तलाव विकासापासून वंचित

By admin | Updated: May 15, 2014 23:17 IST

शहरातील संत कबीर वॉर्डात असलेला सागर तलाव परिसराची शान आहे. अजान नागरिकांकडून या तलावात कचरा टाकणे सुरु असल्यामुळे तलावाचे सौंदर्य नष्ट झाले आहे.

भंडारा : शहरातील संत कबीर वॉर्डात असलेला सागर तलाव परिसराची शान आहे. अजान नागरिकांकडून या तलावात कचरा टाकणे सुरु असल्यामुळे तलावाचे सौंदर्य नष्ट झाले आहे. तलावातील पाणी दूषित झाले असून परिसरातही घाण पसरली आहे. शहरात मोजके तलाव असताना त्याचे सौंदर्य राखता येत नसेल तर ते दुर्देवी आहे.

शहरातील तलावांपैकी सागर तलावा हा महत्त्वाचा तलाव आहे. सर्वात मोठा तलाव असलेल्या या तलावात वर्षभर पाणी राहते. शहराच्या इतिहासातही सागर तलावाची नोंद आहे. परंतु तलावाच्या दुर्देशेकडे कुणाचेही लक्ष जात नाही. तलावाच्या चौफेर घाण पसरली आहे.

गणेशोत्सव, श्रीकृष्ण जन्माष्ठमी उत्सवात शहरातील भाविक विसर्जनासाठी येतात. त्यावेळी या तलाव परिसराला जत्रेचे स्वरुप येते. या वॉर्डातील तलावाची साफसफाई कधी करण्यात येत नाही. या वॉर्डातील शौचालय परिसरात घाण, फुटलेल्या नाल्या, जागोजागी साचलेला कचरा, डासांचा प्रादुर्भाव समस्या आहेत. या वॉर्डातील काही ठिकाणचे रस्ते उखडलेले आहेत. त्याचा आवागमनासाठी त्रास होतो.

या वॉर्डात सामान्य कुटूंबातील नागरिक राहतात. या परिसरात सांडपाणी वाहून जाण्यासाठी असलेली नाली मोठी आहे. परंतु नालीमधील गाळ नियमित सा करण्यात येत नसल्यामुळे घाण वाढत आहे. सांडपाणी साचून राहत असल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. परिणामी डासांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. या वॉर्डातील काही नागरिकांशी चर्चा केली असता ते म्हणाले, या परिसरात पिण्याच्या पाण्याची समस्या नाही.

त्यामुळे वॉर्डातील चहूबाजुला घाण पसरली आहे. पावसाळ्यात जागोजागी पाणी साचलेले असल्यामुळे आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. याच वॉर्डात जिल्हा सामान्य रुग्णालय असून या परिसरातील घाणीचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. (नगर प्रतिनिधी)