शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्याही घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:58 IST

भंडारा : मार्च महिन्याच्या मध्यंतरीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येचा स्फोट झाला. मात्र त्यानंतर चाचण्याच ...

भंडारा : मार्च महिन्याच्या मध्यंतरीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येचा स्फोट झाला. मात्र त्यानंतर चाचण्याच कमी झाल्याने रुग्णसंख्येतही घट दिसून येत आहे. जिल्ह्यातील गत चार दिवसांच्या आकडेवारीवर नजर घातल्यास ही बाब स्पष्टपणे जाणवत आहे.

जिल्ह्यात सद्य:स्थितीत ९०१८ इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. आतापर्यंत तीन लाख ४७ हजारपेक्षा जास्त नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ५३ हजार १२७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर ९०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्याचा रिकव्हरी रेट वधारत असला तरी चाचण्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे मृत्युदर ०१.७० इतका झाला आहे.

बॉक्स

ग्रामीण भागात टेस्टिंग कमीच

शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची आकडेवारी समोर यावी यासाठी ठिकठिकाणी चाचणी केली जात आहे; मात्र ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात टेस्टिंगचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. गतवर्षी ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होते. मात्र यावेळी ग्रामीण क्षेत्रातही रुग्णसंख्या वाढली आहे.

एप्रिल महिन्याच्या मध्यंतरी कोरोना चाचणींची संख्या वाढविण्यात आली होती. यातही ग्रामीण भागात आधी चाचण्या जास्त होत्या. मात्र त्यानंतर हळूहळू किटचा अभाव जाणवल्याने संख्या कमी कमी होत गेली. यामुळेच आज घडीला ग्रामीण भागात चाचणी कमीच होत असल्याचे जाणवत आहे. चाचणी होत असली तरी त्यात ॲंटिजेन चाचणीचे प्रमाण अधिक आहे.

बॉक्स

आरटीपीसीआरपेक्षा ॲंटिजेन तपासणी अधिक

जिल्ह्यात आतापर्यंत तीन लक्ष ४७ हजार ७९० व्यक्तींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली आहे. मात्र या तपासणीत आरटीपीसीआरपेक्षा ॲंटिजेन तपासणीत सर्वाधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याचे दिसून आले आहे. आजही आरटीपीसीआर चाचणी अल्पप्रमाणात होत असल्याचे दिसून येते.

ॲंटिजेन तपासणीत पॉझिटिव्हचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात होते. मात्र गत दोन दिवसात चाचण्याच कमी झाल्याने रुग्णसंख्याही कमी झाली आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या नऊ हजारांच्या वर असून, यातून होम क्वॉरण्टाइन असलेले रुग्ण मुक्त संचार करीत असल्याचेही दिसून येत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे कुठलीही सध्यातरी उपाययोजना नसल्याने धोक्याची घंटा वाढणार काय अशी चिन्हे दिसू लागली आहेत. गतवर्षी घरोघरी जाऊन विचारणा होत होती. यावेळी मात्र अतिरिक्त ताणामुळे ते शक्य झाले नाही.