शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
4
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
5
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
6
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टूक बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
7
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
8
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
9
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
10
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
11
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
12
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
13
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
14
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
15
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
16
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
17
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
18
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
19
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
20
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी

चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्याही घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:58 IST

भंडारा : मार्च महिन्याच्या मध्यंतरीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येचा स्फोट झाला. मात्र त्यानंतर चाचण्याच ...

भंडारा : मार्च महिन्याच्या मध्यंतरीपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत गेली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्येचा स्फोट झाला. मात्र त्यानंतर चाचण्याच कमी झाल्याने रुग्णसंख्येतही घट दिसून येत आहे. जिल्ह्यातील गत चार दिवसांच्या आकडेवारीवर नजर घातल्यास ही बाब स्पष्टपणे जाणवत आहे.

जिल्ह्यात सद्य:स्थितीत ९०१८ इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. आतापर्यंत तीन लाख ४७ हजारपेक्षा जास्त नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी ५३ हजार १२७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर ९०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्याचा रिकव्हरी रेट वधारत असला तरी चाचण्यांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत असल्याचे दिसून येते. दुसरीकडे मृत्युदर ०१.७० इतका झाला आहे.

बॉक्स

ग्रामीण भागात टेस्टिंग कमीच

शहरासह ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची आकडेवारी समोर यावी यासाठी ठिकठिकाणी चाचणी केली जात आहे; मात्र ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात टेस्टिंगचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. गतवर्षी ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होते. मात्र यावेळी ग्रामीण क्षेत्रातही रुग्णसंख्या वाढली आहे.

एप्रिल महिन्याच्या मध्यंतरी कोरोना चाचणींची संख्या वाढविण्यात आली होती. यातही ग्रामीण भागात आधी चाचण्या जास्त होत्या. मात्र त्यानंतर हळूहळू किटचा अभाव जाणवल्याने संख्या कमी कमी होत गेली. यामुळेच आज घडीला ग्रामीण भागात चाचणी कमीच होत असल्याचे जाणवत आहे. चाचणी होत असली तरी त्यात ॲंटिजेन चाचणीचे प्रमाण अधिक आहे.

बॉक्स

आरटीपीसीआरपेक्षा ॲंटिजेन तपासणी अधिक

जिल्ह्यात आतापर्यंत तीन लक्ष ४७ हजार ७९० व्यक्तींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली आहे. मात्र या तपासणीत आरटीपीसीआरपेक्षा ॲंटिजेन तपासणीत सर्वाधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याचे दिसून आले आहे. आजही आरटीपीसीआर चाचणी अल्पप्रमाणात होत असल्याचे दिसून येते.

ॲंटिजेन तपासणीत पॉझिटिव्हचे प्रमाण कमी-अधिक प्रमाणात होते. मात्र गत दोन दिवसात चाचण्याच कमी झाल्याने रुग्णसंख्याही कमी झाली आहे.

जिल्ह्यात सक्रिय रुग्णसंख्या नऊ हजारांच्या वर असून, यातून होम क्वॉरण्टाइन असलेले रुग्ण मुक्त संचार करीत असल्याचेही दिसून येत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाकडे कुठलीही सध्यातरी उपाययोजना नसल्याने धोक्याची घंटा वाढणार काय अशी चिन्हे दिसू लागली आहेत. गतवर्षी घरोघरी जाऊन विचारणा होत होती. यावेळी मात्र अतिरिक्त ताणामुळे ते शक्य झाले नाही.