शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आता ग्रामीण भागातलीही पोरं होणार अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:35 IST

राहुल भुतांगे तुमसर : यशस्वी होण्यासाठी व्यवस्थितरीत्या व तंत्रपूर्ण अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बहुदा ...

राहुल भुतांगे

तुमसर : यशस्वी होण्यासाठी व्यवस्थितरीत्या व तंत्रपूर्ण अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बहुदा या परीक्षेसाठीच्या अभ्यासाची योग्य दिशा सापडतच नाही. तीच योग्य दिशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळावी या उदात्त हेतूने गोबरवाही ठाणेदारांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले आहे. आता ग्रामीण भागातील पोरंही अधिकारी हाेणार असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे.

संपूर्ण जग हे स्पर्धेचे आहे. माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे, संगणकाचे युग आहे. हे आपण सतत ऐकतो, वाचतो आहोत. आयुष्य हीच जणू स्पर्धा आहे. हे जवळजवळ बरेचजण अनुभव घेत आहेत. ऐन तरुण वयातील काळ म्हणजे सुवर्णकाळच आहे. हा काळ काही केल्या पुन्हा परत येणार नाही. म्हणूनच या वयात आपल्या आयुष्याचे सोने करायला हवे. हा काळ म्हणजे जीवनध्येय निश्चितीचा काळ आहे ग्रामीण भागातील मुलांना योग्य ते मार्गदर्शन व शिक्षण मिळत नसल्यामुळे स्पर्धा परीक्षेत तो टिकाव धरू शकत नाही. मग त्यांच्या जीवनात नैराश्य येते आणि तेच ग्रामीण भागातील पोरातून काढण्यासाठी गोबरवाही पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले ठाणेदार दीपक पाटील यांनी पुढाकार घेतला. ठाण्यांतर्गत येत असलेल्या सर्व गावांना भेटी देऊन तेथील तरुण पिढीला भेटून शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आहेत. पोलीस भरती करिता ग्रामीण युवकांना प्रोत्साहित करून त्यांच्यासाठी विनामूल्य स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले आहे.

बाॅक्स

दर आठवड्याला विनामूल्य चाचणी परीक्षा

परीक्षा केंद्रात दर आठवड्याला विनामूल्य चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. त्यात विद्यार्थ्यांना प्रिंटेड प्रश्नपत्रिका, प्रिंटेड उत्तरपत्रिका, निकाल व पहिले तीन क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ चषक देणार येणार आहेत. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आपला अभ्यास किती झाला याचे मूल्यमापन सहज करता येईल, तसेच चाचणीला परिसरातील जास्त विद्यार्थी आल्यामुळे आपला अभ्यास नेमका किती आहे, याचे व्यापक अर्थाने मूल्यमापन हाेईल. मोठ्या शहरात जाऊन टेस्ट सिरीज लावण्याचा खर्च व वेळही वाचणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य व व्यापक मार्गदर्शन विनामूल्य मिळणार आहे.