शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आता ग्रामीण भागातलीही पोरं होणार अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:35 IST

राहुल भुतांगे तुमसर : यशस्वी होण्यासाठी व्यवस्थितरीत्या व तंत्रपूर्ण अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बहुदा ...

राहुल भुतांगे

तुमसर : यशस्वी होण्यासाठी व्यवस्थितरीत्या व तंत्रपूर्ण अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बहुदा या परीक्षेसाठीच्या अभ्यासाची योग्य दिशा सापडतच नाही. तीच योग्य दिशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळावी या उदात्त हेतूने गोबरवाही ठाणेदारांनी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले आहे. आता ग्रामीण भागातील पोरंही अधिकारी हाेणार असल्याचा विश्वास निर्माण झाला आहे.

संपूर्ण जग हे स्पर्धेचे आहे. माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे, संगणकाचे युग आहे. हे आपण सतत ऐकतो, वाचतो आहोत. आयुष्य हीच जणू स्पर्धा आहे. हे जवळजवळ बरेचजण अनुभव घेत आहेत. ऐन तरुण वयातील काळ म्हणजे सुवर्णकाळच आहे. हा काळ काही केल्या पुन्हा परत येणार नाही. म्हणूनच या वयात आपल्या आयुष्याचे सोने करायला हवे. हा काळ म्हणजे जीवनध्येय निश्चितीचा काळ आहे ग्रामीण भागातील मुलांना योग्य ते मार्गदर्शन व शिक्षण मिळत नसल्यामुळे स्पर्धा परीक्षेत तो टिकाव धरू शकत नाही. मग त्यांच्या जीवनात नैराश्य येते आणि तेच ग्रामीण भागातील पोरातून काढण्यासाठी गोबरवाही पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले ठाणेदार दीपक पाटील यांनी पुढाकार घेतला. ठाण्यांतर्गत येत असलेल्या सर्व गावांना भेटी देऊन तेथील तरुण पिढीला भेटून शिक्षणाचे महत्त्व पटवून देत आहेत. पोलीस भरती करिता ग्रामीण युवकांना प्रोत्साहित करून त्यांच्यासाठी विनामूल्य स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले आहे.

बाॅक्स

दर आठवड्याला विनामूल्य चाचणी परीक्षा

परीक्षा केंद्रात दर आठवड्याला विनामूल्य चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. त्यात विद्यार्थ्यांना प्रिंटेड प्रश्नपत्रिका, प्रिंटेड उत्तरपत्रिका, निकाल व पहिले तीन क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ चषक देणार येणार आहेत. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आपला अभ्यास किती झाला याचे मूल्यमापन सहज करता येईल, तसेच चाचणीला परिसरातील जास्त विद्यार्थी आल्यामुळे आपला अभ्यास नेमका किती आहे, याचे व्यापक अर्थाने मूल्यमापन हाेईल. मोठ्या शहरात जाऊन टेस्ट सिरीज लावण्याचा खर्च व वेळही वाचणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य व व्यापक मार्गदर्शन विनामूल्य मिळणार आहे.