शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

आता उरल्या ‘अस्मितादर्शकारांच्या’ आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 22:58 IST

‘आंबेडकरी साहित्यसृष्टी प्रज्ञाशक्तीचा अविष्कार आहे’ असे म्हणणाºया अस्मिताकार डॉ.गंगाधर पानतावने हे काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण आंबेडकरी साहित्य चळवळीवर शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देआंबेडकरी साहित्य वर्तुळात शोककळा : २०१२ मध्ये भंडाऱ्यात शेवटचे व्याख्यान

आॅनलाईन लोकमतभंडारा : ‘आंबेडकरी साहित्यसृष्टी प्रज्ञाशक्तीचा अविष्कार आहे’ असे म्हणणाºया अस्मिताकार डॉ.गंगाधर पानतावने हे काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण आंबेडकरी साहित्य चळवळीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने न भरून निघणारी हानी झाली असून आंबेडकरी चळवळ पोरकी झाली आहे.आंबेडकरी साहित्य व चळवळ सांस्कृतिक पुनरुत्थानाची शक्ती आहे, असे विचारसूत्र त्यांनी अस्मितादर्श रौप्य महोत्सवी मेळाव्यात मांडले होते. त्यांच्या जाण्यामुळे भंडारा येथील आंबेडकरी चळवळीत कार्य करणारे आंबेडकरी साहित्यिक अमृत बन्सोड, माया उके, सी.एम. बागडे, डॉ.धनराज भिमटे, विनोद मेश्राम यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीगर्भ तत्त्वज्ञानातून ज्या अनेक चळवळी जन्माला आल्या आहेत. त्यात वाड:मयीन आणि सांस्कृतिक चळवळ मौलिक आहे. दास्यमुक्त आणि शोषणमुक्त माणूस आणि समाज निर्माण करण्याची विराट शक्ती ज्या आंबेडकरी तत्त्वज्ञानात आहे, त्याचेच अपत्य म्हणजे अस्मितादर्श असे डॉ.गंगाधर पानतावणे म्हणायचे.सृजनशील तथा वैचारिक आणि संशोधनपर साहित्य निर्मितीचा सशक्त मागोवा घेणाºया अनेक पिढ्या ‘अस्मितादर्श’ने घडविल्या आणि प्रथितयश नवोदित साहित्य निर्मात्यांचा संवाद निर्माण व्हावा यासाठी सन १९७४ मध्ये पहिला अस्मितादर्श लेखक-वाचक मेळावा औरंगाबाद येथे घेण्यात आला. आता या मेळाव्याचे रूपांतर साहित्य संमेलनात झाले आहे, असेही अमृत बन्सोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आंबेडकरवादी साहित्यकांची मोठी फळी उभारणारे अस्मितादर्शकार डॉ.गंगाधर पानतावणे यांचे भंडारा नगरीत सन २०१२ मध्ये शेवटचे व्याख्यान झाले. त्यापूर्वी ८ व ९ मे १९८१ रोजी भंडारा जिल्हा दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि त्यानंतर २७ व २८ डिसेंबर १९९१ रोजी भंडारा जिल्हा बौद्ध साहित्य व सांस्कृतिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. त्यानंतर भंडारा येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात ३० एप्रिल व १ मे २००५ रोजी आयोजित फुले-आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते भंडारा येथे आले होते. या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष माया उके तर सचिव अमृत बन्सोड होते. या संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. या संमेलनात त्यांनी देशात विषमता, विकृती, विघटन मोठ्या प्रमाणात आहे. विकृतीला संस्कृती, अन्यायाला न्याय या दिशेने समाजाची वहिवाट सुरु आहे. समता प्रस्थापित करण्यासाठी समाजाची पुनर्बांधणी बाबासाहेबांना करायची होती, हे झाले तर समतेवर आधारित नवी संस्कृती अस्तित्वात येईल असे प्रतिपादन डॉ.पानतावणे यांनी केले होते. आज त्यांच्या आठवणींनी आंबेडकरी साहित्य वर्तुळात शोककळा पसरली आहे.