शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

यापुढे खोट्या तक्रारकर्त्यांच्या दुकानदाऱ्या होणार बंद

By admin | Updated: October 28, 2015 00:56 IST

वैयक्तिक आकसापोटी किंवा दबावाच्या भीतीने प्रशासकीय कार्यालयाकडे दाखल होणाऱ्या निनावी व खोट्या सहीने केलेल्या तक्रारीची आता दखल घेतली जाणार नाही.

सर्व विभागांना बजावले आदेश : निनावी तक्रार अर्ज आता बेदखलभंडारा : वैयक्तिक आकसापोटी किंवा दबावाच्या भीतीने प्रशासकीय कार्यालयाकडे दाखल होणाऱ्या निनावी व खोट्या सहीने केलेल्या तक्रारीची आता दखल घेतली जाणार नाही. याबाबत अप्पर मुख्य सचिव डॉ.पी.एस. मीना यांनी निनावी व खोट्या तक्रारींची दखल घेवू नये, असा आदेश मंत्रालयासह राज्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांसाठी जारी केला आहे. या आदेशामुळे खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर आळा बसून त्यांच्या दुकानदाऱ्या बंद होणार आहे.प्रशासकीय कार्यालयामध्ये महसूल, पोलीस विभाग तथा इतरही विभागाकडे निनावी तक्रारी दाखल होत असतात. अखेर अशा तक्रारींची तात्काळ दखल घेऊन चौकशी केली जात असे. परंतु, बहुतांश तक्रार अर्ज हे प्रतिस्पर्धी व्यक्तीला बदनाम करण्यासाठी कार्यालयाकडे पाठविले जात असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे केंद्र सरकारच्या १८ आॅक्टोबर २0१३ च्या शासन नियमानुसार अप्पर मुख्य सचिव डॉ. मीना यांनी तक्रारदाराचे नाव व पत्ता नोंद केलेला नाही, अशा निनावी तक्रारीमध्ये कोणत्याही स्वरूपाची माहिती अंर्तभुत असली तरी त्यावर कार्यवाही करण्यात येवू नये. ती तक्रार फक्त दप्तरी नोंद करावी, असा आदेश काढला आहे. या आदेशाप्रमाणे सर्वच शासकीय कार्यालयातून कार्यवाही करण्यात येणार आहे. या नव्या आदेशामुळे निनावी खोट्या व हेतू पुरस्सर तक्रारी करुन वचपा काढाच्या अनेकांच्या मनसुब्यावर पाणी फेरण्यात आले आहे. तसेच खोट्या तक्रारी करून काही प्रमाणात 'लक्ष्मी दर्शन' करण्याच्याही प्रकारावर या आदेशामुळे लगाम लागणार असल्याचे शासकीय वर्तुळात बोलले जात आहे. (शहर प्रतिनिधी)आरोपात तथ्य असल्यास दखलज्या तक्रारीमध्ये पडताळणी करता येऊ शकते, असे आरोप केलेले आहेत, अशा तक्रारी संबंधात प्रशासकीय किंवा मंत्रालयाने त्याची दखल घ्यावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेने ती तक्रार मुळ तक्रारदाराकडे पाठवून ती त्याने स्वत: केली आहे काय, याबाबत खात्री करून घेण्यात यावी. त्याच्याकडून पंधरा दिवसात प्रतिसाद मिळाला तर स्मरणपत्र पाठविण्यात यावे. त्यानंतरही माहिती प्राप्त न झाल्यास ती तक्रार खोट्या नावाची असल्याची नोंद करून दप्तरी दाखल करण्यात यावी. तसेच आपण स्वत: तक्रार केल्याचे मान्य केल्यास त्यावर कार्यवाही करताना तक्रार अर्जातील नाव, पत्ता गोपनीय ठेवून त्याची छायांकीत प्रत काढून ती चौकशीसाठी संबंधित यंत्रणाकडे द्यावी व अर्जाप्रमाणे कार्यवाही करावी असे या आदेशात म्हटले आहे. ब्लॅकमेलिंगवर बसणार आळानिनावी खोट्या तक्रारी करायच्या व नंतर वरिष्ठांकडून दबाव आणण्याच्या प्रकारात अलीकडे चांगलीच वाढ झाल्याचे काही प्रकरणावरुन निदर्शनात आले. ज्याच्या संबंधात तक्रार आहे, त्याच्याकडून काही मिळाले तर तक्रार परत घ्यायची, असे प्रकार हल्ली वाढले आहे. मात्र, या आदेशामुळे अशा महाभागांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.