शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

काम नाही, वेतन नाही

By admin | Updated: June 13, 2016 01:58 IST

स्वयंसेवी संस्थांकडून आदिवासी विद्यार्थ्यांकरिता चालविण्यात येणाऱ्या अनु. आश्रम शाळेची मान्यता रद्द झाल्यास कर्मचाऱ्यांचे ...

शासनाचे धोरण अन्यायकारक :आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचा विरोधतुमसर : स्वयंसेवी संस्थांकडून आदिवासी विद्यार्थ्यांकरिता चालविण्यात येणाऱ्या अनु. आश्रम शाळेची मान्यता रद्द झाल्यास कर्मचाऱ्यांचे जोपर्यंत इतरत्र समायोजन होत नाही तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याला वेतनही मिळणार नाही असे शासनाचे परिपत्रक धडकल्याने कर्मचाऱ्यांच्या परिवारावर उपासमारीची पाळी येवून रस्त्यावर आले असल्याने या अन्यायकारक शासन निर्णयाचा निषेध अनु. आश्रमशाळा कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.आदिवासी विकास विभागांतर्गत चालविण्यात येत असलेल्या अनु. आदिवासी आश्रम शाळा या शासनाच्या अटी व शर्तीच्य ध्येय धोरणानुसार चालविल्या जात नसल्यामुळे अशा अनुदानित आश्रमशाळेची कायमस्वरुपी मान्यता काढण्यात येते व शाळा बंद पडल्यास तेथील कर्मचाऱ्यांचे इतर अनुदानित शाळेतच त्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात येणार असे नियम आहे. त्या अनुषंगाने अप्पर व प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्या अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्याचे एक महिन्याच्या आत समायोजनाची कारवाई करणे आयुक्तांच्या आदेशाने बंधनकारक आहे. परंतु तसे होत नसल्यामुळे त्या कर्मचाऱ्याचे दोन दोन वर्ष तर कधी पाच वर्ष लोटल्यावरही त्याचे समायोजन केले जात नाही. ही वास्तविकता आहे. अशा परिस्थितीत मात्र महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाने ८ जून २०१६ ला परिपत्रक काढून स्वयंसेवी संस्थांकडून आदिवासी विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जाणाऱ्या मान्यताप्राप्त अनुदानित आश्रमशाळांतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजना होईपर्यंत त्यांना काम नाही, वेतन नाही धोरण लागू केला आहे. मात्र आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनच दिरंगाई होत असताना शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेळीच धरून आता काम नाही वेतन नाही हे धोरण करणे म्हणजे शासनाकडून व आदिवासी विकास विभागाकडून अन्याय व नैसर्गिक तसेच घटनात्मक तरतुदीच्या समानतेच्या मूलभूत तत्वांना बाधा आणण्याचा प्रयत्न केल्या जात असून कर्मचाऱ्याच्या कौटुंबिक व आर्थिक शोषण करून कर्मचाऱ्यांना संपविण्याचा कट कारस्थान शासनाने राबविला आहे. परिणामी कर्मचाऱ्याच्या हितार्थ संघटना कर्मचाऱ्याच्या पाठीशी असून अशा अन्यायकारक धोरणाचा निषेध करण्याकरिता प्रसंगी रस्त्यावर उतरेल असा इशाराही संघटनेचे पदाधिकारी भोजराज पुंडे, रविशंकर झिंगरे, विलास सपाटे, भास्कर भोयर, लंजे, मडावी, खुणे, मारवाडे, मेश्रामसह अन्य पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून दिला आहे. (शहर प्रतिनिधी)