शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

२० दिवसांपासून चुकारे नाही

By admin | Updated: December 12, 2015 00:34 IST

कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे.

शेतकरी संकटात : १७ हजार ५५४ क्विंटल धानाची खरेदी संजय साठवणे साकोलीकधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. दुष्काळाच्या छायेत जीवन जगताना दुसऱ्याच्याही पोटाला दोन घास मिळावे यासाठी राबणाऱ्या शेतकऱ्याची अवस्था सरकार कोणतेही आले तरीही तशीच राहते. यावर्षी निसर्गाने पाठ फिरविली. पाऊस नाही, धानाला किडीने ग्रासले. अपेक्षित उत्पन्न हाती आले नाही. आले तेही अत्यल्प. तरीही केंद्रावर धान देऊन २० दिवस लोटूनही शेतकऱ्यांना चुकारे मिळालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे.मागीलवर्षी शेतकऱ्यांना आलेल्या तोट्यातून शेतकरी कसाबसा सावरला. कर्ज काढून यावर्षी शेती केली मात्र यावर्षी निसर्गाने दगा दिला. मात्र शेतकऱ्याची जमेल तसे प्रयत्न करून वेळेचा सामना केला. पीक वाचविले. आलेले उत्पन्न शासकिय धान खरेदी केंद्रावर विकले.विर्शी व साकोली येथील धान खरेदी केंद्र १६ नोव्हेंबरला सुरु झाले. तेव्हापासून आतापर्यंत दोन्ही केंद्रावर १७ हजार ५५४ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. या धानाची एकूण किंमत २ कोटी ६९ लाख रूपये एवढी असून २१ नोव्हेंबरपर्यंत साकोली केंद्रावरील ४३ लाख ७६ हजार २७० रुपये तर विर्शी केंद्रावरील शेतकऱ्यांचे १२ लाख ६२ हजार ३७३ रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना मिळाले. उर्वरित रकमेची हुंडी केंद्रातर्फे तयार असली तरी शासनातर्फे पैसेच आले नसल्याने शेतकऱ्यांना धानाचे चुकारे मिळू शकलेले नाही.