शहरं
Join us  
Trending Stories
1
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
4
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
5
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
6
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
7
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
8
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
9
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
10
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
11
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
12
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
13
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
15
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
16
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
17
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
18
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
19
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
20
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल

लसीकरण नाही, तर वेतनही मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम प्रभाविपणे राबविली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून गावागावांत लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकही त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतु, आजही अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी लस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी असला, तरी धोका मात्र टळलेला नाही. एकीकडे जिल्ह्यातील ५० टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण होऊन जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. असे असताना शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कार्यरत अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना लसच घेतली नाही. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन रोखण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.भंडारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम प्रभाविपणे राबविली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून गावागावांत लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकही त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतु, आजही अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी लस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. वारंवार सूचना देऊनही या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लसीकरणाबाबत उदासीनता दाखविली आहे. आता प्रशासनाने कडक धोरण अवलंबित अद्यापही पहिला डोस घेतला नाही आणि दुसरा डोस प्रलंबित असलेल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन काढू नये, असे निर्देश लेखी स्वरुपात जारी करण्यात आले आहे. यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यासोबतच जिल्ह्यातील उद्योग, कंपन्या, कारखाने, खासगी आस्थापनात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १०० टक्के लसीकरण करून घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अद्याप पहिलाही डोस घेतला नाही अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांना आस्थापनात प्रवेश देऊ नये असे निर्देश देण्यात आले आहेत.कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेतील निर्णायक टप्पा पार पडला असून जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेची मोठी उपलब्धी समजली जात आहे. जिल्ह्यातील ८ लाख ९८ हजार ४०० नागरिकांपैकी ८ लाख ३१ हजार ७७५ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यांची टक्केवारी ९२.५७ टक्के आहे. तर ४ लाख ५३ हजार ८५८ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ५०.५४ टक्के आहे. कोरोना विषाणूविरुद्ध लढाईत लसीकरण हा महत्त्वाचा टप्पा असून जिल्ह्याने १८ नोव्हेंबरपर्यंत निर्णायक मोठा टप्पा गाठला आहे. जिल्ह्यातील अर्धी अधिक लोकसंख्या लसीने संरक्षित झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी गुरुवारी दिली. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा यांच्या समन्वयातून हे लक्ष साध्य झाल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरण मोहिमेला प्राधान्य देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या सूक्ष्म व योग्य नियोजनाने हा टप्पा गाठता आल्याचे त्यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी झाला असला, तरी नागरिकांनी दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येकाने कोरोना नियमांचे पालन करावे. तसेच जवळच्या केंद्रावर जाऊन लसीकरण करावे असे आवाहन केले आहे.

भंडारा जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर- कोरोना लसीकरणात भंडारा जिल्ह्याने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. आता राज्यातील मुंबई, पुणे नंतर भंडारा जिल्ह्याने स्थान पटकाविले आहे. जिल्ह्यात ५० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असून लवकरच १०० टक्के लसीकरण केले जाणार आहे.- लसीकरणासाठी राबविलेल्या मोहिमेतून जिल्ह्यात १८ ते ४४ या वयोगटांतील पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ७८ टक्के, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ४७ टक्के आहे. ४५ ते ५९ वयोगटांत पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १०३.९६, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ६० टक्के आणि ६० वर्षांवरील ११४ टक्के नागरिकांनी पहिला, तर ६१ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या