शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

लसीकरण नाही, तर वेतनही मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम प्रभाविपणे राबविली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून गावागावांत लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकही त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतु, आजही अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी लस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी असला, तरी धोका मात्र टळलेला नाही. एकीकडे जिल्ह्यातील ५० टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण होऊन जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. असे असताना शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कार्यरत अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना लसच घेतली नाही. अशा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन रोखण्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.भंडारा जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची मोहीम प्रभाविपणे राबविली जात आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून गावागावांत लसीकरण करण्यात येत आहे. नागरिकही त्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. परंतु, आजही अनेक शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी - कर्मचारी लस घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. वारंवार सूचना देऊनही या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लसीकरणाबाबत उदासीनता दाखविली आहे. आता प्रशासनाने कडक धोरण अवलंबित अद्यापही पहिला डोस घेतला नाही आणि दुसरा डोस प्रलंबित असलेल्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन काढू नये, असे निर्देश लेखी स्वरुपात जारी करण्यात आले आहे. यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. यासोबतच जिल्ह्यातील उद्योग, कंपन्या, कारखाने, खासगी आस्थापनात कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १०० टक्के लसीकरण करून घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अद्याप पहिलाही डोस घेतला नाही अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांना आस्थापनात प्रवेश देऊ नये असे निर्देश देण्यात आले आहेत.कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या मार्गदर्शनात लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेतील निर्णायक टप्पा पार पडला असून जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेची मोठी उपलब्धी समजली जात आहे. जिल्ह्यातील ८ लाख ९८ हजार ४०० नागरिकांपैकी ८ लाख ३१ हजार ७७५ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. त्यांची टक्केवारी ९२.५७ टक्के आहे. तर ४ लाख ५३ हजार ८५८ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण ५०.५४ टक्के आहे. कोरोना विषाणूविरुद्ध लढाईत लसीकरण हा महत्त्वाचा टप्पा असून जिल्ह्याने १८ नोव्हेंबरपर्यंत निर्णायक मोठा टप्पा गाठला आहे. जिल्ह्यातील अर्धी अधिक लोकसंख्या लसीने संरक्षित झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी गुरुवारी दिली. जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा यांच्या समन्वयातून हे लक्ष साध्य झाल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरण मोहिमेला प्राधान्य देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने केलेल्या सूक्ष्म व योग्य नियोजनाने हा टप्पा गाठता आल्याचे त्यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग कमी झाला असला, तरी नागरिकांनी दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येकाने कोरोना नियमांचे पालन करावे. तसेच जवळच्या केंद्रावर जाऊन लसीकरण करावे असे आवाहन केले आहे.

भंडारा जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर- कोरोना लसीकरणात भंडारा जिल्ह्याने सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. आता राज्यातील मुंबई, पुणे नंतर भंडारा जिल्ह्याने स्थान पटकाविले आहे. जिल्ह्यात ५० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असून लवकरच १०० टक्के लसीकरण केले जाणार आहे.- लसीकरणासाठी राबविलेल्या मोहिमेतून जिल्ह्यात १८ ते ४४ या वयोगटांतील पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ७८ टक्के, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ४७ टक्के आहे. ४५ ते ५९ वयोगटांत पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १०३.९६, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ६० टक्के आणि ६० वर्षांवरील ११४ टक्के नागरिकांनी पहिला, तर ६१ टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या