शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

ना बसायला जागा, ना डोक्यावर छत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 05:00 IST

प्रवासी उन्हात उभे राहताहेत याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. गावात पुन्हा यासाठी वर्गणी गोळा करून येथील शेड बांधायचे का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. कोरोना संकट काळात शाळा बंद होत्या; पण आज हळूहळू का होईना शाळा पूर्वपदावर येत आहेत. त्यात आता विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणी उन्हाचे वाढते तापमान याकरता आता विचार होणे गरजेचे झाले आहे.

ठळक मुद्देव्यथा अड्याळ प्रवासी निवाऱ्याची : प्रवाशांचा जीव धोक्यात, धूळीचा त्रास नित्याचाच

विशाल रणदिवेलोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : भंडारा - पवनी महामार्गावरील अड्याळ येथील प्रवासी निवाऱ्याची दुर्दशा झाली आहे. ना बसायला जागा, ना डोक्यावर छत, ना सुविधा. यापूर्वी प्रवाशांना निदान उभ्या असलेल्या झाडाची तथा वर्गणी गोळा करून तयार झालेल्या मंडपाची तरी सावली मिळायची आणि त्यात कसेतरी प्रवासी उभे राहायचे; पण आज तेही उपलब्ध नाही. या ज्वलंत समस्येकडे कुणी लक्ष देणार काय, असा सवाल आहे. प्रवासी उन्हात उभे राहताहेत याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. गावात पुन्हा यासाठी वर्गणी गोळा करून येथील शेड बांधायचे का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. कोरोना संकट काळात शाळा बंद होत्या; पण आज हळूहळू का होईना शाळा पूर्वपदावर येत आहेत. त्यात आता विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणी उन्हाचे वाढते तापमान याकरता आता विचार होणे गरजेचे झाले आहे.आधी जे शेड होते, काही सिमेंट खुर्च्या होत्या, त्या गेल्या कुठे, हाही संशोधनाचा विषय आहे. कारण त्या खुर्च्या व शेड हे कुणी लोकप्रतिनिधी अथवा ग्रामपंचायत प्रशासनाचे नसून ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून केलेल्या पैशाने ती सर्व व्यवस्था केली होती, हेही सत्य आहे. महामार्गाच्या दोन्हीही बाजूंना जेव्हा तेथील नालीचे बांधकाम करण्यात आले. तेव्हापासून तेथील शेड व खुर्च्या कुठे गेल्या, कुठे आहेत, याचा विचार करणे आज गरजेचे झाले आहे. दिवसेंदिवस ऊन वाढत चालले आहे, याकडे आताच लक्ष दिले गेले नाही, तर वाढत्या उन्हात  याठिकाणी एकही छत नसल्याने  एखाद्या वयोवृद्ध इसमाचा तथा बालकाचा व एखाद्या विद्यार्थ्याचासुद्धा जीव धोक्यात येऊ शकतो, ही शक्यताही नाकारता येत नाही.लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नेहमीच अड्याळ हे गाव चर्चेत राहत असतानासुद्धा याठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी एक साधा प्रवासी निवारा तयार करायला जर ग्रामवासी वर्गणी गोळा करून मदतीचा हात पुढे करतात, तर मग लोकप्रतिनिधी तथा लोकप्रिय नेते व राजकारणी मंडळी अशा वेळी जातात कुठे, असेही आज बोलले जात आहे.महामार्गाचे बांधकाम सुरू आहे; पण ज्या-ज्याठिकाणी कामे झालीत त्या-त्याठिकाणी दिवसातून कितीदा पाण्याचा शिडकाव होतो. ग्रामवासी तथा प्रवाशांना रोजचा किती त्रास होतो, याची जराशी तरी जाणीव आहे का कुणाला, असाही सवाल यावेळी उपस्थित केला जात आहे.

अतिक्रमण मोहिमेत काढला तात्पुरता निवारा

अड्याळ बसथांबा परिसरात आधी पक्का प्रवासी निवारा होता. अतिक्रमण हटविण्यात आले तेव्हा तोही पाडण्यात आला. त्यानंतर पक्का प्रवासी निवारा  बांधण्यात आला नाही. आज याठिकाणी रोज शेकडोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात; पण सुरक्षितता नाही. प्रवाशांना साधे उभे राहायला, बसायला,  छतसुद्धा नाही. मग  प्रवाशांनी उन्हात राहायचे कसे, त्यात वृद्ध व बालकांना त्याचा किती त्रास होतो आहे, याची जाणीव तरी कुणाला आहे का? असेही आज बोलले जात आहे.

 

टॅग्स :state transportएसटी