शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

यापुढे रेती तस्करांवर लागणार मोक्का कायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:46 IST

रेतीघाट लिलाव नसलेल्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरीने उचल सर्रास सुरु आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेती तस्करांच्या मुसक्या आवरण्याकरिता मोक्का कायदा लावण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहे.

ठळक मुद्देनदी बचाव व पर्यावरण संरक्षणाकरिता पुढाकार : उच्च न्यायालयाचे राज्य शासनाला आदेश

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : रेतीघाट लिलाव नसलेल्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरीने उचल सर्रास सुरु आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्याची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेती तस्करांच्या मुसक्या आवरण्याकरिता मोक्का कायदा लावण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहे. या आदेशाने रेती तस्करात एकच खळबळ माजली असून प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.मागील काही वर्षापासून चोरीने नदी पात्रातून प्रचंड रेतीचा उपसा सुरु आहे. रेती चोरी रोखण्याकरिता राज्य शासनाने अनेक नियम तयार केले, परंतु रेती चोरी कमी झाली नाही. उलट त्यात मोठी वाढ झाली. अनेक नदीपात्र पोखरुन टाकण्यात आले. नदी पात्रात रेती ऐवजी माती दिसत आहे. रेती चोरी होऊ नये याकरिता राज्य शासनाने मोठा आर्थिक दंड ठोठावण्याचा नियम बनविला, परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही.पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्हे रेती तस्करांचे नंदनवन बनले. त्यात झुंडशाही, दमदाटी यासारखे प्रमाण वाढले. संघटीत रेती चोरी करणारे रॅकेट येथे सक्रीय झाले. नदीघाट लिलाव प्रक्रीयेत याचा मोठा प्रभाव आहे. लिलावात कोणता घाट घ्यावयाचा ते रॅकेट ठरविते. बनावट टीपीचा वापर करुन चोरीची रेतीची सर्रास वाहतूक करणे सुरु आहे. रेती घाट लिलाव नसतांना सर्रास रेती उत्खनन अनेक घाटात सुरु आहे. त्यामुळे पर्यावरणाची प्रचंड हाणी सुरु आहे.यासंदर्भात अनेक सामाजिक संघटना पुढे आल्या, पंरतु त्याचा प्रभाव पडला नाही. शासकीय यंत्रणेने नांगी टाकल्याचे दृष्य सर्वत्र दिसत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने रेती चोरी करणाऱ्या तस्करांवर थेट मोक्का लावण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहे. या आदेशाने रेती तस्करांत प्रचंड खळबळ माजली आहे. प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. येथे पोलीस प्रशासन व महसुल प्रशासन संयुक्त कारर्वा करणार असल्याचे समजते.प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यावर कारवाईरेतीचे उत्खनन करुन वाहतूक प्रकरणी संबंधित प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदतीमुळेच रेतीची चोरी वाढली आहे. येथे रेती घाटांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी व पाहणी होणार आहे. सदर रेती चोरीला जबाबदार कोण हे ठरविले जाऊन त्यानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे. गाव पातळीपासून जिल्हापातळीवर नियंत्रण प्रस्थापित करणारे डझनभर अधिकारी व कर्मचारी आहेत. प्रत्येकाच्या जबाबदाºया शासनाने ठरविल्या आहेत. त्यानंतरही सर्रास रेतीचे खणण व चोरीने वाहतूक सुरुच आहे. यामागील अर्थकारण व राजकीय संबंध याचा तपास येथे होणार असल्याचे समजते. मोबाईल डाटा व डीव्हीआर यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे.रेती तस्करांवर मोक्का लावण्याचे आदेश यापूर्वी देण्यात आले आहे. संघटीत गुन्हेगारी, दहशत, दमदाटी व उत्पाद माजविणारे तथा रेती चोरी प्रकरणात काही वेळा आर्थिक दंड वसूल केलेल्या इसमाविरोधात मोक्का लावण्याची तरतुद आहे. राज्य शासनाकडून इतक्यात तसे आदेश महसूल यंत्रणेला प्राप्त झाले नाही.- गजेंद्र बालपांडे, तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय अधिकारी तुमसर

टॅग्स :sandवाळू