शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: जरांगे सांगत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही; हायकोर्ट निर्देशांनंतरही मराठा आंदोलक ठाम
2
“बस… जरांगे आता थांबा! आंदोलन संपवून सरकारला सहकार्य करा, नामुष्की टाळा”; कुणी दिला सल्ला?
3
"काँग्रेसच्या स्टेजवरून माझ्या आईला शिवी दिली, हा अपमान..."; पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले भावूक
4
बुरख्यातली गर्लफ्रेंड निघाली मुलगा! एकत्र प्रवास करूनही ओळखू शकला नाही बॉयफ्रेंड; पुढचं ऐकून व्हाल हैराण
5
अवनीत कौरने विराट कोहलीच्या इंस्टाग्राम पोस्ट लाइकवर सोडलं मौन, म्हणाली - "मी कधीच विसरत नाही..."
6
"अकाली एक्झिट वगैरे शब्द...", प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिजीतची भावुक पोस्ट
7
"लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले?
8
मतचोरीच्या ‘ॲटम बॉम्ब’नंतर आता फुटेल ‘हायड्रोजन बॉम्ब’; राहुल गांधींचा इशारा
9
पीटर नवारोंनी पुन्हा गरळ ओकली, मोदी-पुतिन-जिनपिंग यांच्या भेटीवर केले मोठे विधान
10
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
11
बलात्काराचा आरोप असलेला AAP आमदार गोळीबार करत पोलिसांच्या तावडीतून पळाला...
12
काय आहे शी जिनपिंग यांचा 'GGI फॉर्म्युला'?, अमेरिकेला थेट आव्हान; रशिया-भारताचा तात्काळ होकार
13
बनावट पासपोर्ट वापरल्यास कठोर शिक्षा; नवीन स्थलांतर व परदेशी नागरिक कायदा लागू
14
"भारतानं रोखलं आमचं SCO सदस्यत्व!"; मुस्लीम देश भडकला; म्हणाला, 'पाकिस्तान...'
15
Ganesh Festival 2025: 'घालीन लोटांगण' सुरू होताच स्वत:भोवती प्रदक्षिणा घालता का? थांबा, तुम्ही चुकताय
16
Lalbaugcha Raja: लालबागचा राजा मंडळाला मानवी हक्क आयोगाची नोटीस; ‘व्हीआयपी’ दर्शनाबाबत तक्रार!
17
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
18
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
19
४ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: तुळशीचा १ उपाय करा, पूर्ण पुण्य मिळवा; श्रीविष्णू कृपा करतील
20
MI च्या ताफ्यातून स्टार झालेल्या पोलार्डची शाहरुखच्या संघाकडून 'हिरोगिरी'! ८ चेंडूत ७ गगनचुंबी षटकार (VIDEO)

जिल्हा बँकेत नोटांना ‘नो एण्ट्री’

By admin | Updated: November 12, 2016 00:32 IST

दोन दिवसांपुर्वी ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या. त्यामुळे सरकारने सर्वच बॅकांना जुन्या नोटा घेण्याचे आदेश देण्यात आले.

दुसऱ्या दिवशीही रांगा : भंडाऱ्यात दोन हजारांची नोट दाखल, पाचशेच्या नोटेची उत्सुकताभंडारा : दोन दिवसांपुर्वी ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या. त्यामुळे सरकारने सर्वच बॅकांना जुन्या नोटा घेण्याचे आदेश देण्यात आले. मात्र भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या नोटा घेण्यासाठी नकार दिला. बँकेत संचालक मंडळ असते तर असा प्रकार घडला नसता, असे ग्राहकांचे म्हणने होते. प्रशासक मंडळांमुळे ग्राहकांना समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाही. शुक्रवारला सकाळच्या सत्रात जिल्हा बँक उघडताच ग्राहकांनी आणलेल्या ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी बँकेने नकार दिला. परिणामी ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आल्यापावली परतावे लागले. सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची बँक असलेल्या जिल्हा बँकेत सर्वाधिक खाते शेतकऱ्यांचे आहेत. चलनातून ५०० व १००० रूपयांच्या नोटा रद्द होताच ग्राहकांनी या बँकेतही नोटा बदलविण्यासाठी गर्दी केली. मात्र ग्राहकांच्या निराशा आली. दरम्यान, बँक कर्मचारी व ग्राहकांमध्ये हुज्जतबाजी झाली. मासळ शाखेमध्ये ५०० व १००० रूपयांचा व्यवहार बंद ठेवण्यात आल्यामुळे ग्राहकांना पैशाची अदलाबदल करता न आल्यामुळे ग्राहकांमध्ये कमालिचा असंतोष पसरला होता. (प्रतिनिधी)दोन दिवस ‘टोल फ्री’चा भंडारा जिल्ह्यातून मार्गाक्रमण होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दोन टोल नाके आहेत. यापैकी कारधा येथे तर दुसरे साकोली-सौंदड मार्गावर आहे. पंतप्रधानांच्या ५०० व १००० रुपयांच्या ‘नोटा’ रद्दच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यात दोन दिवसपर्यंत नागरिकांसाठी पथकर नाका ‘टोल फ्री’ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ९ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजतापासून नाक्यावर टोल आकारण्यात आला नाही. १० व ११ नोव्हेंबरला दोन दिवस टोल नाके बंद असले तरी त्याची भरपाई शासन करून देणार आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गावर १४ नोव्हेंबरपर्यंत टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. दोन दिवसाच्या टोल बंदीमुळे लक्षावधी रूपयांची उलाढाल थांबली. १५ नोव्हेंबरपासून पुन्हा टोल आकारला जाणार आहे. शहरातील अर्धेअधिक एटीएम बंदचभंडारा शहरात सर्वच राष्ट्रीयकृत बँका व सहकारी क्षेत्रातील बँकांचे शंभरावर एटीएम आहेत. मात्र यापैकी अर्धेधिक एटीएम आज तिसऱ्या दिवशीही बंदच होते. परीणामी ‘रोख’ काढण्यासाठी नागरिकांची धावपळ झाली. शहरात सर्वाधिक एटीएम सेंटर हे स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआसीआय, युनियन बँक, महाराष्ट्र बँक, जिल्हा बँक यासह अन्य बँकाचे एटीएम आहेत. यापैकी बहुतांश एटीएम तिसऱ्या दिवशीही बंद होते. जे एटीएम सुरू होते त्यातून केवळ एकावेळी ग्राहकाला दोन हजार रूपयांचे विड्राल करता येत होते.