शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

जिल्हा बँकेत नोटांना ‘नो एण्ट्री’

By admin | Updated: November 12, 2016 00:32 IST

दोन दिवसांपुर्वी ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या. त्यामुळे सरकारने सर्वच बॅकांना जुन्या नोटा घेण्याचे आदेश देण्यात आले.

दुसऱ्या दिवशीही रांगा : भंडाऱ्यात दोन हजारांची नोट दाखल, पाचशेच्या नोटेची उत्सुकताभंडारा : दोन दिवसांपुर्वी ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या. त्यामुळे सरकारने सर्वच बॅकांना जुन्या नोटा घेण्याचे आदेश देण्यात आले. मात्र भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या नोटा घेण्यासाठी नकार दिला. बँकेत संचालक मंडळ असते तर असा प्रकार घडला नसता, असे ग्राहकांचे म्हणने होते. प्रशासक मंडळांमुळे ग्राहकांना समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाही. शुक्रवारला सकाळच्या सत्रात जिल्हा बँक उघडताच ग्राहकांनी आणलेल्या ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी बँकेने नकार दिला. परिणामी ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आल्यापावली परतावे लागले. सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची बँक असलेल्या जिल्हा बँकेत सर्वाधिक खाते शेतकऱ्यांचे आहेत. चलनातून ५०० व १००० रूपयांच्या नोटा रद्द होताच ग्राहकांनी या बँकेतही नोटा बदलविण्यासाठी गर्दी केली. मात्र ग्राहकांच्या निराशा आली. दरम्यान, बँक कर्मचारी व ग्राहकांमध्ये हुज्जतबाजी झाली. मासळ शाखेमध्ये ५०० व १००० रूपयांचा व्यवहार बंद ठेवण्यात आल्यामुळे ग्राहकांना पैशाची अदलाबदल करता न आल्यामुळे ग्राहकांमध्ये कमालिचा असंतोष पसरला होता. (प्रतिनिधी)दोन दिवस ‘टोल फ्री’चा भंडारा जिल्ह्यातून मार्गाक्रमण होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दोन टोल नाके आहेत. यापैकी कारधा येथे तर दुसरे साकोली-सौंदड मार्गावर आहे. पंतप्रधानांच्या ५०० व १००० रुपयांच्या ‘नोटा’ रद्दच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यात दोन दिवसपर्यंत नागरिकांसाठी पथकर नाका ‘टोल फ्री’ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ९ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजतापासून नाक्यावर टोल आकारण्यात आला नाही. १० व ११ नोव्हेंबरला दोन दिवस टोल नाके बंद असले तरी त्याची भरपाई शासन करून देणार आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गावर १४ नोव्हेंबरपर्यंत टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. दोन दिवसाच्या टोल बंदीमुळे लक्षावधी रूपयांची उलाढाल थांबली. १५ नोव्हेंबरपासून पुन्हा टोल आकारला जाणार आहे. शहरातील अर्धेअधिक एटीएम बंदचभंडारा शहरात सर्वच राष्ट्रीयकृत बँका व सहकारी क्षेत्रातील बँकांचे शंभरावर एटीएम आहेत. मात्र यापैकी अर्धेधिक एटीएम आज तिसऱ्या दिवशीही बंदच होते. परीणामी ‘रोख’ काढण्यासाठी नागरिकांची धावपळ झाली. शहरात सर्वाधिक एटीएम सेंटर हे स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआसीआय, युनियन बँक, महाराष्ट्र बँक, जिल्हा बँक यासह अन्य बँकाचे एटीएम आहेत. यापैकी बहुतांश एटीएम तिसऱ्या दिवशीही बंद होते. जे एटीएम सुरू होते त्यातून केवळ एकावेळी ग्राहकाला दोन हजार रूपयांचे विड्राल करता येत होते.