करडी(पालोरा) : नरसिंग टोला / देव्हाडा (बु.) येथील वैनगंगा खासगी आयटीआय संस्थेने फिटर ट्रेड म ध्ये सन २0११ - १२ या वर्षात (दोन वर्षीय) प्रशिक्षण पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांचा निकाल दिलेला नाही. एवढेच नाही तर ठरलेले पैसे देऊनही अतिरिक्त पैशाची मागणी करीत संस्थेने मार्कलिस्ट, टीसी व डिप्लोमा सुद्धा रोखून धरल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. संस्थेने विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ मांडला असून अधिकाराचा दुरुपयोग केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.देव्हाडा बु. / नरसिंग टोला येथील वैनगंगा औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही खासगी औद्योगिक प्रशिक्षण देणारी संस्था आहे. सदर संस्थेत सन २0१0-१२ या वर्षात देव्हाडा (खुर्द) येथील राकेश वैद्य या विद्यार्थ्यांने फिटर ट्रेडसाठी रितसर प्रवेश घेतला. दोन वर्षाचे प्रशिक्षण सुद्धा संस्थेच्या नियमांच्या चौकटीत बसून पूर्ण केले. प्रशिक्षणासाठी संस्थेने राकेश कडून ३४,000 रुपये प्रशिक्षण फिस म्हणून घेण्याचे मान्य केले. राकेशनेसुद्धा संस्थेने ठरवून दिलेली ३४,000 रुपयांची फिस दिली. मात्र त्यानंतरही संस्थेने त्यांचेकडून अतिरिक्त २,000 रुपये वसुल केले. आपले प्रशिक्षण व पुढील भवितव्य अडचणीत येऊ नये म्हणून मुकाट्याने टप्प्याटप्प्याने सर्व फिस दिली. दोन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून राकेशने परीक्षा दिली. परंतु दोन वर्षाचा कालावधी लोटला असताना संस्थेने त्या विद्यार्थ्यांला परीक्षेचा निकाल दिला नाही. ३६,000 रुपये दिल्यानंतरही संस्थेकडून अतिरिक्त पैशाची मागणी केली गेली. ती न दिल्यामुळे संस्थेने निकालच रोखून धरला नाही तर मार्कलिस्ट व टिसी आणि डिप्लोमा सुद्धा दिला नाही. अतिरिक्त पैसे दिल्याशिवाय निकाल दिला जाणार नाही अशी धमकी दिली गेल्याचा आरोप राकेशचा आहे. निकाल देण्याची, मार्कलिस्ट, टीसी व डिप्लोमा देण्याची मागणी वारंवार राकेशकडून झाली असताना संस्थेने सौजन्याची भूमिका घेतली नाही. अतिरिक्त पैशासाठी विद्यार्थ्यांंच्या भवितव्यालाच वेठीस धरण्याचा गंभीर गैरप्रकार संस्थेने केला. प्रकरणी वरिष्ठांनी दखल घेण्याची मागणी आहे.प्राचार्याने डिप्लोमा घेऊन जाण्याचे पाठविले पत्रवारंवार मागणी करूनही निकाल व कागदपत्रे न देणार्या वैनगंगा औद्योगिक प्रशिक्षण संस्था देव्हाडा नरसिंगटोलाच्या प्राचार्यांनी दि. १९.७.२0१३ रोजी राकेश वैद्य या विद्यार्थ्यांंला त्याच्या घरच्या पत्यावर पोष्टाने साध्या पोस्टकार्डचे पत्र पाठविले. आपण आयटीआय मधून डिप्लोमा घेऊन जावे एवढेच वाक्य त्यावर लिहिलेले पोस्टकार्डवरच स्वत:चा ९८२३८६४३७८ क्रमांकाचा मोबाईल नंबर दिला. पत्र मिळाल्यानंतरही राकेशने अनेकदा संस्थेच्या चकरा काढल्या. मात्र काहीही दिले गेले नाही. प्रकरणी न्यायाची मागणी राकेश वैद्य याने केली आहे. (वार्ताहर)
रकमेसाठी दोन वर्र्षांपासून निकाल दिला नाही
By admin | Updated: June 8, 2014 23:43 IST