शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
4
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
5
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
6
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
7
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
8
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
9
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
10
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
11
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
12
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
13
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
14
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
15
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
16
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
17
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
18
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
19
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
20
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख

ना कारवाई, ना दंड

By admin | Updated: October 29, 2015 01:06 IST

‘स्वच्छ भारत अभियाना’तंर्गत उघड्यावर शौचाला जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.

आरोग्य धोक्यात : उघड्यावर शौच सुरूच, आधुनिक तांत्रिक माध्यमाची सुरूवात कधी?भंडारा : ‘स्वच्छ भारत अभियाना’तंर्गत उघड्यावर शौचाला जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर ‘गुड मॉर्निंग दल’ स्थापन करून त्यांची गस्त घालण्याचे आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. परंतु, या अभियानाला अनेक महिने लोटले तरी कुठेही कोणती कारवाई झालेली नाही, ना कुणालाही दंड झाला नाही. त्यामुळे हे अभियान प्रसिद्धीचा स्टंट झाला आहे.उघड्यावर शौच केल्यामुळे अनेक आजारांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. त्यामुळेच स्वच्छतेचे महत्व ओळखून सर्वत्र स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत उघड्यावर शौच करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कारवाई होणार आहे. याबाबत विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. गृहविभागाने पोलीस यंत्रणेचे सहकार्य घेण्यासाठी १२ आॅगस्ट २००८ च्या परिपत्रकाचा उपयोग करून मुंबई पोलीस अधिनियमाअंतर्गत फौजदारी कारवाईचे निर्देशही दिले आहेत. परंतु प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाही. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ४९ अंतर्गत ग्रामपंचायतचे कार्य चालविण्यासाठी विविध ग्राम विकास समितीचे गठन केले जाते. यात गावातील गणमान्य व्यक्तीचा समावेश असेल. समितीच्या सदस्यांना शौचालय उपयोगाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत व पंचायत समितीस्तरावर गस्त घालण्याचे आदेशात म्हटले आहे. मात्र अशी गस्त कुठेही दिसत नाही. ग्रामीण क्षेत्रातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात स्मार्ट फोनचा उपयोग करीत आहेत. जिल्हास्तरावर स्वच्छ भारत मिशनच्यावतीने वॉटस्अ‍ॅपसारखे अ‍ॅप तयार करून स्वच्छतेसंबंधी माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. घाण पसरविणाऱ्यांवर काय कारवाई केली जाऊ शकते, याची माहिती आधुनिक तांत्रिक माध्यमाने देण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)स्वच्छताविषयक जनजागृतीकडे दुर्लक्षस्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. मात्र जनजागृतीकडे दुर्लक्ष करून ग्रामीण भागात उघड्यावर शौच केले जात आहे. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा रस्त्यावर चालणेसुद्धा कठिण होऊन जाते. अशाप्रकारे घाण पसरविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व ग्रामसेवकांनी विनंती केल्यावर पोलिसांकडून कारवाईसाठी सहकार्य केले जाते.ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारेभंडारा शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसून येतात. त्यावर मोकाट जनावरे चरतात. पॉलिथीन बॅगमध्ये लोक काही खाण्याच्या वस्तू, शिळे अन्न कचऱ्यात फेकतात. मोकाट जनावरे ते पदार्थ खाताना सोबत पॉलिथीन बॅगही खाऊन टाकतात. त्यामुळे त्यांच्या पोटात प्लॅस्टिक जमून काही दिवसांनी त्यांचे पोट फुगते. त्यातूनच जनावरांवर जीव गमवावा लागतो. पण त्याबाबत पालिका प्रशासन काहीही कार्यवाही करीत नाही.