शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राणी मानवी संघर्षात नऊ जणांचा बळी

By admin | Updated: October 29, 2014 22:43 IST

भंडारा वन विभागांतर्गत जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतपिकांसह पशुधन व मानवहानी झालेल्या आहेत. मानव वन्यप्राणी संघर्षात पाच वर्षात नऊ व्यक्तींचा बळी

पाच वर्षांत तीन कोटींची नुकसान भरपाई : १२७ मनुष्य जखमी, ३५१ पाळीव जनावरे फस्तप्रशांत देसाई - भंडाराभंडारा वन विभागांतर्गत जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतपिकांसह पशुधन व मानवहानी झालेल्या आहेत. मानव वन्यप्राणी संघर्षात पाच वर्षात नऊ व्यक्तींचा बळी तर १२७ व्यक्ती जखमी, ३५१ पशुधन ठार तर ३,१०२ शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. पाच वर्षात नुकसानीपोटी भंडारा वनविभागाने ३५८९ प्रकरणात २ कोटी ९१ लाख ६ हजार ७०० रूपयांचे नुकसान भरपाई वाटप केले आहे. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात वन्यप्राण्यांनी केलेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईचे ६१८ प्रकरण वनविभागाकडे आले. त्यात ३३ लाख ४५ हजार ४५ रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. वन्यप्राण्यांनी पशुधनावर हल्ला करून ४१ पाळीव जनावरांचा बळी घेतला आहे. त्या मोबदल्यात २ लाख ५७ हजार ४०५ रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. वन्यप्राण्यांनी मनुष्यांवर हल्ला करून २७ व्यक्तींना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी वनविभागाने ३ लाख २८ हजार ५७५ रूपयांची भरपाई संबंधीतांच्या नातेवाईकांना करण्यात आली आहे. सहा महिन्यात ६८६ प्रकरणांसाठी वन विभागाने ३९ लाख ३१ हजार २५ रूपयांचे नुकसान वाटप केले आहे.सन २०१०-११ पासून सप्टेंबर २०१४ या पाच वर्षाच्या दरम्यान वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात शेतपिक, पशुधन व मानवहानी केली आहे. भंडारा वन विभागात ३ हजार ५८९ प्रकरणांची नोंद करण्यात आलेली आहेत. त्यातील नुकसानग्रस्तांना २ कोटी ९१ लााख ६ हजार ७०० रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. यात शेतपिकांच्या नुकसानीपोटी १ कोटी ४१ लाख ८२ हजार ६२५ रूपये, पशुधनाच्या नुकसानीसाठी २४ लाख ९३५ रूपये, जखमी मनुष्यांना २२ लाख ३३ हजार १४० रूपये तर ठार झालेल्या नऊ व्यक्तींच्या कुटूंबियांना २१ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. २०१०-११ मध्ये वन्यप्राण्यांनी ८१ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान केले, ७७ पशुधन ठार, २७ व्यक्ती जखमी तर दोघांचा बळी घेतला. वनविभागने १८७ प्रकरणात १६ लाख ९१ हजार ६८४ रूपयांचे नुकसान भरपाई वाटप केली. २०११-१२ मध्ये शेतपिकांची २२५ प्रकरणे, ९६ पशुधन ठार, ४३ व्यक्ती जखमी तर तिघांचा मृत्यू झाला. ३६७ प्रकरणात वनविभागाने २७ लाख ६ हजार ८४७ रूपयांचे नुकसान भरपाई वाटप केले. सन २०१२-१३ मध्ये ७८६ शेतपिकांची नुकसानीसंबंधी प्रकरणे, ६४ पशुधन ठार, १६ व्यक्ती जखमी तर तिघांचा बळी वन्यप्राण्यांनी घेतला. या ८६९ प्रकरणात ४८ लाख २७ हजार ९५२ रूपयांचे नुकसान भरपाई वाटप करण्यात आले. २०१३-१४ मध्ये वन्यप्राण्यांनी १ हजार ३९२ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान केले. ७३ पशुधन ठार, १४ व्यक्ती जखमी तर एकाचा बळी घेतला. १ हजार ४८० प्रकरणात वनविभागने ७७ लाख ५९ हजार १९२ रूपयांची मदत दिली आहे.