शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
2
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
3
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
4
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
5
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
6
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
7
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
8
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
9
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
10
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
11
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
12
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
13
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
14
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
15
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
16
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
17
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
18
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
19
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
20
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?

पोस्ट आॅफिसला नऊ लाखांचे देयक

By admin | Updated: June 11, 2016 00:25 IST

वीज महावितरण कंपनीकडून शहरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असतानाच

कारभार महावितरणचा : घरगुती वीज ग्राहकांचीही लूटभंडारा : वीज महावितरण कंपनीकडून शहरात वारंवार वीज पुरवठा खंडीत होण्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत असतानाच आता ग्राहकांना अवाढव्य वीज देयके देण्याचा सपाटा सुरू करण्यात आला आहे. घरगुती वीज ग्राहकांनाही याचा फटका सहन करावा लागत असतानाच भंडारा पोस्ट आॅफिसला ९ लाख रुपयांचे वीज देयके देऊन महावितरणने खळबळ उडवून दिली आहे.भंडारा पोस्ट आॅफिसला महिन्याकाठी ३० ते ३५ हजार वीज देयके येते. परंतु या महिन्यात वीज महावितरण कंपनीने ९ लाख ३५ हजार ६९० रूपयांचे वीज देयके पाठविले आहे. ३ मे रोजी ७२६८१ इतकी रिडींग होती. ३ जून रोजी १४३०२८ रिडींग होती. ७०३४७ युनिट दाखविण्यात आले. या युनिटचे ९ लाख ३५ हजार ६९० रूपयांचे देयक पाठविण्यात आले. हे देयक पाहताच पोस्टातील अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. वास्तविक पाहता ज्या कर्मचाऱ्याने मीटर न पाहताच रिडींग नोंदविल्यामुळे नऊ लाख रूपयांचे भरमसाठ देयक पोस्ट आॅफिसला पाठविण्यात आले. ग्राहकांमध्ये संतापवारंवार वीज पुरवठा खंडित होण्याची तक्रार नोंदविण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला तर स्वत: येऊन तक्रार द्या, सोबत वीज बील आणा, असे सांगण्यात येते. मागील आठवड्यात रात्री १२ वाजता वीज पुरवठा खंडित झाला होता. १२ वाजता स्वत: जावून तक्रार कोण देईल, याचे किमान भान तरी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना नसावे का? असा प्रश्न वीज ग्राहकांनी केला आहे. वीज ग्राहकांना होणाऱ्या या नाहक मनस्तापाचे निराकरण महावितरणकडून वेळीच झाले नाही तर जनतेत उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)मीटर ‘जंप’ होण्याचा प्रकार वाढलाज्या घरगुती वीज ग्राहकांना उन्हाळ्यापूर्वी १०० ते १५० युनिटचे वीज देयके यायचे त्यांना मे महिन्यात ६०० युनिटचे वीज देयके देण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. उन्हाळा असल्यामुळे १०० ते १५० युनिटचे देयके १५० ते २०० युनिटपर्यंत वाढले तर एकदाचे ग्राह्य मानता येईल. परंतु रिडींग ६०० युनिटपर्यंत वीज देयके दिल्यामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मीटर ‘जंप’ होण्याचा प्रकार वाढल्यामुळे ग्राहकांना नाहक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे. दरवाढीचा ‘शॉक’ ग्राहकांना नोव्हेंबर २०१५ पासून तीन महिने इंधन समायोजन आकार लागू झाला होता. त्यानंतर ऊर्जामंत्र्यांनी यापुढे इंधन समायोजन आकार लागू होणार नाही, असे जाहीर केले होते. परंतु वीज ग्राहकांना अवाढव्य देयके देऊन या घोषणा फोल असल्याचे महावितरणच्या कृतीतून दिसून आले आहे. मे २०१६ मध्ये ११ टक्के इंधन समायोजन आकार लागू करण्यात आल्यामुळे सरासरी १९.५ टक्के वीज दरवाढ ग्राहकांच्या माथी मारण्यात आली आहे.