शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीचा वीजपुरवठा जिवासाठी धोक्याचा; रात्री शेतकऱ्यांनी शेतात जाणे केले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:54 IST

बिबट्याची गावात दहशत : रानडुकरांचा हैदोस वाढला

मंगेश सेलोकरलोकमत न्यूज नेटवर्कधुसाळा : मोहाडी तालुक्यातील आंधळगाव सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटी परिसरातील शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याच्या अभावामुळे गंभीर समस्या भेडसावत आहे. दिवसा वीजपुरवठा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. परंतु, याच वेळी वाघ आणि बिबट्याच्या दहशतीमुळे त्यांचा जीव धोक्यात येत आहे.

काटी, धुसाळा, खैरलांजी परिसरात बिबट व वाघाची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. दहा दिवसांपासून वाघोबा रोज कुठे ना कुठे नागरिकांना दिसत आहे. त्यामुळे रात्री बे रात्री शेतकऱ्यांनी शेतात जाणे सुद्धा बंद केले आहे. वेळेवर पिकाला पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अशा भयावय स्थितीत दिवसा वीजपुरवठा न करता रात्री वीजपुरवठा केला जात आहे.

३ गावांत हिंस्त्र प्राण्यांमुळे दिनचर्येवरही परिणामवीज वितरण कंपनीने रात्रीऐवजी दिवसाला वीजपुरवठा केल्यास कायमची समस्या मागर्गी लागू शकते. लोप्रतिनिधींना सांगूनही यावर तोडगा निघालेला नाही.

आठवड्यात चार रात्र आणि तीन दिवस वीजपुरवठामहावितरणाकडून प्रत्येक हप्त्यात वीजपुरवठा बदलला जातो. सबस्टेशन अंतर्गत चार दिवस रात्री आणि तीन दिवस दिवसा असा वीजपुरवठा सुरू आहे; परंतु सध्या परिसरात वाघ आणि रानडुकरांचा चांगलाच हैदोस असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे कठीण झाले आहे. वारंवार सांगुनही शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कानाडोळा केजात आहे. महावितरणाने रात्रीचा वीजपुरवठा बंद करून सकाळी वीजपुरवठा दिल्यास शेतकरी सहजपणे पिकांना पाणी देऊ शकतात.

कोण जाणार मध्यरात्री !जर का सायंकाळी ६ वाजेची लाइट असली की शेतकरी सहज शेतात जाऊन वीजपुरवठा सुरू करू शकतात; पण रात्री लाइट असली की मध्यरात्री १२ वाजता शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. या अगोदर असे किती तरी आकस्मिक प्रकार घडले आहेत. त्यामुळे पीक वाचवावे की जीव? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर ठाकला आहे.

विषारी श्वापदांचीही भीतीरात्रीच्या वेळी वीजपुरवठा मिळत असल्याने शेतकऱ्यांना अंधारात आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. यादरम्यान साप, विंचू यासह अनेक विषारी प्राण्यांची दहशत असताना सुद्धा जिवाची बाजी लावून पिकांना पाणी द्यावे लागत आहे.

"गावाशेजारी वाघाची चांगलीच दहशत माजली आहे. शेतकरी दिवसा सुद्धा शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. मग रात्री वीजपुरवठा सुरू करण्यासाठी शेतकरी शेतात जाईल तरी कसा? रानडुक्कर तसेच बाकीचे हिंसक प्राणी यांच्यापासूनही जिवाला धोका आहे."- रोशन बुधे, शेतकरी काटी.

टॅग्स :bhandara-acभंडारा