शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

रात्रीचा वीजपुरवठा जिवासाठी धोक्याचा; रात्री शेतकऱ्यांनी शेतात जाणे केले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:54 IST

बिबट्याची गावात दहशत : रानडुकरांचा हैदोस वाढला

मंगेश सेलोकरलोकमत न्यूज नेटवर्कधुसाळा : मोहाडी तालुक्यातील आंधळगाव सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या काटी परिसरातील शेतकऱ्यांना वीजपुरवठ्याच्या अभावामुळे गंभीर समस्या भेडसावत आहे. दिवसा वीजपुरवठा न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. परंतु, याच वेळी वाघ आणि बिबट्याच्या दहशतीमुळे त्यांचा जीव धोक्यात येत आहे.

काटी, धुसाळा, खैरलांजी परिसरात बिबट व वाघाची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. दहा दिवसांपासून वाघोबा रोज कुठे ना कुठे नागरिकांना दिसत आहे. त्यामुळे रात्री बे रात्री शेतकऱ्यांनी शेतात जाणे सुद्धा बंद केले आहे. वेळेवर पिकाला पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अशा भयावय स्थितीत दिवसा वीजपुरवठा न करता रात्री वीजपुरवठा केला जात आहे.

३ गावांत हिंस्त्र प्राण्यांमुळे दिनचर्येवरही परिणामवीज वितरण कंपनीने रात्रीऐवजी दिवसाला वीजपुरवठा केल्यास कायमची समस्या मागर्गी लागू शकते. लोप्रतिनिधींना सांगूनही यावर तोडगा निघालेला नाही.

आठवड्यात चार रात्र आणि तीन दिवस वीजपुरवठामहावितरणाकडून प्रत्येक हप्त्यात वीजपुरवठा बदलला जातो. सबस्टेशन अंतर्गत चार दिवस रात्री आणि तीन दिवस दिवसा असा वीजपुरवठा सुरू आहे; परंतु सध्या परिसरात वाघ आणि रानडुकरांचा चांगलाच हैदोस असल्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे कठीण झाले आहे. वारंवार सांगुनही शेतकऱ्यांच्या समस्यांकडे कानाडोळा केजात आहे. महावितरणाने रात्रीचा वीजपुरवठा बंद करून सकाळी वीजपुरवठा दिल्यास शेतकरी सहजपणे पिकांना पाणी देऊ शकतात.

कोण जाणार मध्यरात्री !जर का सायंकाळी ६ वाजेची लाइट असली की शेतकरी सहज शेतात जाऊन वीजपुरवठा सुरू करू शकतात; पण रात्री लाइट असली की मध्यरात्री १२ वाजता शेतकऱ्यांना शेतात जावे लागते. या अगोदर असे किती तरी आकस्मिक प्रकार घडले आहेत. त्यामुळे पीक वाचवावे की जीव? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर ठाकला आहे.

विषारी श्वापदांचीही भीतीरात्रीच्या वेळी वीजपुरवठा मिळत असल्याने शेतकऱ्यांना अंधारात आपल्या पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. यादरम्यान साप, विंचू यासह अनेक विषारी प्राण्यांची दहशत असताना सुद्धा जिवाची बाजी लावून पिकांना पाणी द्यावे लागत आहे.

"गावाशेजारी वाघाची चांगलीच दहशत माजली आहे. शेतकरी दिवसा सुद्धा शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. मग रात्री वीजपुरवठा सुरू करण्यासाठी शेतकरी शेतात जाईल तरी कसा? रानडुक्कर तसेच बाकीचे हिंसक प्राणी यांच्यापासूनही जिवाला धोका आहे."- रोशन बुधे, शेतकरी काटी.

टॅग्स :bhandara-acभंडारा