शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
"आधी पैसे दे मग बायको घे", EMI न भरल्याने थेट महिलेला उचलून घेऊन गेले बँकवाले, नवरा म्हणतो...
5
Stock Market Today: ट्रम्प टॅरिफ बॉम्बनंतर शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ५३० अंकांनी आपटला; ऑटो-रियल्टीमध्ये विक्री
6
Viral Video : सलाम तुझ्या जिद्दीला! हात नसतानाही तो करतोय बांधकाम; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
7
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
8
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
9
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
10
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
11
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
12
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
13
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
14
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
15
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
16
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
17
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
18
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
19
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
20
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार

आरटीई कोटा कमी करण्यासाठी नवी शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 05:00 IST

देशात २०१२ पासून शिक्षण हक्क कायदा लागू करण्यात आला. यानुसार इंग्रजी माध्यमांच्या शाळेत २५ टक्के मुलांना मोफत शिक्षणाची सोय करण्यात आली. गरिबांच्या मुलांना हक्काचे व दर्जेदार शिक्षण मिळावे हा यामागचा उद्देश आहे; परंतु शासनाच्या ढिसाळ नियोजनाने खरे गरीब विद्यार्थी शिक्षणापासून दूर आहेत. प्रवेशाची नियमावली सोयीनुसार बदलल्याने गरिबांसाठी असलेले शिक्षण नावापुरते उरले आहे.

तथागत मेश्रामलोकमत न्यूज नेटवर्कवरठी : चार वर्षांपासून प्रतिपूर्ती रक्कम शासनाने अडवून ठेवली आहे. दरवर्षी प्रतिपूर्तीता ठरावीक दर कमी करून संस्थाचालकांच्या पैशावर डल्ला मारणे सुरू आहे. आता शासनाने गरिबांच्या हक्कांच्या शिक्षणावर डल्ला मारण्याचा घाट घातला आहे. आरटीई प्रवेशाच्या अधिकृत प्रचलित पद्धतीत बगल देऊन २५ टक्क्यांतर्गत प्रवेशाचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे आरईटीच्या जागा कमी होऊन शेकडो विद्यार्थ्यांना हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.देशात २०१२ पासून शिक्षण हक्क कायदा लागू करण्यात आला. यानुसार इंग्रजी माध्यमांच्या शाळेत २५ टक्के मुलांना मोफत शिक्षणाची सोय करण्यात आली. गरिबांच्या मुलांना हक्काचे व दर्जेदार शिक्षण मिळावे हा यामागचा उद्देश आहे; परंतु शासनाच्या ढिसाळ नियोजनाने खरे गरीब विद्यार्थी शिक्षणापासून दूर आहेत. प्रवेशाची नियमावली सोयीनुसार बदलल्याने गरिबांसाठी असलेले शिक्षण नावापुरते उरले आहे. शासनस्तरावर आरटीई प्रवेशावर कात्री लावल्याने पालकवर्गात नाराजीचा सूर उमटत आहे.  आरटीईअंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च म्हणून प्रतिपूर्ती देण्यात येते. यात केंद्र व राज्य सरकारचा वाटा आहे. प्रतिपूर्ती रकमेत मोठा वाटा केंद्र सरकारचा असून राज्य नाममात्र भार उचलतो. प्रतिपूर्ती देण्यास राज्य शासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आहे.

प्रवेशाचे धोरण निश्चित नसल्याने घोळ- आरटीईअंतर्गत पहिल्या वर्गातील एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के मुलांना प्रवेश देण्याची प्रचलित पद्धत आहे. शासनाने प्रवेश प्रक्रियेसाठी ध्येय धोरण निश्चित केले नसल्याने सुरुवातीपासूनच घोळ आहे. नामांकित इंग्रजी शाळा या नियमानुसार प्रवेश देत नाही. त्यामुळे शासनाने दोन वर्षांपूर्वी बदल करून गतवर्षी झालेल्या एकूण प्रवेशाच्या २५ टक्के विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे धोरण आखले.- प्रचलित पद्धतीनुसार प्रवेश कोटा न ठरविता एकूण प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी २५ टक्के प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वजा करून कोटा ठरविण्यात आला. त्यासाठी तीन वर्षांची सरासरी काढून कोटा ठरविण्यात आला. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात जागा कमी झाल्याने शेकडो विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिले.

शिक्षण विभाग अनिभज्ञ- भंडारा जिल्ह्यातील इंग्रजी माध्यम शाळांची आरटीई प्रतिपुर्ती प्रलंबित आहे. याबाबत मागणी बिल सादर करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. मात्र शिक्षण विभागाने मागणी बिलच सादर केले नाही. त्यामुळे जिल्ह्याला कवडीमोल प्रतिपुर्ती मिळाल्याचा आरोप इंग्रजी माध्यम संस्थाचालकांनी केला आहे. दोन महिन्यांपासुन शिक्षण विभागाकडे पैसे पडुन असतानाही वाटपाच्या कोणत्याच हालचाली होत नाही. त्यामुळे शिक्षण संस्थाचालकांत रोष आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षण