शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

समान पाणीपुरवठ्यासाठी नवा प्रयोग; टुल्लू पंपचा वापर थांबविण्यासाठी भंडाऱ्यात एक तासाचे लोडशेडिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 12:03 IST

बुधवारपासून रोज सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान लोडशेडिंग केले जाईल. पाण्याचे समान वितरण करता यावे यासाठी भंडारा शहरासह पवनी, तुमसर या शहरासाठी हा निर्णय असल्याने येथील नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्देभंडारा, पवनी, तुमसरमध्ये सकाळी तासभर राहणार बत्ती गूल

भंडारा : जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रात टुल्लू पंपाच्या माध्यमातून पाण्याचा अवैधपणे होणारा उपसा रोखण्यासाठी नवा प्रयोग केला जात आहे. येथे बुधवारपासून रोज सकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान लोडशेडिंग केले जाईल. पाण्याचे समान वितरण करता यावे यासाठी भंडारा शहरासह पवनी, तुमसर या शहरासाठी हा निर्णय असल्याने येथील नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागणार आहे.

कोळसा टंचाई आणि त्याच्या वाढत्या मागणीमुळे महाराष्ट्र आधीच लोडशेडिंगसोबत लढत आहे. अन्य राज्यांमध्ये तासांचे लोडशेडिंग सुरू आहे. मात्र, कोळसा संकट असतानाही महाराष्ट्राला लोडशेडिंगची झळ बसू दिली नसल्याचा दावा महावितरण सातत्याने करीत आहे; परंतु नव्या आदेशानुसार, आता भंडारा नगरपालिका क्षेत्रात तासभराचे लोडशेडिंग केले जाणार आहे.

उल्लेखनीय म्हणजे, भंडारा उपजिल्हाधिकाऱ्यांनी २९ एप्रिलला महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना पत्र लिहून भंडारा शहरातील गंभीर पाणी समस्येचा मुद्दा मांडला होता. नागरिक मोठ्या प्रमाणावर टुल्लू पंपाचा वापर करून पाण्याची चोरी करतात. यामुळे शहराच्या सर्वच भागांत समान पाणीपुरवठा करता येत नाही. यामुळे जनहित लक्षात घेता रोज सकाळी ७ ते ८ या वेळात लोडशेडिंग केले जावे, असे त्यांनी या पत्रात म्हटले होते. याला मुख्य अभियंत्यांची परवानगी मिळाल्याने २ मे रोजी अधीक्षक अभियंत्यांना पत्र लिहून भंडारा, पवनी, तुमसर या नगरपालिका क्षेत्रात सकाळी एक तासासाठी लोडशेडिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निर्णय जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून : वासनिक

महावितरणचे मुख्य अभियंता बंडू वासनिक महणाले, जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या नगरपालिका क्षेत्रात जलसंकट आहे. टुल्लू पंपाद्वारे पाणी खेचणे बंद झाल्यास समान वितरण शक्य आहे. यापूर्वी देखील हा प्रयोग करण्यात आला आहे.

हा तर जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न

नागरिकांना पाण्याचे समान वितरण करण्याची जबाबदारी मनपा, नगर परिषद यासारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. नागरिक टुल्लू पंपाचा वापर करीत असतील तर ते थांबविण्याचा अधिकारही त्यांच्याकडे आहे. जप्ती, दंडवसुली असेही पर्याय आहेत. मात्र, आता वीज कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. राजकीय दबावामुळे नागरिकांवर कारवाई करण्यात नगरपालिका असमर्थ असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे कारण यासाठी सूत्रांकडून दिले जात आहे.

टॅग्स :Waterपाणीbhandara-acभंडारा