शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

ग्रामीण भागात नवी आर्थिक क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:32 IST

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणारी ठरणार आहे. या योजनेचा लाभ दुर्गम भागातील गरीब नागरीक, शेतकऱ्यांना होणार आहे. बँक सेवेपासून वंचित नागरीकांपर्यंत इंडिया पोस्ट पेमेंटस बँक पोहोचणार असल्यामुळे दैनंदिन आर्थिक व्यवहार कमीत कमी वेळेत होण्यास मदत होईल. मोबाईल फोनच्या माध्यमातून पोस्ट आॅफिस आपल्या दारी येणार असल्यामुळे सामान्य माणसांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही योजना म्हणजे ग्रामीण भागातील नविन आर्थिक क्रांती ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : भंडारा येथे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक शाखेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणारी ठरणार आहे. या योजनेचा लाभ दुर्गम भागातील गरीब नागरीक, शेतकऱ्यांना होणार आहे. बँक सेवेपासून वंचित नागरीकांपर्यंत इंडिया पोस्ट पेमेंटस बँक पोहोचणार असल्यामुळे दैनंदिन आर्थिक व्यवहार कमीत कमी वेळेत होण्यास मदत होईल. मोबाईल फोनच्या माध्यमातून पोस्ट आॅफिस आपल्या दारी येणार असल्यामुळे सामान्य माणसांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही योजना म्हणजे ग्रामीण भागातील नविन आर्थिक क्रांती ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.भारतीय टपाल विभागाअंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) देशभरातील ६५० शाखा आणि ३२५० अस्सेस पॉइंट शाखांचा उद्घाटन सोहळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तालकटोरा स्टेडीयम, नवी दिल्ली येथून करण्यात आले.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लक्ष्मी सभागृह भंडारा येथे शनिवारला हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी खासदार मधुकर कुकडे, आमदार अ‍ॅड. रामचंद्र आवसरे, वरिष्ठ अधीक्षक डी.ए. साळवे, सहाय्यक अधिक्षक प्रभातकुमार सिन्हा, इंडिया पोस्ट पेमेंटस बँक भंडारा शाखा व्यवस्थापक वैभव बालकुंडे, पोस्टमास्टर ए.के. भलावी उपस्थित होते. भंडारा येथे पालकमंत्री बानकुळे यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँक शाखेचे उदघाटनही केले. यावेळी त्यांच्या हस्ते खातेदारांना 'क्युआर कार्ड' वाटप करण्यात आले.यावेळी खासदार मधुकर कुकडे यांनी या योजनेची प्रशंसा केली. पोस्टाने क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकले असे ते म्हणाले. इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेच्या माध्यमातून डाक विभाग आता लोकांच्या अनेक प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेच्या खातेदारांना आता रक्कम काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी डाकघरापर्यंत येण्याची आवश्यकता भासणार नाही. पोस्टमन स्वत: त्याच्याकडे असलेल्या मोबाईल डिवाईसच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करुन देतील.विविध सेवांच्या पेमेंटसाठी खासगी संस्थांचे अनेक कार्ड उपलब्ध आहेत. आता भारतीय डाक विभागाने इंडिया पोस्ट पेमेंट बॅकेच्या माध्यमातून क्युआर कार्ड आणले आहे. या कार्डच्या माध्यमातून विजेचे बिल, मोबाईल बिल, डीटीएच रिचार्ज, गॅस व विमा हप्ता आदींचे बिल अदा करता येईल. खातेधारक या कार्डला आपल्या बचत खात्याशी लिंक करु शकतात. संचालन शिल्पा खंडाईत यांनी केले.