शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

जैवविविधता जोपासणे काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:11 IST

पर्यावरण संतुलीत राहिले नाही, असे प्रत्येकजण बोलतो पण ते कशामुळे असंतुलीत झाले याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी जैवविविधता जोपासणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील पर्यावरण व जैवविविधता अभ्यासक सुहास वायंगनकर यांनी केले.

ठळक मुद्देसुहास वायंगनकर : पवनी येथे ‘निसर्गावर बोलू काही’ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : पर्यावरण संतुलीत राहिले नाही, असे प्रत्येकजण बोलतो पण ते कशामुळे असंतुलीत झाले याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी जैवविविधता जोपासणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर येथील पर्यावरण व जैवविविधता अभ्यासक सुहास वायंगनकर यांनी केले.वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग प्रादेशिक, फ्लायकॅचर्स वाईल्ड फेंडस, अभियान फाऊंडेशन व आझाद शेतकरी संघटना यांचेवतीने शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित निसर्गावर बोलू काही या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून सुहास वायंगनकर बोलत होते. ते पुढे म्हणाले पर्यावरणाचा तोल सांभाळत असलेल्या पश्चिम घाटात विकासाचे नावावर होत असलेल्या रस्ते, लोहमार्ग व कारखान्यामुळे पश्चिम घाटाची जैवविविधता धोक्यात आलेली आहे. अख्ख्या महाराष्ट्रात हे चित्र फारसे वेगळे नाही. चाळीस कोटी लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत असलेल्या पश्चिम घाटातील ३३ टक्के वनस्पती नामशेष झालेल्या आहेत. पर्यावरण संवर्धनासाठी जंगल आवश्यक आहे. परंतू केवळ १४ टक्के जंगल उपलब्ध आहे. एक जंगल तयार व्हायला झाडे चारशे ते एक हजार वर्षाचा कालावधी लागतो. मात्र आपण त्याला नष्ठ करण्याचा घाट घातलेला आहे. पशु, पक्षी, प्राणी व किटक यांचे अधिवास प्रचंड वेगाने नष्ट केल्या जात आहेत. नखशिखात फुले येणाऱ्या बहावा वनस्पतीसह कित्येक औषधी वनस्पती नामशेष होवू नये यासाठी लोकसहभागाची गरज आहे. मोठी उर्जा असणारा युवावर्ग या परिसरात असल्याने वनविभागाने त्यांचे सहकार्य घेवून जैवविविधता जोपासण्यासाठी प्रयत्न करावा, असे विचार त्यांनी व्यक्त केले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य विजय लेपसे, कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजक वनपरिक्षेत्राधिकारी कोमल जाधव, सहायक वन संरक्षक शंकर धोटे, आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई, भाजपा किसान सेलचे अध्यक्ष राजेंद्र फुलबांधे, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिक लेपसे, संचालक वर्षा भोयर, कल्पना कटरे, अतिथी पश्चिम प्रशांत रायपुरकर यांनी तर आभार आशिष उरकुडे यांनी मानले. फ्लायकॅचर्स वॉईल्ड फ्रेंडस पवनीचे प्रवर्तक पंकज देशमुख व मित्रपरिवार यांनी फुलपाखरू उद्यान निर्मितीचा संकल्प यावेळी व्यक्त केला.