शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शाश्वत शेती करण्याची गरज

By admin | Updated: March 28, 2016 00:27 IST

निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत असलेल्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी सरकार शेतकरी हित जोपासून...

काशिवार यांचे प्रतिपादन : कोरडवाहू क्षेत्र विकास शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमसाकोली : निसर्गाच्या अवकृपेमुळे अडचणीत असलेल्या माझ्या शेतकरी बांधवांसाठी सरकार शेतकरी हित जोपासून शासनाच्या विभिन्न योजनेच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे. शेतकरी बांधवांनीसुद्धा सरकार देईल तेव्हाच आम्हाला न्याय मिळेल. ही वृत्ती दूर सारुन शाश्वत शेती करण्याची गरज आहे. तेव्हाच शेतकरी आर्थिकरित्या सक्षम होईल.स्थानिक तालुका बीज गुणन केंद्रात आयोजित राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात या क्षेत्राचे आमदार बाळ काशिवार यांनी वरिष्ठ प्रतिपादन केले. यावेळी मंचावर पशुवैद्यकीय विभागाचे डॉ.एन.एम. खोडसकर, डॉ.आर.एम. महाजन, डॉ.ए.पी. वायरेकर, तालुका कृषी अधिकारी जी.के. चौधरी, मंडळ कृषी अधिकारी चंदन मेश्राम, सरपंच राखडे उपस्थित होते.काशिवार पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन आधुनिक शेती तंत्रज्ञानासोबत पूरक व्यवसायाकरिता विभिन्न योजना प्रामाणिकरीत्या राबवीत आहे. शेतकऱ्यांनी धानाच्या शेतीवर अवलंबून न राहता दुग्ध उत्पादन, फळबाग लागवड व इतर शेतीवर आधारित व्यवसायात सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. आ. काशिवार यांनी सांगितले की, भंडारा येथे नेस्ले कंपनीचा कारखाना उभाण्यात येणार आहे. त्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या पीक विमा धोरणात सुधारणा करण्याचा प्रस्ताव हा विचाराधीन असून लवकरच शेतकरी हीत पिक विमा योजना अमलात आणल्या जाईल. जेणेकरून पिकांच्या नुकसानीचा मोबदला शेतकऱ्यात लवकर मिळणे सोईस्कर होईल. याप्रसंगी डॉ.खोडसकर, डॉ.महाजन व डॉ.पाथरेकर यांनी उपस्थित शेतकरी व गौपालक यांना संकरीत गाईच्या संगोपन व दुग्ध व्यवसायासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले.याप्रसंगी राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान अंतर्गत कोरडवाही क्षेत्र विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून पशुधन गाय खरेदी केलेल्या २१ लाभार्थ्यांना ८ लक्ष ४० हजार रुपयाचे अनुदान निधीचे धनादेश आ.बाळा काशीवार यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. प्रास्ताविकात चौधरी यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की पीक हंगामापूर्वी उत्पादकता वाढविण्यासाठी गांभीर्याने विचार करूान नियोजितरित्या शेती करणे तसेच कृषी विभागाचे वेळोवेळी मार्गदर्शन घ्यावे. कार्यक्रमाचे संचलन कृषी सहायक एस.एन. नागलवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन चंदन मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमात बहुसंख्येने शेतकरी व गौपालक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)