शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

बालगुन्हेगारी थांबविण्यासाठी संस्काराची गरज

By admin | Updated: February 2, 2016 01:03 IST

गुन्हा घडला की पोलीस स्टेशन व कायदा पुढे येतो. त्यापेक्षा गुन्हा घडू नये, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज आहे.

पवनीत जनजागृती कार्यक्रम : यु.व्ही. जोशी यांचे प्रतिपादनपवनी : गुन्हा घडला की पोलीस स्टेशन व कायदा पुढे येतो. त्यापेक्षा गुन्हा घडू नये, यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याची गरज आहे. समाजात मुलगा, मुलगी असे भेदभाव व्हायला नको. सर्वांना समानतेची वागणूक घ्यावी. तसेच एकही मुल शाळाबाह्य राहू नये त्यांना शाळेत आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत. शिक्षण मिळाले नाही तर गुन्हेगारीकडे वाटचाल सुरु होते. म्हणून बालगुन्हेगारी थांबविण्यासाठी संस्काराची गरज आहे, असे प्रतिपादन क स्तर दिवाणी न्यायाधीश यु.व्ही. जोशी यांनी केले.उच्च न्यायालय यांचे आदेशान्वये बाल न्यायालय अधिनियमानुसार गठीत बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ यांची कर्तव्ये, भूमिका व जबाबदारी याबाबत जनजागृतीकरिता पोलीस स्टेशनच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना न्यायाधीश जोशी यांनी बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ यांची माहिती उपस्थितांना दिली. याप्रसंगी सहाय्यक दिवाणी न्यायाधीश एस.एम. सय्यद, गटशिक्षणाधिकारी बी.वाय. निमसरकार, पोलीस निरीक्षक मधुकर गीते, अ‍ॅड. एस.एम. भुरे, वकील संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.एल.के. देशमुख, पदविधर शिक्षक रविंद्र रायपुरकर व मुख्याध्यापक अशोक पारधी यांनी बालगुन्हेगारी वाढण्याचे कारण व ते थांबविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी माध्यमिक, पूर्व माध्यमिक व प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, पोलीस पाटील,शिक्षक व कर्मचा-यांसह पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार अ‍ॅड.एस.एम. भुरे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)