शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक निकालावर संशोधन करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:14 IST

सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हायला हवी. मात्र पाच वर्षातील भाजप सरकारचा ग्राफ पाहता सर्व समीकरणे विरोधी असतानाही भाजपला बहुमत मिळाले. खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाचे आत्मचिंतन करण्यापेक्षा सर्वांनाच निकालाबाबत संशोधन करण्याची गरज आली आहे, ......

ठळक मुद्देनाना पटोले : भंडारा येथे पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हायला हवी. मात्र पाच वर्षातील भाजप सरकारचा ग्राफ पाहता सर्व समीकरणे विरोधी असतानाही भाजपला बहुमत मिळाले. खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाचे आत्मचिंतन करण्यापेक्षा सर्वांनाच निकालाबाबत संशोधन करण्याची गरज आली आहे, असे मत माजी खासदार तथा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी व्यक्त केले.मंगळवारी दुपारी ४ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले मागील पाच वर्षात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, शेतकरी आत्महत्येचे प्रमाणही सातत्याने वाढत गेले. महागाई गगनाला भिडली तर डॉलरच्या मागे रुपयाची घसरण झाली. लहान व्यापारी बेहाल झाले. गरीबांच्या योजनांवर घाला घालण्यात आला. अशा विपरित स्थितीतही भाजपला बहुमत कसे काय मिळाले हाच आमचा मुख्य प्रश्न आहे. ईव्हीएम बाबत न्यायालयासह निवडणूक विभागाने मागण्यांकडे दुर्लक्ष केले. मात्र गावापासून राज्यापर्यंत संशोधन होणे गरजेचे असून पुढील निवडणुका बॅलेट पेपरवरच होणे अत्यंत गरजेचे असल्याचेही नाना पटोले यांनी आवर्जून सांगितले.हारणे व जिंकणे या स्पर्धेतील बाजू असल्या तरी लोकशाही रूजविलेल्या देशात पारदर्शकता असणे अत्यंत गरजेचे आहे. निकालानंतरची परिस्थिती पाहता देशात भीतीचे वातावरण आहे. निकाल हाती आल्यानंतर कुठेही मतदारांमध्ये उत्साह दिसून येत नाही. कुठेतरी काही कमी आहे व यावरच लोकांच्या मनातील संशय संशोधनाच्या माध्यमातून समोर येणे अत्यंत गरजेचे आहे. येणारी निवडणूक बॅलेट पेपरवरच व्हावी अशी आमची मुख्य मागणी असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९