शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

लोकसभा निवडणूक निकालावर संशोधन करण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 01:14 IST

सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हायला हवी. मात्र पाच वर्षातील भाजप सरकारचा ग्राफ पाहता सर्व समीकरणे विरोधी असतानाही भाजपला बहुमत मिळाले. खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाचे आत्मचिंतन करण्यापेक्षा सर्वांनाच निकालाबाबत संशोधन करण्याची गरज आली आहे, ......

ठळक मुद्देनाना पटोले : भंडारा येथे पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सुदृढ लोकशाहीसाठी मतदानाची प्रक्रिया पारदर्शक व्हायला हवी. मात्र पाच वर्षातील भाजप सरकारचा ग्राफ पाहता सर्व समीकरणे विरोधी असतानाही भाजपला बहुमत मिळाले. खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभवाचे आत्मचिंतन करण्यापेक्षा सर्वांनाच निकालाबाबत संशोधन करण्याची गरज आली आहे, असे मत माजी खासदार तथा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी व्यक्त केले.मंगळवारी दुपारी ४ वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले मागील पाच वर्षात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, शेतकरी आत्महत्येचे प्रमाणही सातत्याने वाढत गेले. महागाई गगनाला भिडली तर डॉलरच्या मागे रुपयाची घसरण झाली. लहान व्यापारी बेहाल झाले. गरीबांच्या योजनांवर घाला घालण्यात आला. अशा विपरित स्थितीतही भाजपला बहुमत कसे काय मिळाले हाच आमचा मुख्य प्रश्न आहे. ईव्हीएम बाबत न्यायालयासह निवडणूक विभागाने मागण्यांकडे दुर्लक्ष केले. मात्र गावापासून राज्यापर्यंत संशोधन होणे गरजेचे असून पुढील निवडणुका बॅलेट पेपरवरच होणे अत्यंत गरजेचे असल्याचेही नाना पटोले यांनी आवर्जून सांगितले.हारणे व जिंकणे या स्पर्धेतील बाजू असल्या तरी लोकशाही रूजविलेल्या देशात पारदर्शकता असणे अत्यंत गरजेचे आहे. निकालानंतरची परिस्थिती पाहता देशात भीतीचे वातावरण आहे. निकाल हाती आल्यानंतर कुठेही मतदारांमध्ये उत्साह दिसून येत नाही. कुठेतरी काही कमी आहे व यावरच लोकांच्या मनातील संशय संशोधनाच्या माध्यमातून समोर येणे अत्यंत गरजेचे आहे. येणारी निवडणूक बॅलेट पेपरवरच व्हावी अशी आमची मुख्य मागणी असल्याचेही नाना पटोले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९