शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
3
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
4
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
5
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
6
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
7
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
8
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
9
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
10
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
11
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
12
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
13
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
14
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
15
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
16
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
17
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
18
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
19
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
20
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात

आंबेडकरी चळवळीच्या पुनर्बांधणीची गरज

By admin | Updated: December 20, 2015 00:28 IST

भारतीय राज्यघटना अंमलात येवून ६५ वर्षे झाली तरी आजही देशातील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात विषमता दिसून येते.

भंडाऱ्यात सामाजिक न्याय सभा सुखदेव थोरात यांचे प्रतिपादनभंडारा : भारतीय राज्यघटना अंमलात येवून ६५ वर्षे झाली तरी आजही देशातील सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात विषमता दिसून येते. समकाळात तर सामाजिक स्वातंत्र्याचे, न्यायाचे, अभिव्यक्तीचे प्रश्न अधिकच बिकट झाले आहेत. या दृष्टीने या सर्व समाज घटकाच्या विकासाकरिता संघटितपणे विचार, चिंतन व समूह चर्चा करून एक सखोल कालबद्ध कृती कार्यक्रम आखण्याची व त्याकरिता आंबेडकरी चळवळीची पुनर्बांधणी करण्याची गरज आहे, असे मौलिक विचार विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा इंडियन कौन्सिल फॉर सोशल सायन्स रिसर्च नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य जयंती महोत्सव समिती भंडारा आणि असोसिएशन फॉर सोशल जस्टीस अ‍ॅण्ड इकॉनॉमिक एम्पावरमेंट, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सार्वजनिक वाचनालयाच्या इंद्रराज सभागृहात आयोजित सामाजिक न्याय सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक व विचारवंत माजी प्राचार्य भगवान सुखदेवे होते.थोरात म्हणाले, समानता, सामाजिक न्यायाचा गाभा आहे. जाती व्यवस्था केवळ सामाजिक क्षेत्रातच नाही तर धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक व रोजगार क्षेत्रातही आहे. अस्पृश्य दलितांना शिक्षण, जमिन, उद्योगधंदे इत्यादी क्षेत्रातील अधिकार नाकारण्यात आले होते. नाकारलेल्या अधिकाराची नुकसान भरपाई म्हणजे आरक्षण होय. स्वातंत्र्यानंतर सामाजिक न्यायाचा प्रश्न नव्या राष्ट्र उभारणीच्या संविधानिक चळवळीतून पुन्हा ऐरणीवर आला आहे. आज देशात जीवनातील सर्व प्रकारच्या विषमता, आवाहन म्हणून उभ्या आहेत. या विषमता नष्ट करण्यासाठी प्रेरित झालेल्या चळवळींना भावनात्मक आंदोलनातच गुंतवून ठेवण्यास भाग पाडणारे षडयंत्र प्रस्थापित व प्रतिगामी व्यवस्थेकडून सातत्याने रचले जात आहेत. याकरिता दलितांनी संघटित होण्याची आवश्यकता आहे.प्रा. डॉ. गौतम कांबळे व डॉ. पारीश भगत यांचेही समयोचित मार्गदर्शन झाले. सभाध्यक्ष भगवान सुखदेवे यांनी देशातील वर्तमान परिस्थिती व दलित चळवळीची चिकित्सा करून चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी प्रलोभनाला बळी न पडता चळवळीचे उद्दिष्ट समजून कार्य करावे, असे मत व्यक्त केले. प्रा. डॉ. के.एल. देशपांडे व इंजि. रूपचंद रामटेके यांनी भंडारा नगरीच्या वतीने डॉ. सुखदेवे थोरात यांचा शाल, ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला. मंचावर डी.एफ. कोचे, डॉ. जी. भैय्यालाल व संयोजक अमृत बन्सोड यांची उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन डॉ. अनिल नितनवरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. उमेश बन्सोड, प्रास्ताविक अमृत बन्सोड यांनी केले तर आभार डॉ. सिद्धार्थ मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाकरिता डॉ. अनिल नितनवरे अमृत बन्सोड, डॉ. सिद्धार्थ मेश्राम, डॉ. भय्यालाल, गुलशन गजभिये, संजय बन्सोड, प्रा. के.एल. देशपांडे, इंजि. रूपचंद रामटेके, आदिनाथ नागदेवे, असित बागडे, धर्मदीप कांबळे, अरुण अंबादे, उपेन्द्र कांबळे, माणिकराव रामटेके, भाविका उके, एस.एस. साठवणे, माया उके, ए.पी. गोडबोले, व्ही.डी. मेश्राम, एम.डी. गेडाम, आनंद गजभिये, करण रामटेके, डॉ. सलील बोरकर, डॉ. डी.आय. शहारे इत्यादींनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)