शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
2
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
3
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
4
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
5
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
6
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
7
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
8
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
9
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
10
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
11
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
12
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
13
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
14
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
15
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
16
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
17
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
18
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
19
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
20
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ग्रामीण भागात वित्तीय विकास साक्षरतेची गरज

By admin | Updated: July 16, 2015 00:58 IST

ग्रामीण जनतेला दैनंदिन गरजाची पूर्तता व मानवी जीवन सुरक्षा कवच निर्माण करण्याकरिता वित्तीय विकास साक्षरतेची गरज आहे,

नाबार्डचा वर्धापन दिन : अरविंद खापर्डे यांचे प्रतिपादनभंडारा : ग्रामीण जनतेला दैनंदिन गरजाची पूर्तता व मानवी जीवन सुरक्षा कवच निर्माण करण्याकरिता वित्तीय विकास साक्षरतेची गरज आहे, असे प्रतिपादन नाबार्डचे भंडारा जिल्हा विकास अधिकारी अरविंद खापर्डे यांनी केले. नाबार्डच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त तुमसर तालुक्यातील आलेसूर येथे उद्घाटनप्रसंगी बोलत होते. नाबार्ड जिल्हा कार्यालय भंडारा व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने नाबार्डच्या वर्धापन दिनानिमित्त वित्त साक्षरता जनजागृती कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन तुमसर तालुक्यातील वाडी प्रकल्पातील आलेसूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आलेले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अरविंद खापर्डे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विदर्भ कोकण विकास बँकेचे विभागीय व्यवस्थापक नरेंद्र डुंबरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गर्रा (बघेडा) बँकेचे व्यवस्थापक नवघरे व धनंजय खंडेरा, आलेसूरच्या सरपंच छाया टेकाम, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे अविल बोरकर, बेलेकर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे पृथ्वीराज शेंडे, चिखलीचे उपसरपंच रोशन सातवान उपस्थित होते.खापर्डे यांनी ग्रामस्थांकरिता बँकेचे जीवन सुरक्षा कवच निर्मितीच्या विमा योजनाची कार्यपद्धती व उपयोगितेचे महत्व पटवून सांगितले. डुंबरे यांनी बँक द्वारा राबविण्यात असलेल्या विविध विकासाच्या योजना प्रभावीपणे ग्रामीण जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्यपद्धतीवर मार्गदर्शन केले. अविल बोरकर यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत घेणाऱ्या विविध योजना १५ आॅगस्टच्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी वैयक्तिक लाभाची कामे व सामूहीक लाभाच्या कामाची मागणी करण्याची व वाडी प्रकल्पाला यशस्वी करण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यामधून वित्त साक्षरता अभियान अंतर्गत प्रतिनिधींनी पथनाट्य जागृती चमूने मनोरंजनातून ग्रामस्थांना बँकेच्या कार्यपद्धती व योजनेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन गौतम नितनवरे वाडी प्रकल्प समन्वयक यांनी केले व आभार जगन्नाथ कटरे प्रकल्प सहाय्यक यांनी केले. (शहर प्रतिनिधी)