शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
4
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
5
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
6
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
7
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
8
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
9
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
10
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
11
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
12
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
13
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
14
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
15
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
16
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
17
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
18
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
19
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
20
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात वित्तीय विकास साक्षरतेची गरज

By admin | Updated: July 16, 2015 00:58 IST

ग्रामीण जनतेला दैनंदिन गरजाची पूर्तता व मानवी जीवन सुरक्षा कवच निर्माण करण्याकरिता वित्तीय विकास साक्षरतेची गरज आहे,

नाबार्डचा वर्धापन दिन : अरविंद खापर्डे यांचे प्रतिपादनभंडारा : ग्रामीण जनतेला दैनंदिन गरजाची पूर्तता व मानवी जीवन सुरक्षा कवच निर्माण करण्याकरिता वित्तीय विकास साक्षरतेची गरज आहे, असे प्रतिपादन नाबार्डचे भंडारा जिल्हा विकास अधिकारी अरविंद खापर्डे यांनी केले. नाबार्डच्या ३३ व्या वर्धापन दिनानिमित्त तुमसर तालुक्यातील आलेसूर येथे उद्घाटनप्रसंगी बोलत होते. नाबार्ड जिल्हा कार्यालय भंडारा व ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने नाबार्डच्या वर्धापन दिनानिमित्त वित्त साक्षरता जनजागृती कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची जाणीव जागृती कार्यक्रमाचे आयोजन तुमसर तालुक्यातील वाडी प्रकल्पातील आलेसूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आलेले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अरविंद खापर्डे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी विदर्भ कोकण विकास बँकेचे विभागीय व्यवस्थापक नरेंद्र डुंबरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून गर्रा (बघेडा) बँकेचे व्यवस्थापक नवघरे व धनंजय खंडेरा, आलेसूरच्या सरपंच छाया टेकाम, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे अविल बोरकर, बेलेकर, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाचे पृथ्वीराज शेंडे, चिखलीचे उपसरपंच रोशन सातवान उपस्थित होते.खापर्डे यांनी ग्रामस्थांकरिता बँकेचे जीवन सुरक्षा कवच निर्मितीच्या विमा योजनाची कार्यपद्धती व उपयोगितेचे महत्व पटवून सांगितले. डुंबरे यांनी बँक द्वारा राबविण्यात असलेल्या विविध विकासाच्या योजना प्रभावीपणे ग्रामीण जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्यपद्धतीवर मार्गदर्शन केले. अविल बोरकर यांनी रोजगार हमी योजनेंतर्गत घेणाऱ्या विविध योजना १५ आॅगस्टच्या ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी वैयक्तिक लाभाची कामे व सामूहीक लाभाच्या कामाची मागणी करण्याची व वाडी प्रकल्पाला यशस्वी करण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. गोंदिया जिल्ह्यामधून वित्त साक्षरता अभियान अंतर्गत प्रतिनिधींनी पथनाट्य जागृती चमूने मनोरंजनातून ग्रामस्थांना बँकेच्या कार्यपद्धती व योजनेचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे संचालन गौतम नितनवरे वाडी प्रकल्प समन्वयक यांनी केले व आभार जगन्नाथ कटरे प्रकल्प सहाय्यक यांनी केले. (शहर प्रतिनिधी)