शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

ध्येय गाठण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:36 IST

२७ लोक १२ के पवनी : आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांच्या जीवनात अनेक मंगल घटना घडल्याने हा दिवस महत्त्वपूर्ण ...

२७ लोक १२ के

पवनी : आषाढ पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांच्या जीवनात अनेक मंगल घटना घडल्याने हा दिवस महत्त्वपूर्ण आहे. भगवान बुद्धांनी याच दिवशी पाच परिवाज्रकांना धम्मदेसना दिल्यामुळे हा दिवस गुरू-शिष्यांची महती सांगणारा आहे. धम्मचक्र परिवर्तनाची ही खरी सुरुवात असून, खऱ्या अर्थाने हीच गुरूपौर्णिमा आहे. पाच परिवाज्रकांनी बुद्धांचा उपदेश धम्म प्रचार करण्यासाठी वापरला. ध्येय गाठण्यासाठी गुरूंच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे यातून सिद्ध होते, असे प्रतिपादन धम्मदूत भदंत संघरत्न माणके यांनी केले.

महासमाधीभूमी रुयाड येथील गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. धम्म समजून घेताना गुरू काय उपदेश करतात, याकडे मन आणि चित्त ठेवून ऐकले पाहिजे. यासाठी एकाग्रता ठेवणे महत्त्वाचे आहे. जे प्रवचन आपण ऐकतो, ते दुसऱ्यांना सांगण्याची क्षमता निर्माण होणे आवश्यक आहे. आयुष्यभर माणसाने शिष्य बनून राहिल्यास ध्येय सिद्धीपर्यंत पोहोचता येईल, असे मार्गदर्शन केले. आषाढ पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या जीवनात घडलेल्या मंगल घटनांची माहिती उपस्थित उपासक-उपसिकांना भदंत माणके यांनी देऊन आषाढ पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंत तीन महिन्यांच्या कालावधीत बौद्ध भिक्खूंनी विहारात वर्षावास करताना उपस्थितांना धम्म उपदेश करावा. अनेक समाजहितैशी विषयांवर प्रबोधन करावे, असेही धम्मदूत संघरत्न माणके यांनी सांगितले. भगवान बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी धम्मदूत भदंत संघरत्न माणके यांनी उपस्थितांना धम्मादेशना दिली. पहिल्या टप्प्यात गुरूपौर्णिमेचा तर दुसऱ्या टप्प्यात स्मृतिशेष शिलमंजू शिंव्हगडे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

पय्या मेत्ता संघाद्वारे महासमाधीभूमी रुयाड येथे आयोजित दोन्ही कार्यक्रमांप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहन पंचभाई, महेंद्र गोस्वामी, अरुण गोंडाणे, आनंदविलास रामटेके, इंजि. जगदीश खोब्रागडे, इंजि. रूपचंद रामटेके, अरविंद धारगावे, भक्तराज गजभिये, देवा वानखेडे, मनोहर मेश्राम, स्वप्नील बन्सोड, विक्की कोल्हे, युवराज सुखदेवे, लोमेश सूर्यवंशी, सदानंद धारगावे, राजाराम गणवीर, धम्मानंद मेश्राम, वत्सला शिंव्हगडे, रंजू शिंव्हगडे, विपीन शिंव्हगडे, रिया शिंव्हगडे, छाया शिंव्हगडे, विनोद शिंव्हगडे, मनीषा शिंव्हगडे, सम्यक शिंव्हगडे, मनोज मोटघरे, सरिता मोटघरे आदी उपासक-उपासिका उपस्थित होते. संचालन धम्मानंद मेश्राम व अरुण गोंडाणे यांनी केले.